शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यावर अत्याचाराचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:17 IST

ठाणे जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष विचारात घेता, शासनस्तरावर त्यादृष्टीने उपाययोजना करणे अपेक्षित होते.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष विचारात घेता, शासनस्तरावर त्यादृष्टीने उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, पाणीटंचाईच्या परिस्थितीत सुधारणा करण्याऐवजी नाशिक-अहमदनगरसाठी ठाण्यात नवे धरण बांधणे हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह जनतेवर अत्याचाराचा कहर आहे.आज राज्याच्या एकूण शहरी लोकसंख्येच्या ४५.२३ टक्के लोकसंख्या मुंबई महानगर प्रदेशात राहते. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. येत्या काळात नैनासह परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर धसई येथे आणखी एक टाउनशिप विकसित करण्यात येत आहे. मात्र, हे करताना पिण्याचे पाणी आणणार कोठून, याचा विचार होताना दिसत नाही. नुसती शेतजमीन संपादित करून ती बिल्डरांच्या आणि विकास प्रकल्पांच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे.महानगर प्रदेशातील शहरी भागातच आजघडीला पाण्याचा सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतका प्रचंड तुटवडा आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११,२७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. २०११ पासून २०१८ पर्यंत लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. बारवीची उंची आणि मध्य वैतरणा वगळता पाण्याच्या स्रोतात तसूभरही वाढ झालेली नाही. सरकारने काळू, शाई, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा, सुसरी, पोशीर यासारखी धरणे जिल्ह्यात प्रस्तावित आहेत. पण, त्यासाठी जमीनच संपादित झालेली नाही. त्यामुळे नाशिक-नगरसाठीच्या नव्या धरणांसाठी जमीन आणणार कोठून, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.मुंबईच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मुंबईची सध्याची पाण्याची मागणी ४७७० दशलक्ष लीटर एवढी आहे. भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, मोडकसागर, विहार या स्रोतांतून ३९८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असून मुंबईला दररोज ७९० दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा जाणवतो. एवढीच मुंबईत पाणीगळती आहे. अख्ख्या पुणे शहराला पुरेल एवढे हे गळतीचे प्रमाण आहे. यातील तुळशी आणि विहार वगळता सर्वच धरणे ठाणे-पालघर जिल्ह्यांत आहेत. तेथील शेतकºयांच्या हजारो हेक्टर शेतजमिनीसह वनजमीन त्याखाली गेलेली आहे.वसई-विरार प्रदेश आणि मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्राची पाण्याची गरज ६३० दशलक्ष लीटर एवढी असून या भागात सूर्या, बारवी, उसगाव, पापडखिंड, पेल्हार या धरणांतून ३२२ द.ली. पाणीपुरवठा होतो. या भागात विहिरी आणि टँकरमधून १५ द.ली. पाणीपुरवठा होत असून सुमारे ३०८ द.ली. इतका प्रचंड तुटवडा आहे.भविष्यात मुंबई शहर ज्या भागात सरकत आहे, त्या कर्जत-खालापूर-खोपोली भागाची पाण्याची सध्याची मागणी ३६ दशलक्ष लीटर असून या परिसराला उल्हास खोºयातून २४ दशलक्ष लीटर पाणीपुरठा होत असल्याने १२ दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा आहे. कर्जत-खोपोलीच्या विकासामुळे अन् मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भविष्यात विकसित होणाºया नगर वसाहतींमुळे पाण्याची मागणी वाढणार आहे.नवी मुंबई विमानतळामुळे ज्या पनवेल, खोपटानगराचा विकास होणार आहे, त्या परिसराची सध्याची पाण्याची गरज ४४ दशलक्ष लीटर आहे. या परिसराला पाताळगंगासह स्थानिक स्रोतांतून १७ दशलक्ष लीटर पाणी मिळत असून २७ दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा आहे. विमानतळ, सेझ, न्हावाशेवा-शिवडी सी लिंक, रेवस-आवरे बंदर यामुळे या परिसराचा येत्या काळात झपाट्याने विकास होणार आहे.शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांची पिण्याच्या पाण्याबाबत अतिशय गंभीर परिस्थिती आहे. शहापूरसारखा तालुका अख्ख्या मुंबईची तहान भागवत असताना तेथील आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याच गावाला केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण विभागाच्या मानकानुसार रोज दरडोई ७० लीटर पाण्याचा पुरवठा होत नाही. सुमारे ६० टक्के गावांना ४० ते ६९ लीटर, २४ टक्के गावांना ४० लीटरच्या खाली तर मुंबईच्या जलवाहिन्या गावांतून जातात. त्यांना अवघा २७ टक्के पाणीपुरवठा होत आहे.>ठाणे-पालघर जिल्ह्यांतील सध्याची धरणे आणि त्यांची मालकीअप्पर वैतरणा मुंबई मनपामध्य वैतरणा मुंबई मनपामोडकसागर मुंबई मनपातानसा मुंबई मनपाभातसा जलसंपदासूर्या मुंबई मनपाउसगाव वसई मनपापेल्हार वसई मनपापापखिंड वसई मनपाआंध्रा धरण टाटा कंपनीबारवी एमआयडीसीचिखलोली जीवन प्राधिकरणवराळा तलाव भिवंडी मनपा