शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

दरडीच्या सावटाखाली १४ ठिकाणची हजारो कुटुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

ठाणे : कळवा येथील घोलाईनगरात झालेल्या दुर्घटनेनंतर डोंगरावरील किंवा पायथ्याला असलेल्या हजारो कुटुंबांना या घटनेने आता धोक्याची घंटा ...

ठाणे : कळवा येथील घोलाईनगरात झालेल्या दुर्घटनेनंतर डोंगरावरील किंवा पायथ्याला असलेल्या हजारो कुटुंबांना या घटनेने आता धोक्याची घंटा दिली आहे. आजही महापालिकेने जाहीर केलेल्या १४ ठिकाणांवरील हजारो कुटुंबापुढे टांगती तलवार आली आहे. येथील रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यापलीकडे कारवाई अद्यापही झालेली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्यातही अशा बांधकामांना परवानगी कशी दिली जाते, वीज, पाणी आदींची व्यवस्था कोण करते? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

घोलाईनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर डोंगराजवळ आणि नाल्याजवळील उभारलेल्या घरांमधील हजारो कुटुंबांचा आता जीव टांगणीला लागला आहे. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज असते. त्यानुसार भूस्खलन आणि सखल भागांची यादी तयार करण्यात येत असते. त्यानुसार ठाणे महापालिकेने शहरातील १४ ठिकाणी हा धोका असल्याचे सांगून त्यांची यादीदेखील प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी अशी यादी तयार करून रहिवाशांना नोटिसा बजावून घरे खाली करण्याचेही सांगितले जाते. परंतु पुढील कारवाई काही होताना दिसत नाही. त्यात मागील वर्षापासून कोरोनाच्या सावटाखाली ठाणेकर जगत असल्याने आता त्यात पावसाळ्यात पुन्हा अशाप्रकारे नोटीस बजावण्याची कारवाई सुरू झाल्याने येथील नागरिक हवालदील झाले होते. सोमवारी घोलाईनगरला घडलेल्या दुर्घटनेनंतर हा भागही याच यादीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता तरी महापालिका प्रशासन जागे होऊन येथील रहिवाशांना येथून हलविणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. याशिवाय मतांच्या राजकारणासाठीदेखील येथील रहिवाशांना हलविण्यासाठी राजकीय मंडळी पुढे येत नसल्याचेही वास्तव समोर आले आहे..

ही आहेत १४ ठिकाणे

मुंब्रा, लोकमान्यनगर, कळवा, माजिवडा मानपाडा या भागांतील काही ठिकाणांचा त्यात समावेश आहे. त्यानुसार लोकमान्यनगर भागातील गुरुदेव आश्रम जवळ, उपवन, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत डोंगरीपाडा, पातलीपाडा आणि कळशीपाडा यांचा समावेश आहे. कळव्यात - आतकोनेश्वरनगर, पौंड पाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबानगर, भास्करनगर आदींचा समावेश आहे. तसेच मुंब्य्रातील आझादनगर, गावदेवी मंदिरलगत, केणीनगर, सैनिकनगर आणि कैलासनगरचा समावेश आहे.