शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत शेतमालाला उठाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:42 IST

कल्याण : लॉकडाऊन होईल या भीतीने तयार असलेला शेतमाल शेतकऱ्यांनी शनिवारी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) विक्रीसाठी पाठवला ...

कल्याण : लॉकडाऊन होईल या भीतीने तयार असलेला शेतमाल शेतकऱ्यांनी शनिवारी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) विक्रीसाठी पाठवला होता. मात्र, आवक चांगली होऊनही शेतमालाला शनिवारी उठाव नव्हता. जवळपास २५ गाड्या शेतमाल पडून होता. त्यामुळे किमान २५ लाख रुपयांचे नुकसान व्यापारी आणि शेतकरी वर्गाला सोसावे लागले आहे.

कल्याण एपीएमसी ही नवी मुंबईनंतरची दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती आहे. तेथे कोरोनापूर्वी शेतमालाच्या जवळपास २२५ गाड्या दररोज येत होत्या. मात्र, कोरोनामुळे त्याला ब्रेक लागला होता. आताच कुठे एपीएमसीतील व्यापार पूर्ववत होत असताना कोरोनाचे रुग्ण वाढल्याने केडीएमसीने सर्व आस्थापनांना विविध निर्बंध लावले. कोरोनाने उच्चांक गाठला होता तेव्हाही बाजार समितीला सूट दिली होती. आता पुन्हा बाजार समिती ५० टक्के क्षमतेने सम-विषम तारखांनुसार सुरू ठेवण्याचे आदेश काढले.

लॉकडाऊनच्या भीतीपोटी एपीएमसीत शनिवारी शेतमाल खरेदीसाठी गर्दी होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. मालाची १२५ गाड्यांची आवक झाली आहे. आवक ५० टक्के क्षमतेनुसार चांगली झाली. मात्र, मालाला उठाव नव्हता. सध्या कोरोनामुळे बाजारात ग्राहक फिरकत नाहीत. सायंकाळी ६ वाजता सर्व काही बंद होत असल्याने ग्राहक येत नाहीत. बाजार समितीचा व्यापार हा पहाटे २ ते दुपारी १२ दरम्यानच्या वेळेत होतो. त्यानंतर ग्राहक एपीएमसीत फिरकत नाहीत. २५ गाड्या माल पडून होता. त्यामुळे व्यापारी व शेतकऱ्यांचे जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती बाजार समितीचे संचालक सदस्य व व्यापारी बाबाजी पोखरकर यांनी दिली आहे.

नाशीवंत माल फेकून देण्याची वेळ

- एपीएमसीचे संचालक सदस्य व व्यापारी संघटनेचे मोहन नाईक म्हणाले, शनिवारी माल पडून होता. तसेच कोरोनामुळे रविवारी एपीएमसीचा व्यापार पूर्णपणे बंद ठेवण्यात येताे. रविवारी व्यापार सुरू ठेवण्याची व्यापाऱ्यांची मागणी बाजार समिती संचालक मंडळाने मान्य करून तसा ठरावही केला. मात्र, पोलीस या ठरावाला जुमानत नसल्याने बाजार बंद असतो.

- दुसरीकडे रविवारी एपीएमसी बंद असल्याने शनिवारी उरलेला माल फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर येणार आहे. त्यात पालेभाज्या, कोथिंबीर व अन्य नाशीवंत भाजीपाला आहे. त्यात सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्याने एपीएमसीचे कर्मचारी शनिवारी कामावर नसतात. त्यामुळे शनिवारी प्रशासकीय कामकाजात अडथळे येतात.

---------------