शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

समतेचा विचार संतकाळापासून

By admin | Updated: June 28, 2017 03:16 IST

महिलांना शिक्षण आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार संतकाळातच मिळाला. सध्या समाजामध्ये ज्या समतेचा विचार पुढे आणला जात आहे

लोकतम न्यूज नेटवर्कअंबरनाथ : महिलांना शिक्षण आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार संतकाळातच मिळाला. सध्या समाजामध्ये ज्या समतेचा विचार पुढे आणला जात आहे त्याची खरी सुरूवात ही संत काळापासूनच झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र समजून घेण्यासाठी संतपरंपरा अभ्यासणे आवश्यक असल्याचे मत संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार यांनी व्यक्त केले. मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे ५५ वे राज्यस्तरीय संमेलन नुकतेच अंबरनाथ येथे झाले. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात विविध कार्यक्र म झाले. संमेलनाचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवशी आप्पा परब यांनी विरत्वाचा इतिहास समोर उभा केला. तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या प्रबोधनात संत साहित्याचे योगदान या विषयावर बोलताना पवार यांनी संत परंपरा श्रोत्यांसमोर विषद केली. संतांच्या विचारांनी प्रेरीत होत किर्तनकार, शाहीर यांनीच महाराष्ट्राला शहाणे केले. त्यामुळे महाराष्ट्र समजून घेण्यासाठी संत परंपरा अभ्यासण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठी साहित्याच्या साडेसातशे वर्षाच्या इतिहासात साडेचारशे वर्ष हे संत साहित्याचे आहेत. त्यामुळे मराठी साहित्यही संतांशिवाय अपूर्ण आहे. मागासवर्गीयांना समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी सर्वप्रथम संतांनीच प्रयत्न केले. तर महिलांना ज्ञान, संतविचार जाणून घेण्याचा हक्कही त्या काळातच मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.शेवटच्या सत्रात ‘वृत्तपत्र लेखक समाजातील जागल्या’ या विषयावर परिसंवाद झाला. यावेळी पत्रकारितेत उल्लेखनीय काम केल्याबद्दल अजित म्हात्रे, प्रशांत मोरे, गिरीश त्रिवेदी, श्रीकांत खाडे, शरद पवार, गणेश गायकवाड यांचा सेवा साधना पुरस्काराने गौरव केला.