शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

आंबा महोत्सवात ठाणेकरांनी फस्त केले १ कोटींचे आंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:20 IST

ठाण्यात सुरू असलेल्या आंबा महोत्सवात,ठाणेकर नागरिकांनी अवघ्या आठ दिवसात १ कोटी रुपयांचा कोकणातील हापूस आंबे फस्त केले आहेत. तर,शेवटच्या दोन दिवसांमध्ये जवळपास आणखी ४५ लाखांचा आंबे फस्त होण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे.

- पंकज रोडेकरठाणे - ठाण्यात सुरू असलेल्या आंबा महोत्सवात,ठाणेकर नागरिकांनी अवघ्या आठ दिवसात १ कोटी रुपयांचा कोकणातील हापूस आंबे फस्त केले आहेत. तर,शेवटच्या दोन दिवसांमध्ये जवळपास आणखी ४५ लाखांचा आंबे फस्त होण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे. या महोत्सवात एखादा आंबा खराब निघालास त्या बदल्यात दुसरा आंबा दिला जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळ पुरस्कृत आणि संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने ठाण्यात १ ते १० मे दरम्यान हा महोत्सव आयोजिला आहे. यामध्ये प्रामुख्याने देवगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ३५ स्टॉल्स् आहेत. तेथे ४५० रुपये इतका डझनाचा भाव असून दिवसभराच्या सरासरीनुसार या महोत्सवात १,८०० रुपयांच्या ४ डझन असलेल्या २० पेट्यांची खरेदी केली जात आहे. त्यानुसार त्या ३५ स्टॉल्स्वरून २ लाख ८८ हजार डझन आंबे खरेदी केल्यामुळे या महोत्सवात अवघ्या आठ दिवसात १ कोटी ८० हजारांची उलाढाल झाली. तर, शेवटच्या दोन दिवसात आंबे सवलतीत मिळतात, म्हणून आंबे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे या दोन दिवसात जवळपास ४५ लाखांची आणखी उलाढाल होण्याची शक्यता या महोत्सवाचे आयोजक राजेंद्र तावडे यांनी लोकमतशी बोलताना वर्तवली. या महोत्सवाचे हे १३ वर्ष असून मराठी चित्रपटसृष्टीतील विविध मराठी कलाकरांनी आंब्याची चव चाखली आहे.शेतकºयांना महोत्सवात स्टॉल : या महोत्सवात आंब्यांचे मोठे व्यावसायिकांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही स्टॉल्स मिळावेत अशी मागणी होती. पण, शेतकºयांना या महोत्सवात प्रामुख्याने प्राधान्य दिले जाते. ते देताना, त्या शेतकºयांचा सातबारा आणि आंब्यांची झाडे पाहण्यात येतात. त्यामुळे येथे नैसर्गिकरित्या आंबे पिकवले जात असल्याने येथे कोणतीही फसवणूक केली जात नाही. त्यातच खराब आंबा निघालास,पुन्हा आंबा दिला जाण्यात येत आहे.११ एप्रिल ते २७ मे दरम्यान, दादर, ठाणे, विर्लेपाले, बोरीवली आणि मुलुंड या पाच ठिकाणी आंबा महोत्सव भरला जात आहे. त्यानंतर वातावरण आणि पावसाळा लक्षात आंबे विक्री करणे थांबवले जाते. तसेच गतवर्षात ठाण्यात महोत्सवात साधारणता: एक ते दीड कोटी रुपयांचे आंब्यांची उलाढाल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.

टॅग्स :Mangoआंबाthaneठाणे