शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ठाणे कारागृहात कैद्यांचे कला‘चिंतन’! एकाहून एक सरस चित्र, चिंतन उपाध्याय या आंतरराष्ट्रीय कलाकाराचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 06:05 IST

एकेकाळी गंभीर गुन्ह्यांनी बरबटलेले ठाणे कारागृहातील कैद्यांचे हात आता कुंचल्यांवर फिरू लागले आहेत. चिंतन उपाध्याय यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराच्या सहवासात या कैद्यांनी एकापेक्षा एक सरस कलाकृती चितारल्या आहेत.

- राजू ओढे ठाणे : एकेकाळी गंभीर गुन्ह्यांनी बरबटलेले ठाणे कारागृहातील कैद्यांचे हात आता कुंचल्यांवर फिरू लागले आहेत. चिंतन उपाध्याय यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराच्या सहवासात या कैद्यांनी एकापेक्षा एक सरस कलाकृती चितारल्या आहेत.पत्नी आणि तिच्या वकिलाचा खून केल्याच्या आरोपाखाली प्रख्यात चित्रकार चिंतन उपाध्याय यांना दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. ते सध्या ठाणे कारागृहात आहेत. कारागृहातील त्यांच्या सहवासातून इतर कैद्यांमध्ये दडलेल्या कलाकारास चालना मिळावी, कारागृहाच्या रूक्ष दिनचर्येतून कैद्यांना दोन क्षण आनंदाचे घालवता यावे, यादृष्टीने जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांनी अभिनव उपक्रम सुरू केला. त्यानुसार, चित्रकला शिकू इच्छिणाºया कैद्यांना आॅगस्ट महिन्यात चिंतन उपाध्याय यांच्या मदतीने प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. कारागृहातील ९ कैद्यांनी या कलेमध्ये रुची दाखवली. त्यांना पेन्सील किंवा स्केच पेनने चित्रे रंगवण्याची आवड होती. ब्रशने चित्र रंगवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. उपाध्याय यांनी कैद्यांना काल्पनिक चित्रे रंगवण्यास सांगितले.कारागृहाचे रूक्ष जीवन आणि आप्तेष्टांचा विरह सहन करणाºया या कैद्यांनी अतिशय आकर्षक कलाकृती चितारल्या. बहुतेक कैद्यांच्या कलाकृतींमध्ये त्यांच्या रूक्ष जीवनाचे प्रतिबिंब उमटले. कैद्यांनी केलेल्या १० ते १२ कलाकृती कारागृहामध्ये तयार आहेत. या कलाकृतींची प्रदर्शनी कारागृह परिसरात लवकरच आयोजित केली जाणार असल्याची माहिती नितीन वायचळ यांनी दिली. राज्यातील इतर कारागृहांमध्येही अशाच प्रकारचे काही उपक्रम राबवण्यात आले होते. या सर्व कलाकृतींची एकत्रित प्रदर्शनी कमलनयन बजाज आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे वायचळ यांनी सांगितले.कारागृहात कैद्यांची दिनचर्या ठरलेली असते. पश्चात्तापाची भावना त्यांच्या मनात घर करून असते. समाजाचा रोष आणि आप्तेष्टांचा विरह सहन करून त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. या परिस्थितीतून काही क्षण का होईना कैद्यांना बाहेर पडता यावे, या एकमेव उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला होता. सुदैवाने चिंतन उपाध्याय यांच्यासारख्या ख्यातनाम कलाकाराची साथ लाभली आणि हा उपक्रम यशस्वी होऊ शकला.- नितीन वायचळ,- तुरुंग अधीक्षक,जिल्हा मध्यवर्ती कारागृह, ठाणे