शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराच्या चक्रव्युहातील ठाणे जिल्ह्यातील करोडोच्या ४९८ पाणी पुरवठा योजना; ३२ जणांवर गुन्हे दाखल

By सुरेश लोखंडे | Updated: October 28, 2018 17:01 IST

गावखेड्यांच्या या ४९८ योजनापैकी १५१ योजनांची कामे पूर्ण झाली मात्र अद्याप पाणी पुरवठा नाही. १३३ योजनांची किरकोळ कामे बाकीच आहेत. तर ११२ योजनांव्दारे सध्या पाणी पुरवठा सुरू आहे. ६२ योजना प्रगतीपथावर आहेत आणि ८ योजना रद्द कराव्या लागल्या आहेत. या योजनांबरोबरच १३७ विहिरीची कामे हाती घेतली होती. त्यापैकी ९१ विहिरीपूर्ण झाल्या आणि ४२ विहिरी अर्धवट आहेत. एकीचे काम प्रगतीपथावर असून तीन विहिरी रद्द केल्या आहेत.

ठळक मुद्देकेवळ ११२ योजनां पाणी पुरवठा करीत आहेतभ्रष्टाचारामुळे मुरबाड व शहापूर तालुक्यातील ३२ जणांवर गुन्हे ग्रामीण पाणी पुरवठा योजना केंद्र शासनाने २००९- १० या कालावधीत राबवल्या

ठाणे : जिल्ह्यातील गावकऱ्यांच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना गेल्या दहा वर्षापासून भ्रष्टाचा-याचे कुरण ठरल्या. करोडो रूपयांच्या या योजनांमधील भ्रष्टाचारामुळे मुरबाड व शहापूर तालुक्यातील ३२ जणांवर गुन्हे ही दाखल झाले. आतापर्यंत केवळ ११२ योजनां पाणी पुरवठा करीत आहेत. रखडलेल्या योजनांमुळे गावखेड्यातील रहिवाशी आजपर्यंत च्या पाणी पुरवठ्यापासून वंचित आहेत. यास जिल्हा परिषदेचा दुर्लक्षितपणाही कारणी भूत असल्याचे बोलले जात आहे.पाणी टंचाईतून मुक्त करण्यासाठी या योजना हाती घेतल्या होत्या. जागतिक बँकेचे अर्थ सहाय्य असलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना केंद्र शासनाने २००९- १० या कालावधीत राबवल्या. आता या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे ‘राष्टÑीय ग्रामीण पेयजल ’ असे नामकरण झाले. सुमारे दहा वर्षाच्या कालावधीपासून सुरू असलेल्या ४९८ या पाणी पुरवठा योजनांसह १३७ विहिरींची कामे भ्रष्टाचाराच्या वाळवीमुळे अर्धवट रखडलेली आहेत. लोकसहभागातून राबवलेल्या या कामांची आखणी, अंमलबजावणी व देखभाल दुरूती स्थानिक ग्राम पंचायतींच्या नळपाणी पुरवठा समितीने करायची असल्यामुळे त्यात मोठ्याप्रमाणात करोडोचा भ्रष्टाचार झाला. दरम्यानच्या काळात समित्यांचे पदाधिकारही बदली झाले. यामुळे अर्धवट स्थितीत राहिलेल्या योजनांची काम अद्याप ठिकठिकाणी सुरू आहेत.गावखेड्यांच्या या ४९८ योजनापैकी १५१ योजनांची कामे पूर्ण झाली मात्र अद्याप पाणी पुरवठा नाही. १३३ योजनांची किरकोळ कामे बाकीच आहेत. तर ११२ योजनांव्दारे सध्या पाणी पुरवठा सुरू आहे. ६२ योजना प्रगतीपथावर आहेत आणि ८ योजना रद्द कराव्या लागल्या आहेत. या योजनांबरोबरच १३७ विहिरीची कामे हाती घेतली होती. त्यापैकी ९१ विहिरीपूर्ण झाल्या आणि ४२ विहिरी अर्धवट आहेत. एकीचे काम प्रगतीपथावर असून तीन विहिरी रद्द केल्या आहेत. या योजनांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार मुरबाड तालुक्यात झाला. यामुळे संबंधीत ग्राम पंचायतींचे तत्कालीन सरपंचासह समिती सदस्य आदीं २८ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाले. या तालुक्यात १७६ योजना हाती घेतल्या. पण दहा वर्षाच्या कालावधीत केवळ ४२ योजनांव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. उर्वरित ३८ योजनांचे काम पूर्ण झाले. तर ३२चे कामे अर्धवट असून २८ योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत आणि ८ योजना रद्द कराव्या लागल्या आहेत. १२ विहिरीची कामे हाती घेतली असता नऊचे काम पूर्ण असून तीन विहिरी अर्धवट आहेत.शहापूर तालुक्यातील तीन जणांवर गुन्हा नोंद झाले. दोन योजना रद्द कराव्या लागल्या. १३३ योजनांपैकी ३९ योजनां पाणी पुरवठा करीत आहेत. २१ योजनांची कामे पूर्ण झाली. तर ४३ योजनां किरकोळकामांमुळे अर्धवट असल्याचे सांगितले जात आहे. अंबरनाथ तालुक्यात ४४ योजना घेतल्या त्यापैकी केवळ चार योजना आजमितीस पाणी पुरवठा करीत आहेत. २६ योजनांचे कामे पूर्ण झाल्याचा दावा आहे तर १२ योजनांची किरकोळ अर्धवट कामे बाकी आहेत. कल्याणमध्येही ३२ योजनांपैकी चार योजनांचा पाणी पुरवठा आहे. उर्वरित पाच अर्धवट असून २३ योजनांची कामे पूर्ण झाली.** २८ कोटींचा निधी पडून - रखडलेल्या योजनांची काम कालबध्द पध्दतीने पूर्ण करण्यात आहेत. यानुसार गेल्या वर्षी म्हणजे २०१७ -१८ ला २४ कामांचे उद्दीष्ठ हाती घेतले. त्यासाठीचे २८ कोटी ९१ लाखाची तरतूदही केली. पण केवळ ११ योजनांची कामे झाली. वर्षभरात केवळ पाच कोटी ६० लाख रूपयांचा खर्च ग्रामीण पाणी पुरवठा विभागास करता आला. यंदाही १३ कोटी ३५ लाखांची १३ कामे हाती घेतली आहेत . त्यातील जूनपर्यंत एक योजना पूर्ण होऊन २४ लाखांचा खर्च झाल आहे. या आॅक्टोबरमध्ये ११ कामे पूर्ण होणार असल्यचे सांगितले जात आहे.

टॅग्स :thaneठाणेwater shortageपाणीटंचाई