शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

उल्हासनगर महापालिकेचा भोंगळ कारभार; एकाच विकास कामासाठी तीन निधी, आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप 

By सदानंद नाईक | Updated: October 4, 2023 18:19 IST

उल्हासनगर महापालिका बांधकाम विभाग रस्त्याच्या डिव्हाईडर ठेका व निकृष्ट कामावरून वादात सापडला आहे.

उल्हासनगर: शहरातील एकाच विकास कामासाठी वेगवेगळ्या निधीचा वापर केला जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केल्याने, महापालिका बांधकाम विभागातील सावळागोंधळ उघड केला. याबाबतची माहिती आपण बांधकाम विभागाला लेखी मागितली असून माझा ५० लाखाचा आमदार निधी दुसऱ्याच मतदारसंघात वापरल्याचा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

 उल्हासनगर महापालिका बांधकाम विभाग रस्त्याच्या डिव्हाईडर ठेका व निकृष्ट कामावरून वादात सापडला आहे. या दरम्यान एकाच विकास कामासाठी महापालिका बांधकाम विभाग राज्य शासन, महापालिका व आमदार निधी अशा तीन निधीचा वापर करीत आहे. असा खळबळजनक आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी करून बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्हे उभे केले. उल्हासनगर, अंबरनाथ व कल्याण पूर्व या तीन मतदारसंघात उल्हासनगर शहर विभागले आहे. कॅम्प नं-१,२ व ३ तसेच म्हारळ, कांबा, वरप गावाचा समावेश उल्हासनगर मतदारसंघात होतो. तर अंबरनाथ व कल्याण पूर्व मतदारसंघात शहर पूर्वेतील कॅम्प नं-४ व ५ परिसराचा समावेश होतो.

 शहराच्या विकासासाठी आमदार कुमार आयलानी यांच्याप्रमाणे आमदार बालाजी किणीकर व गणपत गायकवाड हेही आमदार निधी देतात. आमदार गणपत गायकवाड यांच्या कल्याण पूर्व मतदारसंघात उल्हासनगरातील काही भागाचा समावेश होत असून त्या विभागाच्या विकासासाठी आमदार गायकवाड निधी देतात. मात्र ज्या ठिकाणी गायकवाड यांचा आमदार निधी दिला. त्या निधी पैकी ५० लाखाचा निधी गायकवाड ऐवजी आमदार बालाजी किणीकर यांच्या मतदारसंघात वापरत असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना दिली. तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी अधिक चौकशी केली असता, एकाच विकास कामासाठी बांधकाम विभाग राज्य शासन, महापालिका व आमदार निधी आदी तीन निधीचा वापरत करीत असल्याची माहिती मिळाली. याप्रकारचा भांडाफोड करण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांनी दिलेला आमदार निधी कोणत्या मतदारसंघात वापरला?. यापूर्वी त्या कामासाठी इतर निधी वापरला का? आदी माहिती बांधकाम विभागाला मागितली आहे. 

आमदार गायकवाड यांचे पत्र आले आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या आमदार निधीचा वापर कुठे केला. याबाबतची माहिती लेखी मागविली आहे. अशी माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली. तसेच एका विकास कामासाठी वेगवेगळे तीन निधी वापरले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर