शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

ठिय्याबाजांना पालघरला जावेच लागणार; ठाण्यातून जाण्यास कर्मचाºयांचा विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 03:56 IST

नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात जाण्यास शासन व न्यायालयीन आदेशानंतरही टाळाटाळ करणा-या आणि राजकीय नेत्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करणा-या ठाणे जिल्हा परिषदेतील शेकडो कर्मचा-यांना पालघर जिल्ह्यातील बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावेच लागणार आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात जाण्यास शासन व न्यायालयीन आदेशानंतरही टाळाटाळ करणा-या आणि राजकीय नेत्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करणा-या ठाणे जिल्हा परिषदेतील शेकडो कर्मचा-यांना पालघर जिल्ह्यातील बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावेच लागणार आहे. या बदल्यांची यादी २८ फेब्रुवारीपर्यंत तयार होणार आहे.ठाणे-पालघर जिल्हा परिषदांच्या सीईओंची कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होईल. त्यामध्ये या बदल्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे, असे ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे. ठाणे व पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये कर्मचारी पदे समसमान ठेवण्यासाठी कर्मचाºयांचे समायोजन केले जात आहे. प्रत्येक विभागातील संवर्ग व प्रवर्गनिहाय या शेकडो बदल्या होणार आहेत. यात सेवाज्येष्ठता असलेल्या कर्मचाºयांनादेखील पालघर जिल्हा परिषदेत जावेच लागणार आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाºयांचादेखील बदल्यांमध्ये समावेश आहे. उच्च न्यायालयाचे आदेश व ३१ जुलै २०१७ च्या जीआरनुसार या बदल्या होत आहेत. त्या रोखण्यासाठी नेत्यांनी जंगजंग पछाडल्यानंतरही बदल्या अटळ असल्याने कर्मचारी हतबल झाले आहे.ठाणे व पालघर जिल्हा परिषदांकडून होणाºया या बदल्यांसाठी सेवाज्येष्ठता, प्रवर्ग, बिंदूनामावली, विकल्प आधारित, प्राधान्यक्रम आणि दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये समसमान पदे आदी निकषांचा समावेश आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार