शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

तिसऱ्या दिवशीही भिवंडी पाण्याखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 01:09 IST

भिवंडी-चिंचोटी महामार्गावर आले पाणी, स्थानिकांनी केली मदत

भिवंडी : मुसळधार पावसामुळे सलग तिसºया दिवशीही भिवंडी पाण्याखालीच होती. शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचल्याने भिवंडी जलमय झाली होती. तर, भिवंडीतील चिंचोटी-अंजूरफाटा महामार्गावर पाणी आल्याने वाहतूककोंडी झाली होती. २६ जुलै २००५ नंतर प्रथमच वडघर गावाजवळ हा महामार्ग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहनांना वाट दाखवण्यात आली. पाण्याचा प्रवाह वाढल्याने दुचाकी वाहनांसह हलक्या वाहनांना या मार्गावरून जाण्यास मनाई करण्यात आली होती.महामार्गावरच्या दुतर्फा पाणी साचल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली भातशेती पाण्याखाली गेली आहे. याच भागातील डुंगे गावात पाणी शिरल्याने सकाळपासूनच नागरिकांनी दैना उडाली होती. पाण्याचा वाढता जोर लक्षात घेता डुंगे गावातील सखल भागांत असलेल्या घरातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा म्हणून परिवारासह जीवनावश्यक वस्तू व सामान थेट होडीतून सुरक्षितस्थळी हलवले.वडघर, डुंगे, कारिवली या सखल भागांत पाणी साचल्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तर शहरात शिवाजी चौक, वंजारपट्टीनाका, म्हाडा कॉलनी, शेलार, खाडीपार, बंदर मोहल्ला, ईदगाह रोड, नझराना, पद्मानगर, कल्याणनाका, तीनबत्ती आदी भागांमध्ये पावसाचे पाणी घर व दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांचे हाल झाले होते. कोनगावातही दुर्गाडी येथील खाडी दुतर्फा वाहत असल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. दुपारपासून पावसाने उसंत घेतली असली, तरी धरणांतून पाण्याचा विसर्ग केल्याने भिवंडी शहरासह ग्रामीण भागांत पाणी शिरले होते. शहरातील निजामपुरा पोलीस चौकी पाण्याखाली गेली होती. तसेच पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या भाजी मार्केटमध्ये पाणी शिरल्याने भाजीविक्रेत्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे एरव्ही रविवारी गर्दी असलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट होता.मनपाचा सतर्कतेचा इशारादरम्यान, खाडीकिनारी राहणाºया नागरिकांना महसूल विभागासोबतच मनपा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. भिवंडी महापालिकेचे आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी स्वत: नदीनाका व शिवाजी चौक परिसरात साचलेल्या पाण्याची पाहणी केली आहे. नागरिकांसाठी आवश्यक त्या सेवासुविधा तत्काळ पुरवण्याच्या सूचना पालिका प्रशासनास दिल्या आहेत.