शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

जमिनी सोडण्यासाठी धमक्या :शेतकऱ्यांचा आरोप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:42 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या उभारणीमध्ये शहापूर तालुक्यातील मौजे वाशाळा गावची जमीन संपादित होत आहे. तीनहून अधिक पिढ्या वाशाळा येथील आदिवासी शेतकरी येथील जमिनीवर शेती करत आहेत.

शहापूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या उभारणीमध्ये शहापूर तालुक्यातील मौजे वाशाळा गावची जमीन संपादित होत आहे. तीनहून अधिक पिढ्या वाशाळा येथील आदिवासी शेतकरी येथील जमिनीवर शेती करत आहेत. परंतु या शेतकºयांना काही सावकार जमिनीवरचा हक्क सोडण्यासाठी धमकावत असल्याने शेतकºयांनी आपल्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेतली.गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गाच्या पार्श्वभूमीवर येथील काही अधिकाºयांवर विविध आरोप होत असल्याच्या आशयाचे वृत्त येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी घेतलेली ही भेट विशेष अधोरेखित करणारी ठरत आहे. मंगळवारी दुपारी आदिवासी महादेव कोळी समाज संघटनेच्या ४० हून अधिक शेतकरी महिला व पुरु षांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना आपला हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी निवेदन दिले.काही सावकार मंडळी शेतकºयांच्या जमिनीवर आपला हक्क सांगत असून अनेक पिढ्यांपासून या जमिनीवर कष्ट करणाºया शेतकºयांचा हक्क हिसकावून घेत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. तसेच ग्रामपंचायतीत ग्रामसभेच्या ठरावानुसार या जमिनीवर शेतकºयांचा वडीलोेपार्जित हक्क आहे, असा ठराव केला आहे. येथील सावकारांचे असे म्हणणे आहे की ‘‘१०० टक्के जमिनीचा मोबदला शेतकºयांना न देता आम्हाला मिळायला हवा कारण ही जमीन आमच्या नावावर आहे’. तर शेतकºयांच्या म्हणण्यानुसार आम्ही ५० ते ६० वर्षापासून येथील जमिनीवर काबाड कष्ट करत आहोत.अन्याय करणाºयांवर गुन्हा दाखल कराजिल्हाधिकाºयांनी पेसा अंतर्गत कूळकायद्याची योग्य कारवाई करून शेतकºयांवर अन्याय करणाºयांवर आदिवासी कायद्याानुसार गुन्हा दाखल करावा, अशी विनंती आदिवासी महादेव कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तळपाडे यांनी यावेळी केली. त्याचबरोबर यावेळी मौजे वाशाळा बुद्रुक, येथील शेतकºयांनी स्वाक्षरी करु न जमीन संपादनला दिलेली संमतीचे कागदपत्रही जिल्हाधिकाºयांना सुपूर्द केली.