शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शहरांची स्वच्छता, हिरवळीचेही होणार मोजमाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 04:32 IST

येत्या १ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

नारायण जाधव ठाणे : येत्या १ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याचे औचित्य साधून नगरविकासविभागाने राज्यातील शहरे चकाचक व्हावीत, स्वच्छ महाराष्ट्र अथवा स्वच्छ भारत मिशनला चालना मिळावी, यासाठी राज्यातील सर्व शहरांसाठी १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या दोन महिन्यांच्या काळात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.या काळात शहरांची केवळ स्वच्छताच नव्हे, तर त्यात सुंदरता व हिरवळीचेही मोजमाप केले जाणार आहे. यासाठी सर्व शहरांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासह आपल्या हद्दीतील रस्ते, चौक, वाहतूक बेटांसह उद्याने अधिकाधिक स्वच्छ, हरित, सुंदर दिसावीत, यासाठी स्पर्धा आयोजिली आहे.>ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रावर भरस्वच्छता अभियानात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनावर भर देण्यात येत होता. मात्र, या हीरक महोत्सवी महाराष्ट्र अभियानात सर्व शहरांच्या प्रशासनाला त्यांच्या शहरांतील नाल्यांची सफाई करून ते स्वच्छ करण्यास सांगण्यात आले आहे. यात नागरिकांना सहभागी करून त्यांना त्यात कचरा टाकण्यास परावृत्त करणे, उड्डाणपुलाखालील जागा स्वच्छ करून त्यात आकर्षक उद्यान विकसित करणे, शहरांतील जाहिरात फलक काढणे, उद्यानांचे सुशोभीकरण करून त्यात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा उभारण्यास सांगण्यात आले आहे.फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करादेशात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास सर्वच शहरांना सांगण्यात आले आहे. मात्र, कोठेही ती झालेली नाही. नेमके हेच हेरून या हीरक महोत्सवी अभियानात सर्वच शहरांच्या आयुक्त/मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या शहरांत फेरीवाला झोन तयार करून त्यात फेरीवाल्यांना बसण्यास प्रवृत्त करून इतर ठिकाणच्या फेरीवाल्यांना हटविण्यास सांगण्यास आले आहे.>‘अमृत अभियानासह चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करा’‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियान’अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना जो खर्च करावा लागणार आहे, तो चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळणाºया निधीतून स्वच्छ महाराष्ट्र राखीव ठेवलेल्या ५० टक्के रक्कम अथवा अमृत अभियानांतर्गत मिळणाºया अनुदानातून खर्च करण्यास सांगण्यात आले आहे.