शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

पुन्हा सादर करावे लागले ‘ते ’ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:42 IST

कल्याण: काही वर्षापुर्वी महासभेत मंजूरी दिलेले महापुरूषांचे पुतळे उभारण्यास दिरंगाई होत असताना सरकारच्या नव्या अध्यादेशामुळे प्रस्तावित पुतळयांच्या प्रस्तावांना पुन्हा एकदा महासभेची मान्यता घ्यावी लागली. नुकत्याच पार पडलेल्या महासभेत देशातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ आनंदीबाई जोशी यांच्यासह दोन ठिकाणी उभारण्यात येणा-या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे फेरप्रस्ताव प्रशासनाला सादर करावे लागले. पुन्हा नव्याने मंजुरी घेतली असलीतरी हे पुतळे उभारणीचे काम तत्परतेने पुर्णत्वाला येईल का? याबाबत मात्र साशंकता आहे.

ठळक मुद्देसरकारच्या अध्यादेशामुळे पुतळयांचे फेरठराव

कल्याण: काही वर्षापुर्वी महासभेत मंजूरी दिलेले महापुरूषांचे पुतळे उभारण्यास दिरंगाई होत असताना सरकारच्या नव्या अध्यादेशामुळे प्रस्तावित पुतळयांच्या प्रस्तावांना पुन्हा एकदा महासभेची मान्यता घ्यावी लागली. नुकत्याच पार पडलेल्या महासभेत देशातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ आनंदीबाई जोशी यांच्यासह दोन ठिकाणी उभारण्यात येणा-या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे फेरप्रस्ताव प्रशासनाला सादर करावे लागले. पुन्हा नव्याने मंजुरी घेतली असलीतरी हे पुतळे उभारणीचे काम तत्परतेने पुर्णत्वाला येईल का? याबाबत मात्र साशंकता आहे.केडीएमसीच्या रूक्मीणीबाई रूग्णालयात उभारण्यात येणा-या डॉ आनंदीबाई जोशींचा अर्धाकृती आणि महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात आणि कल्याण पुर्वेकडील ड प्रभाग कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येणा-या पुर्णाकृती पुतळयाचे काम प्रस्तावित आहे. डोंबिवलीत उभारण्यात येणा-या पुतळयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पुतळा साकारणा-या शिल्पकराकडूनच डोंबिवलीचे काम पुर्ण झाल्यावर कल्याण ड प्रभागातील पुतळयाचे काम सुरू केले जाणार आहे. २०१६ मध्ये भुमिपूजन झालेल्या डॉ आनंदीबाई जोशी यांच्या स्मारकाचे काम मात्र पुर्ण झालेले नाही. दरम्यान राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन अध्यादेशानुसार पुतळा उभारणीचे ठराव आणि हरकत प्रमाणपत्र १ वर्षापेक्षा अधिक जुनी असू नयेत अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार नुकत्याच पार पडलेल्या महासभेत प्रशासनाकडून नव्याने पुतळयांचे फेरप्रस्ताव सादर करण्यात आले होते. यावेळी त्या प्रस्तावांना मान्यता मिळाली परंतू काही त्रुटींवर देखील नगरसेवकांकडून बोट ठेवण्यात आले.--------------------------------------------------------------------यंदाही सन्मान नाही----------------------------------येत्या ८ मार्चला जागतिक महिला दिनी डॉ आनंदीबाई जोशी यांचा पुतळा बसवून त्यांचा सन्मान राखला जाईल अशी अपेक्षा होती परंतू कल्याण शहराला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त करून देणा-या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या बाबतीत प्रशासनाची असलेली उदासिनता जैसे थे राहीली आहे. प्रतिकूल परिस्थितीत अपार कष्ट आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कल्याणच्या रहिवाशी असलेल्या आनंदीबार्इंनी ११ मार्च १८८६ ला एमडी ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी प्राप्त केली. या त्यांच्या कर्तुत्वाला सलाम करण्याच्या उद्देशाने महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अनिल काकडे यांनी आनंदीबार्इंचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी केली. २००५ मध्ये यासंदर्भातला ठराव मंजूर करण्यात आला खरा पण या कामाच्या भुमिपूजनासाठी २०१६ चा मुहुर्त प्रशासनाला गावला. पण आजतागायत रूक्मीणीबाई रूग्णालयात पुतळा बसविण्यात आलेला नाही. प्रशासनाची उदासिनता आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे पुतळा उभारणीच्या कामाला उशीर होत असल्याची टिका काकडे यांनी केली आहे तर लवकरात लवकर पुतळा बसविला जाईल असा दावा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केला आहे.----------------------------------------------------------------------छत्रपतींचा विसर का पडला?------------------------------ड प्रभागात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे पण यासंदर्भात झालेल्या ठरावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. मग छत्रपतींचा विसर कसा काय पडला? असा सवाल महासभेत शिवसेना नगरसेवक निलेश शिंदे यांनी उपस्थित केला. ठरावाप्रमाणे दोन्ही महापुरूषांचे पुतळे उभारणे गरजेचे असून जर निधी कमी पडला तर आम्ही नगरसेवक तो देऊ, आवश्यक वाटल्यास आमदार जगन्नाथ शिंदे यांचा आमदार निधीही याकामासाठी उपलब्ध करून देऊ असे शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी माजी नगरसेवक उदय रसाळ, सचिन पोटे यांनी मांडलेल्या शक्ती भक्ती स्मारकासंदर्भात केलेल्या प्रस्तावाची आठवण करून दिली. यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास एकमताने मान्यता देण्यात आली.-------------------------------------------------------------------सत्ताधा-यांची अनास्था---------------------यासंदर्भात विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वारंवार केले जाणारे ठराव पाहता याला प्रशासन आणि सत्ताधा-यांची अनास्था कारणीभूत असल्याचे म्हंटले. महापुरूषांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांची स्मारक उभी करणे पुढील पिढीच्या भवितव्यासाठी चांगल्याच गोष्टी आहेत. सत्ताधारी श्रेय लाटण्यासाठी भुमिपूजनाचे घाट घालतात मात्र ठरावाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ज्या काही परवानग्या ठराविक मुदतीत घ्याव्या लागतात त्या घेतल्या जात नाहीत परिणामी असे ठराव पुन्हा पुन्हा मंजुर करण्याची नामुष्की येते त्याचा गांभिर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.-------------------------------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली