शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाई झाली; मात्र गाळ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पावसाळ्याआधी शहरातील नाल्यांची सफाई होणे गरजेचे आहे; परंतु शहरातील नालेसफाईवरून सध्या राजकारण चांगलेच तापले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : पावसाळ्याआधी शहरातील नाल्यांची सफाई होणे गरजेचे आहे; परंतु शहरातील नालेसफाईवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी शिवसेनेने ७० टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा केला आहे, तर ही ‘नालेसफाई नसून हात की सफाई’ असल्याचा आरोप करीत भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे; परंतु प्रत्यक्ष पाहणीत नाल्यांची सफाई ही वरवर झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ७० टक्के नालेसफाई झाली असली तरी पावसाळ्यात हा दावा फोल ठरणार असल्याचेच दिसत आहे. त्यातही नाल्यातील गाळ काढून रस्त्याच्या कडेला किंवा काही नाल्यांच्या बाजूलाच त्याच ढिगारा लावण्यात आला आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेला गाळ वाहनांमुळे अस्ताव्यस्त झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.

ठाण्यातील नाल्यांची सफाई हा दरवर्षी वादग्रस्त मुद्दा ठरतो. यंदाही नालेसफाईच्या कामाला उशिराने सुरुवात झाली आहे. त्यामुळे वेळेत नालेसफाई होणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. असे असताना आता ३१ मेपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. दरम्यान, प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत आजही शहराच्या विविध भागात नाल्यांची सफाई सुरू आहे. त्यानुसार ७० टक्क्यांपर्यंत गाळ काढण्यात आल्याचे दिसत आहे; परंतु खालपर्यंत गाळ मात्र काढला गेलेला नाही. यासंदर्भात पालिकेशी चर्चा केली तर खालचा गाळ काढायचा झाला तर त्यासाठी लागणारे बजेट पालिकेकडे नाही. त्यासाठी ३५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे; परंतु सध्या नालेसफाईसाठी ९ कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्यानुसार कामे सुरू असल्याचे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे; परंतु असे असले तरीही अनेक ठिकाणी नाल्यातील गाळ एक तर रस्त्यांच्या कडेला टाकण्यात आला आहे किंवा काही ठिकाणी तर नाल्यातील गाळ हा नाल्याच्या बाजूलाच असलेल्या मातीवर रचून ठेवण्यात आला आहे. घोडबंदरच्या अनेक नाल्यांच्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. पावसाळ्याच्या आत हा गाळ उचलला गेला नाही तर पावसामुळे पुन्हा तो गाळ मातीसकट नाल्यात येऊन त्याचा परिणाम येथील रहिवाशांना भोगावा लागणार आहे.

दुसरीकडे रस्त्यांवरही गाळ काढून टाकण्यात आला आहे. हा गाळ ओला असल्याने सुकल्याशिवाय तो नेता येत नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे; परंतु अनेक ठिकाणी हा गाळ आता रस्त्यावर इतरत्र पसरू लागला आहे. वाहनांमुळेही हा गाळ रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे हा त्रासदेखील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे गाळ जरी काढल्याचा दावा केला जात असला तरी कुठेतरी हात की सफाई झाल्याचेच दिसत आहे, तर या नालेसफाईचे चित्रीकरण करण्यात येत असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे छायाचित्रीकरणही करण्यात आलेले नाही.

नाल्यांची माहिती

प्रभाग समिती- मोठे नाले -छोटे नाले

कळवा - १ - १८८

नौपाडा - ३ - ४४

वागळे- १३ - २५

लोकमान्य - १ - ३३

उथळसर - १ - ३१

वर्तकनगर - ७ - २२

माजीवडा, मानपाडा - ८- ३१

मुंब्रा - ० - ६१

दिवा- ४ - १२५

एकूण- ३८ - ५६०