शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नाराज अध्यक्षांचा सेनाप्रवेश? प्रताप सरनाईकांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:59 IST

मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना पक्षांतर्गत कार्यकारी नियुक्तीची प्रक्रीया १८ महिने लांब असतानाच स्थानिक नेतृत्वाने शहरातील १२ निष्ठावंत मंडळ अध्यक्षांना विश्वासात न घेता त्यांची परस्पर पदावरून हकालपट्टी केली. भाजपाच्या या मनमानी कारभारामुळे नाराज झालेले ते माजी मंडळ अध्यक्ष आपल्या संपर्कात असून ते सेनेतील प्रवेशासाठी आतूर झाल्याचा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला आहे. ‘लोकमत’च्या गुरूवारच्या अंकात ‘भाजपाला पडणार खिंडार’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी दावा केला.

राजू काळे भाईंदर : मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना पक्षांतर्गत कार्यकारी नियुक्तीची प्रक्रीया १८ महिने लांब असतानाच स्थानिक नेतृत्वाने शहरातील १२ निष्ठावंत मंडळ अध्यक्षांना विश्वासात न घेता त्यांची परस्पर पदावरून हकालपट्टी केली.भाजपाच्या या मनमानी कारभारामुळे नाराज झालेले ते माजी मंडळ अध्यक्ष आपल्या संपर्कात असून ते सेनेतील प्रवेशासाठी आतूर झाल्याचा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला आहे. ‘लोकमत’च्या गुरूवारच्या अंकात ‘भाजपाला पडणार खिंडार’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी दावा केला.भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सल्ल्याचा आधार घेत कुणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू केला आहे. पालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षातील पदाधिकाºयांना पदांचे व उमेदवारीचे गाजर दाखवून निष्ठावंतांची गळचेपी सुरू केली आहे. एकहाती सत्तेचा दुरूपयोग भाजपाकडून होत असून आपल्या शब्दालाच हुकमी पत्ता ठरवून स्थानिक नेतृत्वाचा मनमानी कारभार चालला आहे. शहरातील विकासाला चालना देणारा विरोधकांचा ठराव बहुमताच्या जोरावर सत्ताधारी अमान्य करत असून प्रशासनाच्या मान्यतेलाही मातीमोल ठरवू लागले आहेत, असे सरनाईक यांनी सांगितले.प्रशासनही बेकायदा व मनमानी कारभार चालवणाºया सत्ताधाºयांच्या दबावाखाली काम करत आहेत. हेच दबावतंत्र भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने गटबाजीच्या नावाखाली अवलंबण्यास सुरूवात केली आहे. पालिका निवडणुकीत निष्ठावंतांनी जीवाचे रान केले. परंतु, त्यांना पराभूत करून समर्थकांच्या विजयासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप पक्षांतर्गत होऊ लागला आहे. अशातच त्या निष्ठावंतांना पक्षाच्या मुख्य प्रवाहातूनच बाजूला सारण्याची प्रक्रीया स्थानिक नेतृत्वाने केल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.‘ओखी’प्रमाणेच ‘नमो’ चे वादळ संपुष्टात येऊ लागले आहे. ‘ओखी’ने अनेकांचे नुकसान केले तर ‘नमो’च्या वादळाने देशातील सर्वांचेच नुकसान केले आहे. त्याची परफेड यंदाच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत मतदारांनी करण्यास सुरूवात केल्याचा दावा त्यांनी केला आहे. सत्तेची मस्ती चढलेल्या भाजपापासून काडीमोड घेण्याचा निर्णय नाराज मंडळ अध्यक्षांनी घेतला असल्याचे ते म्हणाले. आता हे सर्व नाराज मंडळ अध्यक्ष शिवसेनेत कधी प्रवेश करतात, हे लवकरच कळेल.

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणे