शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

वाहतूक सुरक्षा सप्ताहाची गरजच पडू नये

By admin | Updated: January 10, 2017 06:21 IST

आयुष्य अतिशय सुंदर आहे. कोणत्याही कारणासाठी केलेली घाई जीवापेक्षा महत्त्वाची नाही. स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी रिक्षाचालकांनी

ठाणे : आयुष्य अतिशय सुंदर आहे. कोणत्याही कारणासाठी केलेली घाई जीवापेक्षा महत्त्वाची नाही. स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी रिक्षाचालकांनी सजग राहण्याचे आवाहन करतानाच सुरक्षेसारख्या मूलभूत प्रश्नासाठी कार्यक्रम घेण्याची गरज पडता कामा नये, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सोमवारी येथे केले.सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक विभागाच्या वतीने साकेत मैदानावर ‘माझी रिक्षा माझी दीक्षा,’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे उपस्थित होते. यावेळी बोलताना कपिल देव यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व आॅटोरिक्षाचालकांना सांगितले. क्रिकेट खेळताना खेळाडू पूर्वी हेल्मेट, गार्ड यासारख्या सुरक्षाविषयक साहित्यांचा वापर करीत नव्हते. काळानुरूप परिस्थिती बदलली. आता सुरक्षाविषयक साहित्य वापरल्याशिवाय खेळाडूला मैदानावर प्रवेशच मिळत नाही. आॅटोरिक्षाचालकांनीही सुरक्षेचे महत्त्व ओळखण्याची गरज आहे. स्वत:च्या आणि इतरांच्याही सुरक्षेची जबाबदारी चालकांवर असते. त्यामुळे गाडी चालवताना मोबाइल फोनचा वापर करणे, उगाच घाई करणे, नियमांचे पालन न करणे सर्वांसाठीच घातक आहे. मुंबई संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे येथील आॅटोरिक्षाचालकांची जबाबदारी जास्तच आहे, असे कपिल देव यावेळी म्हणाले.रिक्षाचालकांनी नेहमी सजग असावे. गाडीत बसलेला प्रवासी संशयास्पद वाटल्यास लगेच पोलिसांना कळवावे. यातून संभाव्य गुन्हे टाळता येतील, असे प्रतिपादन अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी केले. प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सर्व चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची दीक्षा दिली. नियमांचे पालन करणाऱ्या चालकांना गणवेश आणि वाहतूकमित्र सामग्रीचे वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अभिनेत्रीदीप्ती भागवत यांनी केले. (प्रतिनिधी)