शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

ठिय्याबाजांना पालघरला जावेच लागणार; ठाण्यातून जाण्यास कर्मचाºयांचा विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 03:56 IST

नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात जाण्यास शासन व न्यायालयीन आदेशानंतरही टाळाटाळ करणा-या आणि राजकीय नेत्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करणा-या ठाणे जिल्हा परिषदेतील शेकडो कर्मचा-यांना पालघर जिल्ह्यातील बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावेच लागणार आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात जाण्यास शासन व न्यायालयीन आदेशानंतरही टाळाटाळ करणा-या आणि राजकीय नेत्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करणा-या ठाणे जिल्हा परिषदेतील शेकडो कर्मचा-यांना पालघर जिल्ह्यातील बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावेच लागणार आहे. या बदल्यांची यादी २८ फेब्रुवारीपर्यंत तयार होणार आहे.ठाणे-पालघर जिल्हा परिषदांच्या सीईओंची कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होईल. त्यामध्ये या बदल्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे, असे ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे. ठाणे व पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये कर्मचारी पदे समसमान ठेवण्यासाठी कर्मचाºयांचे समायोजन केले जात आहे. प्रत्येक विभागातील संवर्ग व प्रवर्गनिहाय या शेकडो बदल्या होणार आहेत. यात सेवाज्येष्ठता असलेल्या कर्मचाºयांनादेखील पालघर जिल्हा परिषदेत जावेच लागणार आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाºयांचादेखील बदल्यांमध्ये समावेश आहे. उच्च न्यायालयाचे आदेश व ३१ जुलै २०१७ च्या जीआरनुसार या बदल्या होत आहेत. त्या रोखण्यासाठी नेत्यांनी जंगजंग पछाडल्यानंतरही बदल्या अटळ असल्याने कर्मचारी हतबल झाले आहे.ठाणे व पालघर जिल्हा परिषदांकडून होणाºया या बदल्यांसाठी सेवाज्येष्ठता, प्रवर्ग, बिंदूनामावली, विकल्प आधारित, प्राधान्यक्रम आणि दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये समसमान पदे आदी निकषांचा समावेश आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार