शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

ठाणे जिल्ह्यातील साडेसात लाख नागरिक आधार नोंदणीपासून वंचित

By admin | Updated: June 14, 2017 15:17 IST

मोदी सरकारने सर्व व्यवहार आधार कार्डशी जोडण्याचे आदेश दिल्याने प्रत्येक व्यक्तीला आधार सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु,

राजू काळे/  ऑनलाईन लोकमत भार्इंदरस दि.14 - मोदी सरकारने सर्व व्यवहार आधार कार्डशी जोडण्याचे आदेश दिल्याने प्रत्येक व्यक्तीला आधार सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु, एप्रिलपासुन तांत्रिक कारणास्तव सर्व आधार केंद्र बंद करण्यात आल्याने एकट्या ठाणे जिल्ह्यातील सुमारे साडेसात लाख लोकं आधार नोंदणीपासुन वंचित राहिल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीतुन समोर आले आहे. यामुळे नागरीकांची गैरसोय होत असुन विद्यार्थ्यांची ऐन शाळा सुरु होण्याच्या कालावधीत चांगलीच पंचाईत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.आधार कार्ड शाळेतील विद्यार्थ्यांसह वृद्धांपर्यंत सर्वांना सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु, अनेकदा ४ ते ७ वर्षीय शालेय विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे स्पष्ट दिसुन येत नसल्याने त्यांची आधार नोंदणी करण्यात येत नव्हती. अखेर त्यांच्या नावासह केवळ छायाचित्राचा समावेश असलेली आधार नोंदणी सुरु करण्यात आली. यामुळे प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांची नोंदणी सक्तीची करुन त्यांच्या ओळखपत्राची मागणी पालकांकडे करण्यात येऊ लागली आहे. एप्रिलपर्यंत सुरु असलेली आधार नोंदणी अचानक बंद करण्यात आल्याने नागरीकांची पंचाईत झाली. त्यात नोंदणीसाठी वापरण्यात येणाय््राा संगणक प्रणालीचे अपग्रेडेशन करण्याचा निर्णय सरकारने फेब्रुवारीमध्ये घेतला होता. त्याला संबंधित कंपन्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. परिणामी आधार नोंदणीचे काम करणाय््राा मेसर्स पिपल सर्विसेस टेक्नॉलॉजीस प्रा. लि. या कंपनीने आधार नोंदणी करणाय््राा सर्व एजन्सींचे काम बंद केले. गेल्या एप्रिल महिन्यापासुन आधार नोंदणी बंद पडली आहे. यामुळे अद्याप आधार नोंदणी न झालेल्या लोकांकडे त्यांचे खाते असलेल्या बँकेकडुन आधार कार्डची मागणी केली जात आहे. आधार कार्ड वेळेत सादर न केल्यास त्यांचे बँकेतील व्यवहार रोखण्याचा इशारा बँकेकडुन देण्यात आला आहे. तसेच रेशनकार्डसोबत आधार संलग्न करण्यासाठी देखील पुरवठा कार्यालयाकडुन आधार कार्डची मागणी केली जात असुन त्याची प्रत निश्चित वेळेत जमा न केल्यास रेशनवरील धान्य मिळणार नसल्याचा फतवा काढण्यात आला आहे. त्यामुळे आधार नोंदणी न केलेल्या गरीब व सामान्य कुटुंबाची परवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील आधारची सक्ती करण्यात आली आहे. शाळा सुरु होण्यासाठी केवळ १ दिवसाचा अवधी असताना वंचित विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील २०१५ मधील ८५ लाख २९ हजार २१७ इतक्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार ७७ लाख ७९ हजार १२७ लोकांनी आधार नोंदणी केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थानिक प्रशासनांना पाठविलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे. अद्याप ७ लाख ५० हजार ९० लोकं आधार नोंदणीपासुन वंचित असुन त्यांच्यासाठी त्वरीत आधार नोंदणी केंद्र सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रतिक्रिया राज्य ग्राहक सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे : आधार हे भविष्यात एकमेव पुरावा ग्राह्य धरला जाणार असल्याने प्रत्येकाला आधार नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी त्याची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी पालिकेला निर्देश देण्यात आले आहेत. पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुधीर राऊत : नागरीकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बंद पडलेली आधार नोंदणी सुरु करण्याची कार्यवाही त्वरीत केली जाणार आहे.