शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

केडीएमसीत संघर्षची अखेर ‘समेट समिती’ झालीच

By admin | Updated: October 17, 2015 01:49 IST

संघर्ष समितीची समेट समिती होऊ नये, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केडीएमसी निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरलेल्या संघर्ष समितीला स्पष्ट केले होते.

अनिकेत घमंडी, डोंबिवलीसंघर्ष समितीची समेट समिती होऊ नये, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केडीएमसी निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरलेल्या संघर्ष समितीला स्पष्ट केले होते. त्यांनीही तसे होणार नसल्याचा शब्द दिला होता. प्रत्यक्षात मात्र शुक्रवारी केडीएमसी निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेत तसे काहीच झाले नाही. समितीने पाठिंबा दिलेल्या भाजपाच्या उमेदवारांसह त्यांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे अखेरीस त्या समितीची समेट समिती झालीच, असा आरोप करून ठाकरेंचे शब्द खरे ठरले, अशीटीका मनसेचे राज्य चिटणीस आणि कल्याण जिल्हाप्रमुख राजू (प्रमोद) पाटील यांनी केली. २१ जागांपैकी १७ जागांवर भाजपासह संघर्ष समिती उमेदवारांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवून निवडणूक रिंगणात असल्याचे जाहीर केले. शिवसेनेने आधीपासूनच त्या गावांमधील उमेदवारांना अंडरग्राउंड करून ठेवले असल्याने त्या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नव्हता. त्यातच संघर्ष समितीने असे धोरण घेतल्याने मनसेनेही त्यांचे तीनपैकी दोन उमेदवार रिंगणात कायम ठेवले आहेत. शनिवारी ठाकरे जेव्हा डोंबिवलीत आले होते, तेव्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे सांगितले होते. त्यावर, त्यांनी समितीला वरील बोल सुनावून तसे केले नाही तर पाठिंबा कायम असेल, तसेच त्यासंदर्भातला सर्वस्वी निर्णय हा पाटील घेतील, असे मीडियासमोर स्पष्ट केले होते. त्यानुसार, निवडणूक अर्ज भरले गेले. ते मागे घेण्यासंदर्भात काम सुरू झाले. समिती त्यासाठी ठिकठिकाणी दबावतंत्र, जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होती. त्याला बसपाच्या उमेदवार बिनविरोध आल्यावर फाटा फुटल्याने शिवसेनेने तातडीने त्यांचे उमेदवार सुरक्षित ठिकाणी नेले. अशा तणावासह गंभीर स्थितीत शुक्रवारी संघर्ष समिती काय करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुपारी ३ ला चित्र स्पष्ट झाले आणि समितीने काही ठिकाणी पाठिंबा तर काही ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचा कानोसा घेऊन मनसेनेही त्यांच्या ३ उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नका, असा संदेश दिला होता. त्यापैकी काटई आणि नांदिवलीच्या उमेदवाराने ते मागे घेतले नाहीत, तर हेदुटणेच्या मनसेच्या उमेदवाराने माघार घेतली. त्याविषयी त्यांनी संताप व्यक्त केला.