शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

नालेसफाई झाली; मात्र गाळ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पावसाळ्याआधी शहरातील नाल्यांची सफाई होणे गरजेचे आहे; परंतु शहरातील नालेसफाईवरून सध्या राजकारण चांगलेच तापले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : पावसाळ्याआधी शहरातील नाल्यांची सफाई होणे गरजेचे आहे; परंतु शहरातील नालेसफाईवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी शिवसेनेने ७० टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा केला आहे, तर ही ‘नालेसफाई नसून हात की सफाई’ असल्याचा आरोप करीत भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे; परंतु प्रत्यक्ष पाहणीत नाल्यांची सफाई ही वरवर झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ७० टक्के नालेसफाई झाली असली तरी पावसाळ्यात हा दावा फोल ठरणार असल्याचेच दिसत आहे. त्यातही नाल्यातील गाळ काढून रस्त्याच्या कडेला किंवा काही नाल्यांच्या बाजूलाच त्याच ढिगारा लावण्यात आला आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेला गाळ वाहनांमुळे अस्ताव्यस्त झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.

ठाण्यातील नाल्यांची सफाई हा दरवर्षी वादग्रस्त मुद्दा ठरतो. यंदाही नालेसफाईच्या कामाला उशिराने सुरुवात झाली आहे. त्यामुळे वेळेत नालेसफाई होणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. असे असताना आता ३१ मेपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. दरम्यान, प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत आजही शहराच्या विविध भागात नाल्यांची सफाई सुरू आहे. त्यानुसार ७० टक्क्यांपर्यंत गाळ काढण्यात आल्याचे दिसत आहे; परंतु खालपर्यंत गाळ मात्र काढला गेलेला नाही. यासंदर्भात पालिकेशी चर्चा केली तर खालचा गाळ काढायचा झाला तर त्यासाठी लागणारे बजेट पालिकेकडे नाही. त्यासाठी ३५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे; परंतु सध्या नालेसफाईसाठी ९ कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्यानुसार कामे सुरू असल्याचे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे; परंतु असे असले तरीही अनेक ठिकाणी नाल्यातील गाळ एक तर रस्त्यांच्या कडेला टाकण्यात आला आहे किंवा काही ठिकाणी तर नाल्यातील गाळ हा नाल्याच्या बाजूलाच असलेल्या मातीवर रचून ठेवण्यात आला आहे. घोडबंदरच्या अनेक नाल्यांच्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. पावसाळ्याच्या आत हा गाळ उचलला गेला नाही तर पावसामुळे पुन्हा तो गाळ मातीसकट नाल्यात येऊन त्याचा परिणाम येथील रहिवाशांना भोगावा लागणार आहे.

दुसरीकडे रस्त्यांवरही गाळ काढून टाकण्यात आला आहे. हा गाळ ओला असल्याने सुकल्याशिवाय तो नेता येत नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे; परंतु अनेक ठिकाणी हा गाळ आता रस्त्यावर इतरत्र पसरू लागला आहे. वाहनांमुळेही हा गाळ रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे हा त्रासदेखील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे गाळ जरी काढल्याचा दावा केला जात असला तरी कुठेतरी हात की सफाई झाल्याचेच दिसत आहे, तर या नालेसफाईचे चित्रीकरण करण्यात येत असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे छायाचित्रीकरणही करण्यात आलेले नाही.

नाल्यांची माहिती

प्रभाग समिती- मोठे नाले -छोटे नाले

कळवा - १ - १८८

नौपाडा - ३ - ४४

वागळे- १३ - २५

लोकमान्य - १ - ३३

उथळसर - १ - ३१

वर्तकनगर - ७ - २२

माजीवडा, मानपाडा - ८- ३१

मुंब्रा - ० - ६१

दिवा- ४ - १२५

एकूण- ३८ - ५६०