शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

दरडीच्या सावटाखाली १४ ठिकाणची हजारो कुटुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

ठाणे : कळवा येथील घोलाईनगरात झालेल्या दुर्घटनेनंतर डोंगरावरील किंवा पायथ्याला असलेल्या हजारो कुटुंबांना या घटनेने आता धोक्याची घंटा ...

ठाणे : कळवा येथील घोलाईनगरात झालेल्या दुर्घटनेनंतर डोंगरावरील किंवा पायथ्याला असलेल्या हजारो कुटुंबांना या घटनेने आता धोक्याची घंटा दिली आहे. आजही महापालिकेने जाहीर केलेल्या १४ ठिकाणांवरील हजारो कुटुंबापुढे टांगती तलवार आली आहे. येथील रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यापलीकडे कारवाई अद्यापही झालेली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्यातही अशा बांधकामांना परवानगी कशी दिली जाते, वीज, पाणी आदींची व्यवस्था कोण करते? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

घोलाईनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर डोंगराजवळ आणि नाल्याजवळील उभारलेल्या घरांमधील हजारो कुटुंबांचा आता जीव टांगणीला लागला आहे. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज असते. त्यानुसार भूस्खलन आणि सखल भागांची यादी तयार करण्यात येत असते. त्यानुसार ठाणे महापालिकेने शहरातील १४ ठिकाणी हा धोका असल्याचे सांगून त्यांची यादीदेखील प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी अशी यादी तयार करून रहिवाशांना नोटिसा बजावून घरे खाली करण्याचेही सांगितले जाते. परंतु पुढील कारवाई काही होताना दिसत नाही. त्यात मागील वर्षापासून कोरोनाच्या सावटाखाली ठाणेकर जगत असल्याने आता त्यात पावसाळ्यात पुन्हा अशाप्रकारे नोटीस बजावण्याची कारवाई सुरू झाल्याने येथील नागरिक हवालदील झाले होते. सोमवारी घोलाईनगरला घडलेल्या दुर्घटनेनंतर हा भागही याच यादीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता तरी महापालिका प्रशासन जागे होऊन येथील रहिवाशांना येथून हलविणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. याशिवाय मतांच्या राजकारणासाठीदेखील येथील रहिवाशांना हलविण्यासाठी राजकीय मंडळी पुढे येत नसल्याचेही वास्तव समोर आले आहे..

ही आहेत १४ ठिकाणे

मुंब्रा, लोकमान्यनगर, कळवा, माजिवडा मानपाडा या भागांतील काही ठिकाणांचा त्यात समावेश आहे. त्यानुसार लोकमान्यनगर भागातील गुरुदेव आश्रम जवळ, उपवन, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत डोंगरीपाडा, पातलीपाडा आणि कळशीपाडा यांचा समावेश आहे. कळव्यात - आतकोनेश्वरनगर, पौंड पाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबानगर, भास्करनगर आदींचा समावेश आहे. तसेच मुंब्य्रातील आझादनगर, गावदेवी मंदिरलगत, केणीनगर, सैनिकनगर आणि कैलासनगरचा समावेश आहे.