शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील साडेसात लाख नागरिक आधार नोंदणीपासून वंचित

By admin | Updated: June 14, 2017 15:17 IST

मोदी सरकारने सर्व व्यवहार आधार कार्डशी जोडण्याचे आदेश दिल्याने प्रत्येक व्यक्तीला आधार सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु,

राजू काळे/  ऑनलाईन लोकमत भार्इंदरस दि.14 - मोदी सरकारने सर्व व्यवहार आधार कार्डशी जोडण्याचे आदेश दिल्याने प्रत्येक व्यक्तीला आधार सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु, एप्रिलपासुन तांत्रिक कारणास्तव सर्व आधार केंद्र बंद करण्यात आल्याने एकट्या ठाणे जिल्ह्यातील सुमारे साडेसात लाख लोकं आधार नोंदणीपासुन वंचित राहिल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीतुन समोर आले आहे. यामुळे नागरीकांची गैरसोय होत असुन विद्यार्थ्यांची ऐन शाळा सुरु होण्याच्या कालावधीत चांगलीच पंचाईत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.आधार कार्ड शाळेतील विद्यार्थ्यांसह वृद्धांपर्यंत सर्वांना सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु, अनेकदा ४ ते ७ वर्षीय शालेय विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे स्पष्ट दिसुन येत नसल्याने त्यांची आधार नोंदणी करण्यात येत नव्हती. अखेर त्यांच्या नावासह केवळ छायाचित्राचा समावेश असलेली आधार नोंदणी सुरु करण्यात आली. यामुळे प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांची नोंदणी सक्तीची करुन त्यांच्या ओळखपत्राची मागणी पालकांकडे करण्यात येऊ लागली आहे. एप्रिलपर्यंत सुरु असलेली आधार नोंदणी अचानक बंद करण्यात आल्याने नागरीकांची पंचाईत झाली. त्यात नोंदणीसाठी वापरण्यात येणाय््राा संगणक प्रणालीचे अपग्रेडेशन करण्याचा निर्णय सरकारने फेब्रुवारीमध्ये घेतला होता. त्याला संबंधित कंपन्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. परिणामी आधार नोंदणीचे काम करणाय््राा मेसर्स पिपल सर्विसेस टेक्नॉलॉजीस प्रा. लि. या कंपनीने आधार नोंदणी करणाय््राा सर्व एजन्सींचे काम बंद केले. गेल्या एप्रिल महिन्यापासुन आधार नोंदणी बंद पडली आहे. यामुळे अद्याप आधार नोंदणी न झालेल्या लोकांकडे त्यांचे खाते असलेल्या बँकेकडुन आधार कार्डची मागणी केली जात आहे. आधार कार्ड वेळेत सादर न केल्यास त्यांचे बँकेतील व्यवहार रोखण्याचा इशारा बँकेकडुन देण्यात आला आहे. तसेच रेशनकार्डसोबत आधार संलग्न करण्यासाठी देखील पुरवठा कार्यालयाकडुन आधार कार्डची मागणी केली जात असुन त्याची प्रत निश्चित वेळेत जमा न केल्यास रेशनवरील धान्य मिळणार नसल्याचा फतवा काढण्यात आला आहे. त्यामुळे आधार नोंदणी न केलेल्या गरीब व सामान्य कुटुंबाची परवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील आधारची सक्ती करण्यात आली आहे. शाळा सुरु होण्यासाठी केवळ १ दिवसाचा अवधी असताना वंचित विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील २०१५ मधील ८५ लाख २९ हजार २१७ इतक्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार ७७ लाख ७९ हजार १२७ लोकांनी आधार नोंदणी केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थानिक प्रशासनांना पाठविलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे. अद्याप ७ लाख ५० हजार ९० लोकं आधार नोंदणीपासुन वंचित असुन त्यांच्यासाठी त्वरीत आधार नोंदणी केंद्र सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रतिक्रिया राज्य ग्राहक सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे : आधार हे भविष्यात एकमेव पुरावा ग्राह्य धरला जाणार असल्याने प्रत्येकाला आधार नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी त्याची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी पालिकेला निर्देश देण्यात आले आहेत. पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुधीर राऊत : नागरीकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बंद पडलेली आधार नोंदणी सुरु करण्याची कार्यवाही त्वरीत केली जाणार आहे.