शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
6
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
7
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
8
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
9
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
10
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
11
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
12
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
13
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
14
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
16
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
17
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
18
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
19
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
20
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)

केडीएमसीत संघर्षची अखेर ‘समेट समिती’ झालीच

By admin | Updated: October 17, 2015 01:49 IST

संघर्ष समितीची समेट समिती होऊ नये, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केडीएमसी निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरलेल्या संघर्ष समितीला स्पष्ट केले होते.

अनिकेत घमंडी, डोंबिवलीसंघर्ष समितीची समेट समिती होऊ नये, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केडीएमसी निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरलेल्या संघर्ष समितीला स्पष्ट केले होते. त्यांनीही तसे होणार नसल्याचा शब्द दिला होता. प्रत्यक्षात मात्र शुक्रवारी केडीएमसी निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेत तसे काहीच झाले नाही. समितीने पाठिंबा दिलेल्या भाजपाच्या उमेदवारांसह त्यांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे अखेरीस त्या समितीची समेट समिती झालीच, असा आरोप करून ठाकरेंचे शब्द खरे ठरले, अशीटीका मनसेचे राज्य चिटणीस आणि कल्याण जिल्हाप्रमुख राजू (प्रमोद) पाटील यांनी केली. २१ जागांपैकी १७ जागांवर भाजपासह संघर्ष समिती उमेदवारांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवून निवडणूक रिंगणात असल्याचे जाहीर केले. शिवसेनेने आधीपासूनच त्या गावांमधील उमेदवारांना अंडरग्राउंड करून ठेवले असल्याने त्या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नव्हता. त्यातच संघर्ष समितीने असे धोरण घेतल्याने मनसेनेही त्यांचे तीनपैकी दोन उमेदवार रिंगणात कायम ठेवले आहेत. शनिवारी ठाकरे जेव्हा डोंबिवलीत आले होते, तेव्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे सांगितले होते. त्यावर, त्यांनी समितीला वरील बोल सुनावून तसे केले नाही तर पाठिंबा कायम असेल, तसेच त्यासंदर्भातला सर्वस्वी निर्णय हा पाटील घेतील, असे मीडियासमोर स्पष्ट केले होते. त्यानुसार, निवडणूक अर्ज भरले गेले. ते मागे घेण्यासंदर्भात काम सुरू झाले. समिती त्यासाठी ठिकठिकाणी दबावतंत्र, जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होती. त्याला बसपाच्या उमेदवार बिनविरोध आल्यावर फाटा फुटल्याने शिवसेनेने तातडीने त्यांचे उमेदवार सुरक्षित ठिकाणी नेले. अशा तणावासह गंभीर स्थितीत शुक्रवारी संघर्ष समिती काय करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुपारी ३ ला चित्र स्पष्ट झाले आणि समितीने काही ठिकाणी पाठिंबा तर काही ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचा कानोसा घेऊन मनसेनेही त्यांच्या ३ उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नका, असा संदेश दिला होता. त्यापैकी काटई आणि नांदिवलीच्या उमेदवाराने ते मागे घेतले नाहीत, तर हेदुटणेच्या मनसेच्या उमेदवाराने माघार घेतली. त्याविषयी त्यांनी संताप व्यक्त केला.