शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तिसऱ्या दिवशीही भिवंडी पाण्याखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 01:09 IST

भिवंडी-चिंचोटी महामार्गावर आले पाणी, स्थानिकांनी केली मदत

भिवंडी : मुसळधार पावसामुळे सलग तिसºया दिवशीही भिवंडी पाण्याखालीच होती. शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचल्याने भिवंडी जलमय झाली होती. तर, भिवंडीतील चिंचोटी-अंजूरफाटा महामार्गावर पाणी आल्याने वाहतूककोंडी झाली होती. २६ जुलै २००५ नंतर प्रथमच वडघर गावाजवळ हा महामार्ग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहनांना वाट दाखवण्यात आली. पाण्याचा प्रवाह वाढल्याने दुचाकी वाहनांसह हलक्या वाहनांना या मार्गावरून जाण्यास मनाई करण्यात आली होती.महामार्गावरच्या दुतर्फा पाणी साचल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली भातशेती पाण्याखाली गेली आहे. याच भागातील डुंगे गावात पाणी शिरल्याने सकाळपासूनच नागरिकांनी दैना उडाली होती. पाण्याचा वाढता जोर लक्षात घेता डुंगे गावातील सखल भागांत असलेल्या घरातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा म्हणून परिवारासह जीवनावश्यक वस्तू व सामान थेट होडीतून सुरक्षितस्थळी हलवले.वडघर, डुंगे, कारिवली या सखल भागांत पाणी साचल्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तर शहरात शिवाजी चौक, वंजारपट्टीनाका, म्हाडा कॉलनी, शेलार, खाडीपार, बंदर मोहल्ला, ईदगाह रोड, नझराना, पद्मानगर, कल्याणनाका, तीनबत्ती आदी भागांमध्ये पावसाचे पाणी घर व दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांचे हाल झाले होते. कोनगावातही दुर्गाडी येथील खाडी दुतर्फा वाहत असल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. दुपारपासून पावसाने उसंत घेतली असली, तरी धरणांतून पाण्याचा विसर्ग केल्याने भिवंडी शहरासह ग्रामीण भागांत पाणी शिरले होते. शहरातील निजामपुरा पोलीस चौकी पाण्याखाली गेली होती. तसेच पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या भाजी मार्केटमध्ये पाणी शिरल्याने भाजीविक्रेत्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे एरव्ही रविवारी गर्दी असलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट होता.मनपाचा सतर्कतेचा इशारादरम्यान, खाडीकिनारी राहणाºया नागरिकांना महसूल विभागासोबतच मनपा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. भिवंडी महापालिकेचे आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी स्वत: नदीनाका व शिवाजी चौक परिसरात साचलेल्या पाण्याची पाहणी केली आहे. नागरिकांसाठी आवश्यक त्या सेवासुविधा तत्काळ पुरवण्याच्या सूचना पालिका प्रशासनास दिल्या आहेत.