शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

भार्इंदरमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी रस्ताच नाही

By admin | Updated: January 10, 2017 06:34 IST

भार्इंदर स्थानकावर जाण्यासाठी प्रवाशांसाठी असलेला रस्ता आधीच अरुंद आहे. त्यातच तिथे फेरीवाले बसतात. तसेच तेथे वाहनतळही असल्याने

मीरा रोड : भार्इंदर स्थानकावर जाण्यासाठी प्रवाशांसाठी असलेला रस्ता आधीच अरुंद आहे. त्यातच तिथे फेरीवाले बसतात. तसेच तेथे वाहनतळही असल्याने प्रवाशांना त्रास होतो. त्याबाबत, अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांकडून संताप होतो आहे.उत्तरेकडील पादचारी पुलाचा रेल्वे प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात वापर होतो. एसटी तसेच स्थानिक परिवहनच्या बसेसही येथूनच सुटतात. येथेच रिक्षा स्टॅण्ड असल्याने या पुलाचा प्रवाशांकडून अधिक वापर होतो. त्यामुळे येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. प्रवाशांना स्थानकावर जाण्यासाठी पादचारी पुलाजवळ सुमारे १० ते १५ फूट रस्ता उपलब्ध आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा अरुंद रस्ता प्रवाशांना चालण्यासाठी अपुरा पडतो. अगोदरच या पुलाशेजारी नवीन पादचारी पुलाचे काम सुरू असल्याने प्रवाशांना अडथळा होतो. याच पुलाजवळ दुचाकीसाठी बेकायदेशीर वाहनतळ निर्माण झाल्याने दुचाकीचालक प्रवाशांच्या गर्दीतूनच वाहनतळाकडे येजा करतात. यामुळे प्रवाशांचा त्रास वाढत असतानाही रेल्वे प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत आहे. वास्तविक, येथे रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तरीही, तेथे बेकायदेशीरपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांना नजरेआड केले जात आहे. ऐन गर्दीवेळी तर फेरीवाले आणि दुचाकीचालक यांच्याशी प्रवाशांचा वाद होतो. यात वृद्ध, अपंग आणि महिलांना बराच त्रास सहन करावा लागतो. याबाबत, अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. रेल्वेचा एखादा वरिष्ठ अधिकारी अथवा मंत्री रेल्वे स्थानकाला भेट देणार असल्यास तेथील फेरीवाल्यांसह वाहनतळ तात्पुरते हटवले जाते. प्रशासनाच्या या स्वार्थी कारभारामुळे प्रवाशांत नाराजी आहे. (वार्ताहर)