शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उल्हासनगरात जलवाहिन्यांना गळती, हजारो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST

उल्हासनगर : शहरात पाणीटंचाई असताना खेमानी ते टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याखालील जलवाहिनीला गळती लागून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. ...

उल्हासनगर : शहरात पाणीटंचाई असताना खेमानी ते टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याखालील जलवाहिनीला गळती लागून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे स्थानिकांनी तक्रार करूनही दुरुस्ती करण्यात आली नाही.

उल्हासनगरातील चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर, दुर्गानगर, सुभाष टेकडी, संभाजी चौक आदी परिसरात पाणीटंचाईची स्थिती असताना, दुसरीकडे जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाला कळवूनही दुरुस्ती होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. कॅम्प नं. २ खेमानी परिसरातील टेकडी भागात जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात येत आहे. या वेळी मुख्य जलवाहिन्यांसह अन्य जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. रस्त्याच्या मधोमध पाच फुटांचा खड्डा पडल्याने, मोठा अपघात होण्याची भीती मनसेचे पदाधिकारी प्रवीण माळवे यांनी व्यक्त केली आहे.

महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. मात्र अद्यापही जलवाहिनीची गळती बंद केली नसल्याने पाणी गटारात जात असल्याचे चित्र आहे. शहरात जलवाहिनीला गळती लागण्याच्या प्रमाणात वाढ होऊनही गळती बंद केली जात नसल्याचा आरोप होत आहे. रस्त्याचे बांधकाम व जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली.