शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde : "हे सरकार टिकणार कारण हे सर्वसामान्य जनतेचं सरकार"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

By अजित मांडके | Updated: August 26, 2022 15:29 IST

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले, आनंद दिघें आपल्यात शरीराने नसले तरी मनाने आपल्या सोबत आहेत. त्याची प्रचिती येते. जिल्ह्यात त्यांनी अलौकिक कार्य केले.

ठाणे - आजही काही लोकं म्हणतात हे सरकार राहणार नाही, मात्र हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे, त्यामुळे ते टिकणारच असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांना लगावला आहे. काही लोकांना ते हजम होत नाही, घशाखाली उतरत नाही की एकनाथ शिंदे कसा हा डोलारा सांभाळतील मात्र बाळासाहेब ठाकरे आणि या आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून दोन महिन्यात ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्वसामान्य जनतेला न्याय हाच आमचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.

आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शक्तीस्थळावर येऊन त्यांनी आनंद दिघें यांना अभिवादन केले. त्यानंतर आनंद दिघें यांच्या आठवणींना उजाळा देताना विरोधकांचाही समाचार घेतला. एकनाथ शिंदे म्हणाले, आनंद दिघें आपल्यात शरीराने नसले तरी मनाने आपल्या सोबत आहेत. त्याची प्रचिती येते. जिल्ह्यात त्यांनी अलौकिक कार्य केले. त्यांच्यावरील सिनेमात त्यांचा सर्व जीवनपट उघडू शकत नाही. त्यांचा त्याग आपण पहिला. बाळासाहेबांचं हिंदुत्व त्यांनी पोहचवले आणि त्याची पोचपावती जनतेने दिली. त्यांचं आपल्यातून निघून जाणं ही वेदना आहे आपण जो इतिहास घडवला त्यामागे त्यांचीच  प्रेरणा आहे. 

कठीण अशी लढाई लढलो. हितचिंतक आणि राजकारणी लोकांना त्यावेळी धास्ती वाटली. मात्र लढाई साधी नव्हती, पण जिंकलो. दिघेंचं स्वप्न होतं की ठाण्याच्या मुख्यमंत्री होईल आणि ते स्वप्न पूर्ण झाले असल्याचे ते म्हणाले. मला अभिमान आणि समाधान आहे माझ्या गुरूच्या आशीर्वादाने पल्ला गाठला .या सरकारने दीड महिन्यात ऐतिहासिक निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

आजही काही लोकं म्हणतात हे सरकार राहणार नाही मात्र सरकार लोकांचं आहे, कोणाला ते हजम होत नाही, घशाखाली उतरत नाही.एकनाथ शिंदे कसा डोलारा सांभाळतील अशी धास्ती अनेकांना होती मात्र आपल्या पोटात आणि ओठात एकच आहे हे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठीच काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला  आमचा अजेंडा काहीच नाही, सर्वसामान्य जनतेला न्याय हाच आमचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेShiv Senaशिवसेना