शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

‘त्या’ २७ गावांत आता लढाई अटळ

By admin | Updated: October 17, 2015 01:50 IST

शेवटपर्यंत समेटाची अपेक्षा बाळगणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीसह शिवसेनेने शुक्रवारी एकही अर्ज मागे न घेतल्याने निवडणुकीला सामोरे जाण्याची पाळी सर्वांवर आली

अरविंद म्हात्रे, चिकणघरशेवटपर्यंत समेटाची अपेक्षा बाळगणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीसह शिवसेनेने शुक्रवारी एकही अर्ज मागे न घेतल्याने निवडणुकीला सामोरे जाण्याची पाळी सर्वांवर आली. यामुळे आता संघर्ष समिती आणि शिवसेना यांच्यात सरळ सामना होणार आहे. येथील २१ प्रभागांपैकी ११३ अणि १०५ या दोन प्रभागांतील उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे आणि प्रभाग ११४ आणि ११९ या दोन प्रभागांत कोणीच अर्ज न भरल्याने एकूण चार प्रभागांत निवडणूक होणार नसून २१ पैकी १७ प्रभागांतच ती होईल. मात्र, शिवसेना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, आरपीआय, समाजवादी पक्ष असे सर्वपक्षीय असल्याने १७ जागांसाठी सरळ सामना असल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसेना आणि समिती दोघेही आपापल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. आपला महापौर बसवण्यासाठी २७ गावांवर सुरुवातीपासून लक्ष केंद्रित करणाऱ्या शिवसेनेला आता ही निवडणूक फार सोपी जाणार नाही, असे वातावरण करण्यात संघर्ष समिती आधीच यशस्वी झालेली आहे. २१ पैकी केवळ १७ जागांवरच्या लढाईवर शिक्कामोर्तब झाले आहे. >> निवडणुकीनंतर दिसणार सेनेची ताकद?१५ तारखेपासून शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून समितीच्या लोकांनी त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीच शिवसेना नेत्यांनी अपल्या उमेदवारांना बाहेर हलविल्याने समितीचा अपेक्षाभंग झाला. यामुळे आता लढण्यावर भर देऊन किमान १५ जागा समिती जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. तर, २७ गावांत शिवसेनेची ताकद निवडणुकीनंतर दिसेल, असे सूचक उद्गार शिवसेनेच्या नेत्यांनी काढले.