शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ २७ गावांत आता लढाई अटळ

By admin | Updated: October 17, 2015 01:50 IST

शेवटपर्यंत समेटाची अपेक्षा बाळगणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीसह शिवसेनेने शुक्रवारी एकही अर्ज मागे न घेतल्याने निवडणुकीला सामोरे जाण्याची पाळी सर्वांवर आली

अरविंद म्हात्रे, चिकणघरशेवटपर्यंत समेटाची अपेक्षा बाळगणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीसह शिवसेनेने शुक्रवारी एकही अर्ज मागे न घेतल्याने निवडणुकीला सामोरे जाण्याची पाळी सर्वांवर आली. यामुळे आता संघर्ष समिती आणि शिवसेना यांच्यात सरळ सामना होणार आहे. येथील २१ प्रभागांपैकी ११३ अणि १०५ या दोन प्रभागांतील उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे आणि प्रभाग ११४ आणि ११९ या दोन प्रभागांत कोणीच अर्ज न भरल्याने एकूण चार प्रभागांत निवडणूक होणार नसून २१ पैकी १७ प्रभागांतच ती होईल. मात्र, शिवसेना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, आरपीआय, समाजवादी पक्ष असे सर्वपक्षीय असल्याने १७ जागांसाठी सरळ सामना असल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसेना आणि समिती दोघेही आपापल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. आपला महापौर बसवण्यासाठी २७ गावांवर सुरुवातीपासून लक्ष केंद्रित करणाऱ्या शिवसेनेला आता ही निवडणूक फार सोपी जाणार नाही, असे वातावरण करण्यात संघर्ष समिती आधीच यशस्वी झालेली आहे. २१ पैकी केवळ १७ जागांवरच्या लढाईवर शिक्कामोर्तब झाले आहे. >> निवडणुकीनंतर दिसणार सेनेची ताकद?१५ तारखेपासून शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून समितीच्या लोकांनी त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीच शिवसेना नेत्यांनी अपल्या उमेदवारांना बाहेर हलविल्याने समितीचा अपेक्षाभंग झाला. यामुळे आता लढण्यावर भर देऊन किमान १५ जागा समिती जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. तर, २७ गावांत शिवसेनेची ताकद निवडणुकीनंतर दिसेल, असे सूचक उद्गार शिवसेनेच्या नेत्यांनी काढले.