शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

एसआरएच्या जागेवरील कारवाईमुळे  ठाणेच्या सुभाषनगरमधील १०० पेक्षा अधिक घरे  जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 18:46 IST

सुमारे ११४ पेक्षा अधिक घरांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कारवाईला रहिवाशांनी विरोध न करता प्रतिसाद दिल्यामुळे कारवाई यशस्वी झाल्याचे येथील एसआरएच्या उपजिल्हाधिकारी दिप्ती सूर्यवंशी यांनी लोकमतला सांगितले.

ठळक मुद्देसुमारे सात एकरच्या या भूखंडावर रहिवाशांसाठी एसआरए योजना सुमारे २६० घरांचा प्रस्ताव आहे. यातील ११९ घरे तोडणे अपेक्षित भाड्याचे घरे घेऊन निवास व्यवस्था केली आहेइमारत बांधूनपूर्ण होईपर्यंत विकासकाला घर भाडे द्यावे लागेल

ठाणे : येथील पोखरणरोड नं. २वरील सुभाषनगर परिसरातील एसआरएच्या जागेवरील घरे तोडण्यासाठी शुक्रवारी धडक कारवाई करण्यात आली. पात्र असलेल्या या रहिवाशांना एसआरएचे घरे बांधून देण्यासाठी ही कारवाई केली. सुमारे ११४ पेक्षा अधिक घरांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कारवाईला रहिवाशांनी विरोध न करता प्रतिसाद दिल्यामुळे कारवाई यशस्वी झाल्याचे येथील एसआरएच्या उपजिल्हाधिकारी दिप्ती सूर्यवंशी यांनी लोकमतला सांगितले.तोडण्यात आलेले घरे एसआरएच्या जागेवर आहे. त्यातील रहिवाशी एसआरए योजनेस पात्र आहे. त्या जागेवर एसआरएव्दारे इमारती बांधणे अपेक्षित आहे. त्यासाठी जागा मोकळी होणे गरजेचे असल्यामुळे ही कारवाई झाली. मात्र त्या आधी या रहिवाशांची अन्यत्र निवास व्यवस्था करण्यात आली असून काही रहिवाशी ट्रॅस्टीट कॅम्पमध्ये तर काहींनी भाड्याचे घरे घेऊन निवास व्यवस्था केली आहे. यासाठी संबंधीत विकासकांने रहिवाशाना घराचे भाडे देऊन अन्यत्र व्यवस्था केली आहे. इमारत बांधूनपूर्ण होईपर्यंत विकासकाला घर भाडे द्यावे लागेल. त्यात दरवर्षी १० टक्के वाढ करण्याची ही तरतूद आहे. मात्र रहिवाशांना याची खात्री पटत नव्हती., त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे बहुतांशी लोकांनी घरे खाली केली नव्हती. त्यांच्यातील मतभेद व विकासकाशी जुळवून न घेण्याचा वादही होता. पण आता त्यांना खात्री पटवून दिली आहे. यामुळे ११४ रहिवाशाना नोटीस काढून घरे तोडण्यात आली. त्यांनी आधीच आपले साहित्य अन्यत्र हलवले असल्यामुळे कारवाईला विरोध झालेला नसून शांततेत व निर्विघ्न कारवाई करता आल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.सुमारे सात एकरच्या या भूखंडावर रहिवाशांसाठी एसआरए योजना राबवण्यात येत आहेत. येथील सर्व रहिवाशी या योजनेस पात्र आहेत. पण अविश्वास आणि मतभेद, वादविवादातून ते घरे सोडण्यास तयार नव्हते. त्यातील काहींच्या तक्रारीही होत्या. याकडे लक्ष केंद्रीत करून आजही कारवाई करण्यात आली. या भूखंडवरील काही घरे धोकादायक असल्याचे टीएमसीने आधीच घोषीत केलेले आहेत. येथील सुमारे २६० घरांचा प्रस्ताव आहे. यातील ११९ घरे तोडणे अपेक्षित आहे. त्यातील ११४ घरांना नोटीस काढून ही कारवाई केली. पण यापेक्षा जास्त घरांवरील कारवाईसाठी रहिवाशांनी प्रतिसाद दिल्यामुळे ते शक्य झाले. कोणीही विरोध दर्शवला नसल्याचा दावा सूर्यवंशी यांनी केला. या कारवाईसाठी ११० जणांच्या मनुष्यबळासह १०० पेक्षा अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी, काही बुल्डोझर आणि कर्मचाऱ्यांनी या घरांवर कारवाई केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेcity chowkसिटी चौक