शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

चोवीस तास पाण्यासाठी ठामपाची कोट्यवधींची पंचवार्षिक योजना

By admin | Updated: March 23, 2017 01:33 IST

ठाणे महापालिकेने पाच वर्षांचे व्हिजन ठाणे तयार केले असून त्याचाच एक भाग म्हणून पाण्याचे नियोजन, वितरणव्यवस्था मजबूत करण्यासाठी

अजित मांडके / ठाणेठाणे महापालिकेने पाच वर्षांचे व्हिजन ठाणे तयार केले असून त्याचाच एक भाग म्हणून पाण्याचे नियोजन, वितरणव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि ठाणेकरांना समान पद्धतीने पाणी देण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या योजनेतून ठाणेकरांना पुढील पाच वर्षांत २४ बाय ७ पाणीपुरवठा आणि वितरणव्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी पुढील पाच वर्षांच्या या दोनही योजनांसाठी कोट्यवधींची आर्थिक तरतूद केली जाणार आहे. त्यानुसार, या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश यंदाच्या अर्थसंकल्पातही केला आहे.ठाणे शहराला आजघडीला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २००, एमआयडीसी ११०, स्टेम ११० आणि बीएमसीकडून ६० एमएलडी असा पाणीपुरवठा होत आहे. शहरात पाणीटंचाई निर्माण झाली की, २४ तासांचे शटडाउन घ्यावे लागते. परंतु, पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ४८ तासांचा कालावधी जातो, त्यामुळे अनेक भागांना कमी दाबाने पाणी येत असते. ठाण्याच्या भौगोलिक रचनेनुसार एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे खाडी असून भूपृष्ठाचा समतोल योग्य असला तरीदेखील केवळ साठवणुकीअभावी वितरणव्यवस्थेत समतोल राखला जात नसल्याचे पालिका मान्य करीत आहे. त्यामुळेच आता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी साठवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी शहरात नव्याने १२ जलकुंभ उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार, कळवा भागात ६, आनंदनगर-कासारवडवली १, सिद्धाचल १, बाळकुम २, जॉन्सन १ आदी जलकुंभांचे काम सुरू असून यातील काही जलकुंभांची कामे पूर्ण झाली असून काहींची कामे अंतिम टप्प्यात, तर काही नव्याने सुरू होणार आहेत. (प्रतिनिधी)