शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

तीन कोटी रुपयांची वीजचोरी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:56 IST

‘महावितरण’च्या कल्याण परिमंडळात वीजचोरांविरुद्ध सुरू असलेली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

डोंबिवली : ‘महावितरण’च्या कल्याण परिमंडळात वीजचोरांविरुद्ध सुरू असलेली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या तीन दिवसांत ९८३ वीजचोरांवर कारवाई करून जवळपास ५० लाख युनिटची वीजचोरी पकडल्याची माहिती कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी शनिवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.कल्याण परिमंडळ कार्यालयाने डोंबिवली, कल्याण, बदलापूर, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, वसई-विरार, नालासोपारा, वाडा, आचोळे, बोईसर, डहाणू, पालघर, जव्हार, मोखाडा, सफाळे, तलासरी, विक्रमगड या भागांत महिनाभरापासून वीजचोरांविरुद्ध मोहीम उघडली होती.या मोहिमेत बुधवारी १५७, गुरुवारी ३८८ तर शुक्रवारी ४३८ जणांकडे सुरू असलेली ५० लाख युनिटची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. त्यातील ८७४ वीजचोरांविरुद्ध वीज कायद्यांतर्गत, १०९ जणांविरुद्ध अन्य कलमांन्वये कारवाई करण्यात आली. मीटरशी छेडछाड किंवा मीटर बायपास करणे तसेच वीजतारांवर थेट आकडे टाकून वीजचोरी असे प्रकार आढळून आले आहेत.अचूक बिल मिळावे, यासाठी मीटर बदलण्याची कार्यवाही सुरू आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या तीन दिवसांत ४५०० सिंगल फेज मीटर बदलण्यात आले आहेत. तर, आणखी ४५ हजार मीटर बदलण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच एप्रिलपासून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांपैकी १०१७ ग्राहक विजेचा चोरटा वापर करीत असल्याचे आढळले असून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. विजेचा अनधिकृतवापर टाळावा, असे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे. अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, सुनील काकडे, अशोक होलमुखे (प्रभारी), किरण नगावकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे.> एप्रिल ते डिसेंबर, २०१९ या नऊ महिन्यांच्या कालावधीत कल्याण परिमंडळात वीजचोरांविरुद्ध ४७ कोटी ६१ लाख रुपयांची दंडात्मक वीजआकारणीची कारवाई करण्यात आली. दंडात्मक वीजआकारणी न भरणाऱ्या २१० जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. २९८ वीजचोरांकडून एक कोटी ४१ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.