शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

'क' मुळे ठाणेकरांनी अनुभवाला एक वेगळा नायगावकरी काव्यानुभव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 15:40 IST

ठाण्यात 'क' चा दुसरा प्रयोग संपन्न झाला. यावेळी अशोक नायगावकरांच्या कविता ऐकण्याची संधी ठाणेकरांना मिळाली 

ठळक मुद्देकोलाज तर्फे "क" हा प्रयोगजेष्ठ कवी अशोक नायगावकरांच्या अनहर्ड, अनरेड कवितांचे वाचननायगावकरांसोबत नव्या दमाचे कवी गीतेश शिंदे, संकेत म्हात्रे आणि पंकज दळवी

ठाणे : कधीही न ऐकलेल्या, वाचलेल्या प्रसिध्द कवींच्या कवितांचा  "क" हा प्रयोग  सहयोग मंदिर येथे कोलाज तर्फे आयोजित करण्यात आला होता. या प्रयोगात जेष्ठ कवी अशोक नायगावकरांच्या अनहर्ड, अनरेड कवितांचे वाचन नायगावकरांसोबत नव्या दमाचे कवी गीतेश शिंदे, संकेत म्हात्रे आणि पंकज दळवी यांनी केले.

       डावे उजवे, शाकाहारी, टिळक या नायगावकरांच्या लोकप्रिय कविता टाळून उपहासात्मक आणि अंतर्मुख करणा-या कवितांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला होता. मिडल क्लास कुटूंबातील पती पत्नीच्या प्रेमळ नात्याचे चित्रण नायगावकरांच्या आठवणी या कवितेतून घडले. या निमित्ताने त्यांच्या कवितेची तरल बाजूही समोर आली. अशीच तिंबत कणीक रहा तू, ज्योतिबा आभार या कवितांतून नायगावकरांनी समाजातील दांभिकतेवर अचूक बोट ठेवेले. हाच धागा पकडत संकेत म्हात्रे यांनी तू कर सत्कार तूला दिलेल्या व्रणांचे म्हणत एका गृहिणीचं घराभोवती फिरणारं आणि त्यातच समाधान मानायला लावणारं आयुष्य रेखाटलं, तर गीतेश शिंदे यांनी नवरा वारल्यावर या कवितेतून नवरा गेलेल्या बाईच्या मनाची घुसमट व्यक्त केली. पंकज दळवी यांनी नथूरामचं बॅडलक या कवितेतून हरवलेल्या तत्त्वांचा आणि गांधीवादाचा शोध घेतला.

                 या प्रसंगी या तिनही कवींनी नायगावकरांना विविध प्रश्न विचारून त्यांचा कवितेचा प्रवास उलगडला. कवितेने मनोरंजनही व्हायला हरकत नाही पण कवीचा आतला सूर सच्चा हवा त्यामुळेच कार्यक्रमात भरभरून हसणारा प्रेक्षक घरी जाताना मात्र अंतर्मुख झालेला असतो अशा भावना नायगावकरांनी व्यक्त केल्या. त्यांच्या अभिमान या कवितेने उपहासाचा सूर इतका टिपेला नेला की माणूस असण्याचा अभिमान वाटण्याऐवजी लाज वाटावी अशी भावना निर्माण झाली. निसर्गाचा घोटाळा या कवितेने निसर्गाकडे वेगळ्या चष्म्यातून बघायला भाग पाडले. भोपाळ चिकित्सा, केशवसूत म्हणाले, मूळाक्षरं या कवितांनी शेवटाकडे कार्यक्रमावर चढवलेल्या कळसाला प्रेक्षकांनी टाळ्यांनी मानवंदना दिली. या कार्यक्रमास अरूण म्हात्रे, अशोक बागवे, महेश केळूसकर, राजीव जोशी असे जेष्ठ कवी देखील प्रेक्षकांत उपस्थित होते. या निमित्ताने कोलाज तर्फे ह्या मान्यवरांच्या हस्ते नायगावकरांचा एक हृदय सत्कारही करण्यात आला. लवकरच ’क’चा नायगावकर विशेष हा पुढील प्रयोग रत्नागिरीस होणार असल्याचे संकेत म्हात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकAshok Naigaonkarअशोक नायगावकर