शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

केडीएमसीत संघर्षची अखेर ‘समेट समिती’ झालीच

By admin | Updated: October 17, 2015 01:49 IST

संघर्ष समितीची समेट समिती होऊ नये, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केडीएमसी निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरलेल्या संघर्ष समितीला स्पष्ट केले होते.

अनिकेत घमंडी, डोंबिवलीसंघर्ष समितीची समेट समिती होऊ नये, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केडीएमसी निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरलेल्या संघर्ष समितीला स्पष्ट केले होते. त्यांनीही तसे होणार नसल्याचा शब्द दिला होता. प्रत्यक्षात मात्र शुक्रवारी केडीएमसी निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेत तसे काहीच झाले नाही. समितीने पाठिंबा दिलेल्या भाजपाच्या उमेदवारांसह त्यांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे अखेरीस त्या समितीची समेट समिती झालीच, असा आरोप करून ठाकरेंचे शब्द खरे ठरले, अशीटीका मनसेचे राज्य चिटणीस आणि कल्याण जिल्हाप्रमुख राजू (प्रमोद) पाटील यांनी केली. २१ जागांपैकी १७ जागांवर भाजपासह संघर्ष समिती उमेदवारांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवून निवडणूक रिंगणात असल्याचे जाहीर केले. शिवसेनेने आधीपासूनच त्या गावांमधील उमेदवारांना अंडरग्राउंड करून ठेवले असल्याने त्या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नव्हता. त्यातच संघर्ष समितीने असे धोरण घेतल्याने मनसेनेही त्यांचे तीनपैकी दोन उमेदवार रिंगणात कायम ठेवले आहेत. शनिवारी ठाकरे जेव्हा डोंबिवलीत आले होते, तेव्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे सांगितले होते. त्यावर, त्यांनी समितीला वरील बोल सुनावून तसे केले नाही तर पाठिंबा कायम असेल, तसेच त्यासंदर्भातला सर्वस्वी निर्णय हा पाटील घेतील, असे मीडियासमोर स्पष्ट केले होते. त्यानुसार, निवडणूक अर्ज भरले गेले. ते मागे घेण्यासंदर्भात काम सुरू झाले. समिती त्यासाठी ठिकठिकाणी दबावतंत्र, जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होती. त्याला बसपाच्या उमेदवार बिनविरोध आल्यावर फाटा फुटल्याने शिवसेनेने तातडीने त्यांचे उमेदवार सुरक्षित ठिकाणी नेले. अशा तणावासह गंभीर स्थितीत शुक्रवारी संघर्ष समिती काय करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुपारी ३ ला चित्र स्पष्ट झाले आणि समितीने काही ठिकाणी पाठिंबा तर काही ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचा कानोसा घेऊन मनसेनेही त्यांच्या ३ उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नका, असा संदेश दिला होता. त्यापैकी काटई आणि नांदिवलीच्या उमेदवाराने ते मागे घेतले नाहीत, तर हेदुटणेच्या मनसेच्या उमेदवाराने माघार घेतली. त्याविषयी त्यांनी संताप व्यक्त केला.