शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात पाणीच नाही

By admin | Updated: July 30, 2015 23:22 IST

पाणी आणि स्वच्छतागृह या मुलभूत सुविधाही वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात नाहीत. याशिवाय, पुरेशा मनुष्यबळाच्याअभावी मोठी कसरत करावी लागते..

- जितेंद्र कालेकर,  ठाणेपाणी आणि स्वच्छतागृह या मुलभूत सुविधाही वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात नाहीत. याशिवाय, पुरेशा मनुष्यबळाच्याअभावी मोठी कसरत करावी लागते..एकेकाळी आशियातील सर्वात मोठी असलेल्या वागळे इस्टेट इंडस्ट्रीयल इस्टेट विभागात एमआयडीसीनेच या पोलीस ठाण्याला जागा दिली. तेंव्हा १९७९ मध्ये त्याची स्थापना झाली. गेल्या ३६ वर्षांपासून जुनी असलेली या पोलीस ठाण्याची वास्तू आता धोकादायक आणि जीर्ण अवस्थेत आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर, मदन पाटील (गुन्हे), सुलभा पाटील आणि दिलीप साळुंखे या चार निरीक्षकांसह ३ एपीआय, ८ उपनिरीक्षक, १२२ कर्मचाऱ्यांना मंजूरी आहे. त्यापैकी निरीक्षक वगळता ६ उपनिरीक्षक आणि ३० ते ४० कर्मचाऱ्यांची याठिकाणी गरज आहे. संत ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगर, हाजूरी आणि मॉडेला चेक नाका या चार बीटमध्ये ठाणे महापालिकेचे रायलादेवी प्रभाग समिती, कामगार रुग्णालय, पासपोर्ट, कामगार न्यायालय, प्रादेशिक परिवहन विभाग ही महत्वाची कार्यालये तसेच इटर्निटी मॉल, ४ महाविद्यालय, ४० ज्वेलर्सची दुकाने, १० बँका आदींसह आठ लाख लोकसंख्येची वस्ती या पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत येते. चोरी, घरफोडी, फसवणूक, विनयभंग आणि फसवणूकीच्या गुन्हयांचे नेहमीच आव्हान आहे. त्यामुळे गुन्हेगारीसह इतक्या मोठया परिसराची कायदा सुव्यवस्था हाताळतांना तहान भूक विसरावी लागतेच पण, ३६५ दिवस निर्जळीही करावी लागते. एकेकाळी, सुरक्षितता म्हणून कुख्यात डॉन अरुण गवळीलाही इथल्या कोठडीत ठेवले होते. आता मात्र तीन कोठड्यांपैकी एकीची दुरवस्था असून उर्वरित एक पुरुष तर दुसरी महिला आरोपींसाठी आहे. तिथेही कोपरी, वर्तकनगर आणि श्रीनगरच्या महिला आरोपींना ठेवले जाते. त्यामुळे ती अपुरी पडते. दोन पैकी एक जीप नादुरुस्त तर गस्तीची मोठी व्हॅनही गेल्या चार महिन्यांपासून दुरुस्तीला गेलेली आहे. अशा परिस्थितीत पोलीसांकडून कार्यक्षमतेची काय अपेक्षा करणार? एका निरीक्षकाला तर कॅबिन नाही. स्वच्छतागृह नावालाच आहे. मुद्देमाल, हत्यार रुमचीही दुरवस्था आहे. प्रशस्त जागा असूनही धोकादायक आणि अपुऱ्या जागेतूनच पोलीसांना काम करावे लागत आहे. त्यामुळे किमान लोकसंख्येच्या निकषानुसार जादा संख्याबळ आणि प्रशस्त नवी इमारत मिळावी, अशी माफक अपेक्षा येथील कर्मचाऱ्यांची आहे. सरकार कडे पैसे नसतील तर युती सरकारच्या काळात परिवन मंत्री प्रमोद नवलकर यांनी जशी प्रायोजकांच्या माध्यमातून मलबार हिल आणि चर्नीरोड येथे सुसज्ज पोलीस ठाणे बांधलीत त्याचे अनुकरण ठाण्यात व्हावे अशी वर्दीची अपेक्षा आहे.