शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

उल्हासनगर खेमानी येथे जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 18:18 IST

उल्हासनगर शहरात पाणी टंचाई निर्माण झाली असताना दुसरीकडे खेमानी परिसरात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरात पाणी टंचाई निर्माण झाली असताना दुसरीकडे खेमानी परिसरात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. महापालिका पाणी पुरवठा विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.

उल्हासनगरात पाणी वितरण अनियमित होत असल्याने, अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली. गेल्या आठवड्यात चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर मधील पाणी टंचाईच्या निषेधार्थ महिला रस्त्यावर उतरून त्यांनी रस्ता रोखो आंदोलन केले. महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रहेजा यांनी दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करतो. असे आश्वासन महिलांना देऊन घरी पाठविले होते. मात्र दोन दिवसानंतरही पाणी पुरवठा नियमित झाला नसल्याच्या निषेधार्थ महिलांनी महापालिकेवर धडक देऊन पाणी टंचाई बाबत जाब विचारला. शहर पूर्वेत अनेक भागात दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. असे असताना दुसरीकडे खेमानी परिसरात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी खाली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रभाग अधिकारी, प्रभाग सभापती यांच्यासह पाणी पुरवठा विभागाला माहिती देऊनही जलवाहिनीची दुरुस्ती करण्यास कर्मचारी येत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

 महापालिका पाणी पुरवठा विभाग ढिम्म असल्याने, शहरात ३० टक्के पेक्षा जास्त पाणी गळती होत असल्याचे बोलले जाते. शहरवासीयांना मुबलक व नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी काही वर्षांपूर्वी ३५० कोटींची पाणी वितरण योजना राबवून शहरभर नवीन जलवाहिन्या टाकून जलकुंभ व बूस्टर पंप मशीन बसविण्यात आले. मात्र योजना योग्य रीतीने राबविली नसल्याने, पाणी वितरण योजना फसल्याची टीका होत आहे. खेमानी येथील जलवाहिनी फुटल्या बाबत विभागाचे कार्यकारी अभियंता रहेजा यांना संपर्क साधला असता झाला नाही.

टॅग्स :Waterपाणी