शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

दरडीच्या सावटाखाली १४ ठिकाणची हजारो कुटुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

ठाणे : कळवा येथील घोलाईनगरात झालेल्या दुर्घटनेनंतर डोंगरावरील किंवा पायथ्याला असलेल्या हजारो कुटुंबांना या घटनेने आता धोक्याची घंटा ...

ठाणे : कळवा येथील घोलाईनगरात झालेल्या दुर्घटनेनंतर डोंगरावरील किंवा पायथ्याला असलेल्या हजारो कुटुंबांना या घटनेने आता धोक्याची घंटा दिली आहे. आजही महापालिकेने जाहीर केलेल्या १४ ठिकाणांवरील हजारो कुटुंबापुढे टांगती तलवार आली आहे. येथील रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यापलीकडे कारवाई अद्यापही झालेली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्यातही अशा बांधकामांना परवानगी कशी दिली जाते, वीज, पाणी आदींची व्यवस्था कोण करते? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

घोलाईनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर डोंगराजवळ आणि नाल्याजवळील उभारलेल्या घरांमधील हजारो कुटुंबांचा आता जीव टांगणीला लागला आहे. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज असते. त्यानुसार भूस्खलन आणि सखल भागांची यादी तयार करण्यात येत असते. त्यानुसार ठाणे महापालिकेने शहरातील १४ ठिकाणी हा धोका असल्याचे सांगून त्यांची यादीदेखील प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी अशी यादी तयार करून रहिवाशांना नोटिसा बजावून घरे खाली करण्याचेही सांगितले जाते. परंतु पुढील कारवाई काही होताना दिसत नाही. त्यात मागील वर्षापासून कोरोनाच्या सावटाखाली ठाणेकर जगत असल्याने आता त्यात पावसाळ्यात पुन्हा अशाप्रकारे नोटीस बजावण्याची कारवाई सुरू झाल्याने येथील नागरिक हवालदील झाले होते. सोमवारी घोलाईनगरला घडलेल्या दुर्घटनेनंतर हा भागही याच यादीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता तरी महापालिका प्रशासन जागे होऊन येथील रहिवाशांना येथून हलविणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. याशिवाय मतांच्या राजकारणासाठीदेखील येथील रहिवाशांना हलविण्यासाठी राजकीय मंडळी पुढे येत नसल्याचेही वास्तव समोर आले आहे..

ही आहेत १४ ठिकाणे

मुंब्रा, लोकमान्यनगर, कळवा, माजिवडा मानपाडा या भागांतील काही ठिकाणांचा त्यात समावेश आहे. त्यानुसार लोकमान्यनगर भागातील गुरुदेव आश्रम जवळ, उपवन, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत डोंगरीपाडा, पातलीपाडा आणि कळशीपाडा यांचा समावेश आहे. कळव्यात - आतकोनेश्वरनगर, पौंड पाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबानगर, भास्करनगर आदींचा समावेश आहे. तसेच मुंब्य्रातील आझादनगर, गावदेवी मंदिरलगत, केणीनगर, सैनिकनगर आणि कैलासनगरचा समावेश आहे.