शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाणे जिल्ह्यावर अत्याचाराचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:17 IST

ठाणे जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष विचारात घेता, शासनस्तरावर त्यादृष्टीने उपाययोजना करणे अपेक्षित होते.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष विचारात घेता, शासनस्तरावर त्यादृष्टीने उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, पाणीटंचाईच्या परिस्थितीत सुधारणा करण्याऐवजी नाशिक-अहमदनगरसाठी ठाण्यात नवे धरण बांधणे हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह जनतेवर अत्याचाराचा कहर आहे.आज राज्याच्या एकूण शहरी लोकसंख्येच्या ४५.२३ टक्के लोकसंख्या मुंबई महानगर प्रदेशात राहते. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. येत्या काळात नैनासह परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर धसई येथे आणखी एक टाउनशिप विकसित करण्यात येत आहे. मात्र, हे करताना पिण्याचे पाणी आणणार कोठून, याचा विचार होताना दिसत नाही. नुसती शेतजमीन संपादित करून ती बिल्डरांच्या आणि विकास प्रकल्पांच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे.महानगर प्रदेशातील शहरी भागातच आजघडीला पाण्याचा सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतका प्रचंड तुटवडा आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११,२७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. २०११ पासून २०१८ पर्यंत लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. बारवीची उंची आणि मध्य वैतरणा वगळता पाण्याच्या स्रोतात तसूभरही वाढ झालेली नाही. सरकारने काळू, शाई, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा, सुसरी, पोशीर यासारखी धरणे जिल्ह्यात प्रस्तावित आहेत. पण, त्यासाठी जमीनच संपादित झालेली नाही. त्यामुळे नाशिक-नगरसाठीच्या नव्या धरणांसाठी जमीन आणणार कोठून, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.मुंबईच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मुंबईची सध्याची पाण्याची मागणी ४७७० दशलक्ष लीटर एवढी आहे. भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, मोडकसागर, विहार या स्रोतांतून ३९८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असून मुंबईला दररोज ७९० दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा जाणवतो. एवढीच मुंबईत पाणीगळती आहे. अख्ख्या पुणे शहराला पुरेल एवढे हे गळतीचे प्रमाण आहे. यातील तुळशी आणि विहार वगळता सर्वच धरणे ठाणे-पालघर जिल्ह्यांत आहेत. तेथील शेतकºयांच्या हजारो हेक्टर शेतजमिनीसह वनजमीन त्याखाली गेलेली आहे.वसई-विरार प्रदेश आणि मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्राची पाण्याची गरज ६३० दशलक्ष लीटर एवढी असून या भागात सूर्या, बारवी, उसगाव, पापडखिंड, पेल्हार या धरणांतून ३२२ द.ली. पाणीपुरवठा होतो. या भागात विहिरी आणि टँकरमधून १५ द.ली. पाणीपुरवठा होत असून सुमारे ३०८ द.ली. इतका प्रचंड तुटवडा आहे.भविष्यात मुंबई शहर ज्या भागात सरकत आहे, त्या कर्जत-खालापूर-खोपोली भागाची पाण्याची सध्याची मागणी ३६ दशलक्ष लीटर असून या परिसराला उल्हास खोºयातून २४ दशलक्ष लीटर पाणीपुरठा होत असल्याने १२ दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा आहे. कर्जत-खोपोलीच्या विकासामुळे अन् मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भविष्यात विकसित होणाºया नगर वसाहतींमुळे पाण्याची मागणी वाढणार आहे.नवी मुंबई विमानतळामुळे ज्या पनवेल, खोपटानगराचा विकास होणार आहे, त्या परिसराची सध्याची पाण्याची गरज ४४ दशलक्ष लीटर आहे. या परिसराला पाताळगंगासह स्थानिक स्रोतांतून १७ दशलक्ष लीटर पाणी मिळत असून २७ दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा आहे. विमानतळ, सेझ, न्हावाशेवा-शिवडी सी लिंक, रेवस-आवरे बंदर यामुळे या परिसराचा येत्या काळात झपाट्याने विकास होणार आहे.शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांची पिण्याच्या पाण्याबाबत अतिशय गंभीर परिस्थिती आहे. शहापूरसारखा तालुका अख्ख्या मुंबईची तहान भागवत असताना तेथील आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याच गावाला केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण विभागाच्या मानकानुसार रोज दरडोई ७० लीटर पाण्याचा पुरवठा होत नाही. सुमारे ६० टक्के गावांना ४० ते ६९ लीटर, २४ टक्के गावांना ४० लीटरच्या खाली तर मुंबईच्या जलवाहिन्या गावांतून जातात. त्यांना अवघा २७ टक्के पाणीपुरवठा होत आहे.>ठाणे-पालघर जिल्ह्यांतील सध्याची धरणे आणि त्यांची मालकीअप्पर वैतरणा मुंबई मनपामध्य वैतरणा मुंबई मनपामोडकसागर मुंबई मनपातानसा मुंबई मनपाभातसा जलसंपदासूर्या मुंबई मनपाउसगाव वसई मनपापेल्हार वसई मनपापापखिंड वसई मनपाआंध्रा धरण टाटा कंपनीबारवी एमआयडीसीचिखलोली जीवन प्राधिकरणवराळा तलाव भिवंडी मनपा