शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

एसआरएच्या जागेवरील कारवाईमुळे  ठाणेच्या सुभाषनगरमधील १०० पेक्षा अधिक घरे  जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 18:46 IST

सुमारे ११४ पेक्षा अधिक घरांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कारवाईला रहिवाशांनी विरोध न करता प्रतिसाद दिल्यामुळे कारवाई यशस्वी झाल्याचे येथील एसआरएच्या उपजिल्हाधिकारी दिप्ती सूर्यवंशी यांनी लोकमतला सांगितले.

ठळक मुद्देसुमारे सात एकरच्या या भूखंडावर रहिवाशांसाठी एसआरए योजना सुमारे २६० घरांचा प्रस्ताव आहे. यातील ११९ घरे तोडणे अपेक्षित भाड्याचे घरे घेऊन निवास व्यवस्था केली आहेइमारत बांधूनपूर्ण होईपर्यंत विकासकाला घर भाडे द्यावे लागेल

ठाणे : येथील पोखरणरोड नं. २वरील सुभाषनगर परिसरातील एसआरएच्या जागेवरील घरे तोडण्यासाठी शुक्रवारी धडक कारवाई करण्यात आली. पात्र असलेल्या या रहिवाशांना एसआरएचे घरे बांधून देण्यासाठी ही कारवाई केली. सुमारे ११४ पेक्षा अधिक घरांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कारवाईला रहिवाशांनी विरोध न करता प्रतिसाद दिल्यामुळे कारवाई यशस्वी झाल्याचे येथील एसआरएच्या उपजिल्हाधिकारी दिप्ती सूर्यवंशी यांनी लोकमतला सांगितले.तोडण्यात आलेले घरे एसआरएच्या जागेवर आहे. त्यातील रहिवाशी एसआरए योजनेस पात्र आहे. त्या जागेवर एसआरएव्दारे इमारती बांधणे अपेक्षित आहे. त्यासाठी जागा मोकळी होणे गरजेचे असल्यामुळे ही कारवाई झाली. मात्र त्या आधी या रहिवाशांची अन्यत्र निवास व्यवस्था करण्यात आली असून काही रहिवाशी ट्रॅस्टीट कॅम्पमध्ये तर काहींनी भाड्याचे घरे घेऊन निवास व्यवस्था केली आहे. यासाठी संबंधीत विकासकांने रहिवाशाना घराचे भाडे देऊन अन्यत्र व्यवस्था केली आहे. इमारत बांधूनपूर्ण होईपर्यंत विकासकाला घर भाडे द्यावे लागेल. त्यात दरवर्षी १० टक्के वाढ करण्याची ही तरतूद आहे. मात्र रहिवाशांना याची खात्री पटत नव्हती., त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे बहुतांशी लोकांनी घरे खाली केली नव्हती. त्यांच्यातील मतभेद व विकासकाशी जुळवून न घेण्याचा वादही होता. पण आता त्यांना खात्री पटवून दिली आहे. यामुळे ११४ रहिवाशाना नोटीस काढून घरे तोडण्यात आली. त्यांनी आधीच आपले साहित्य अन्यत्र हलवले असल्यामुळे कारवाईला विरोध झालेला नसून शांततेत व निर्विघ्न कारवाई करता आल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.सुमारे सात एकरच्या या भूखंडावर रहिवाशांसाठी एसआरए योजना राबवण्यात येत आहेत. येथील सर्व रहिवाशी या योजनेस पात्र आहेत. पण अविश्वास आणि मतभेद, वादविवादातून ते घरे सोडण्यास तयार नव्हते. त्यातील काहींच्या तक्रारीही होत्या. याकडे लक्ष केंद्रीत करून आजही कारवाई करण्यात आली. या भूखंडवरील काही घरे धोकादायक असल्याचे टीएमसीने आधीच घोषीत केलेले आहेत. येथील सुमारे २६० घरांचा प्रस्ताव आहे. यातील ११९ घरे तोडणे अपेक्षित आहे. त्यातील ११४ घरांना नोटीस काढून ही कारवाई केली. पण यापेक्षा जास्त घरांवरील कारवाईसाठी रहिवाशांनी प्रतिसाद दिल्यामुळे ते शक्य झाले. कोणीही विरोध दर्शवला नसल्याचा दावा सूर्यवंशी यांनी केला. या कारवाईसाठी ११० जणांच्या मनुष्यबळासह १०० पेक्षा अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी, काही बुल्डोझर आणि कर्मचाऱ्यांनी या घरांवर कारवाई केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेcity chowkसिटी चौक