शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

‘त्या’ २७ गावांत आता लढाई अटळ

By admin | Updated: October 17, 2015 01:50 IST

शेवटपर्यंत समेटाची अपेक्षा बाळगणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीसह शिवसेनेने शुक्रवारी एकही अर्ज मागे न घेतल्याने निवडणुकीला सामोरे जाण्याची पाळी सर्वांवर आली

अरविंद म्हात्रे, चिकणघरशेवटपर्यंत समेटाची अपेक्षा बाळगणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीसह शिवसेनेने शुक्रवारी एकही अर्ज मागे न घेतल्याने निवडणुकीला सामोरे जाण्याची पाळी सर्वांवर आली. यामुळे आता संघर्ष समिती आणि शिवसेना यांच्यात सरळ सामना होणार आहे. येथील २१ प्रभागांपैकी ११३ अणि १०५ या दोन प्रभागांतील उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे आणि प्रभाग ११४ आणि ११९ या दोन प्रभागांत कोणीच अर्ज न भरल्याने एकूण चार प्रभागांत निवडणूक होणार नसून २१ पैकी १७ प्रभागांतच ती होईल. मात्र, शिवसेना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, आरपीआय, समाजवादी पक्ष असे सर्वपक्षीय असल्याने १७ जागांसाठी सरळ सामना असल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसेना आणि समिती दोघेही आपापल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. आपला महापौर बसवण्यासाठी २७ गावांवर सुरुवातीपासून लक्ष केंद्रित करणाऱ्या शिवसेनेला आता ही निवडणूक फार सोपी जाणार नाही, असे वातावरण करण्यात संघर्ष समिती आधीच यशस्वी झालेली आहे. २१ पैकी केवळ १७ जागांवरच्या लढाईवर शिक्कामोर्तब झाले आहे. >> निवडणुकीनंतर दिसणार सेनेची ताकद?१५ तारखेपासून शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून समितीच्या लोकांनी त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीच शिवसेना नेत्यांनी अपल्या उमेदवारांना बाहेर हलविल्याने समितीचा अपेक्षाभंग झाला. यामुळे आता लढण्यावर भर देऊन किमान १५ जागा समिती जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. तर, २७ गावांत शिवसेनेची ताकद निवडणुकीनंतर दिसेल, असे सूचक उद्गार शिवसेनेच्या नेत्यांनी काढले.