शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नालेसफाई झाली; मात्र गाळ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पावसाळ्याआधी शहरातील नाल्यांची सफाई होणे गरजेचे आहे; परंतु शहरातील नालेसफाईवरून सध्या राजकारण चांगलेच तापले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : पावसाळ्याआधी शहरातील नाल्यांची सफाई होणे गरजेचे आहे; परंतु शहरातील नालेसफाईवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी शिवसेनेने ७० टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा केला आहे, तर ही ‘नालेसफाई नसून हात की सफाई’ असल्याचा आरोप करीत भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे; परंतु प्रत्यक्ष पाहणीत नाल्यांची सफाई ही वरवर झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ७० टक्के नालेसफाई झाली असली तरी पावसाळ्यात हा दावा फोल ठरणार असल्याचेच दिसत आहे. त्यातही नाल्यातील गाळ काढून रस्त्याच्या कडेला किंवा काही नाल्यांच्या बाजूलाच त्याच ढिगारा लावण्यात आला आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेला गाळ वाहनांमुळे अस्ताव्यस्त झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.

ठाण्यातील नाल्यांची सफाई हा दरवर्षी वादग्रस्त मुद्दा ठरतो. यंदाही नालेसफाईच्या कामाला उशिराने सुरुवात झाली आहे. त्यामुळे वेळेत नालेसफाई होणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. असे असताना आता ३१ मेपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. दरम्यान, प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत आजही शहराच्या विविध भागात नाल्यांची सफाई सुरू आहे. त्यानुसार ७० टक्क्यांपर्यंत गाळ काढण्यात आल्याचे दिसत आहे; परंतु खालपर्यंत गाळ मात्र काढला गेलेला नाही. यासंदर्भात पालिकेशी चर्चा केली तर खालचा गाळ काढायचा झाला तर त्यासाठी लागणारे बजेट पालिकेकडे नाही. त्यासाठी ३५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे; परंतु सध्या नालेसफाईसाठी ९ कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्यानुसार कामे सुरू असल्याचे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे; परंतु असे असले तरीही अनेक ठिकाणी नाल्यातील गाळ एक तर रस्त्यांच्या कडेला टाकण्यात आला आहे किंवा काही ठिकाणी तर नाल्यातील गाळ हा नाल्याच्या बाजूलाच असलेल्या मातीवर रचून ठेवण्यात आला आहे. घोडबंदरच्या अनेक नाल्यांच्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. पावसाळ्याच्या आत हा गाळ उचलला गेला नाही तर पावसामुळे पुन्हा तो गाळ मातीसकट नाल्यात येऊन त्याचा परिणाम येथील रहिवाशांना भोगावा लागणार आहे.

दुसरीकडे रस्त्यांवरही गाळ काढून टाकण्यात आला आहे. हा गाळ ओला असल्याने सुकल्याशिवाय तो नेता येत नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे; परंतु अनेक ठिकाणी हा गाळ आता रस्त्यावर इतरत्र पसरू लागला आहे. वाहनांमुळेही हा गाळ रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे हा त्रासदेखील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे गाळ जरी काढल्याचा दावा केला जात असला तरी कुठेतरी हात की सफाई झाल्याचेच दिसत आहे, तर या नालेसफाईचे चित्रीकरण करण्यात येत असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे छायाचित्रीकरणही करण्यात आलेले नाही.

नाल्यांची माहिती

प्रभाग समिती- मोठे नाले -छोटे नाले

कळवा - १ - १८८

नौपाडा - ३ - ४४

वागळे- १३ - २५

लोकमान्य - १ - ३३

उथळसर - १ - ३१

वर्तकनगर - ७ - २२

माजीवडा, मानपाडा - ८- ३१

मुंब्रा - ० - ६१

दिवा- ४ - १२५

एकूण- ३८ - ५६०