शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

ग्रामीण भागातील एसटीला प्रतिसादच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एसटी महामंडळाने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बस सुरू केल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : एसटी महामंडळाने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बस सुरू केल्या आहेत. एसटीच्या ठाणे विभागानेदेखील ग्रामीण भागातील सेवा सुरू केली आहे. मात्र त्याला काहीच प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. रोजच्या रोज वाडा, शहापूर, मुरबाड आदी भागात प्रत्येकी १५ च्या आसपास बस धावत आहेत. परंतु, ग्रामीण भागात शाळा बंद असल्याने नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती एसटीकडून देण्यात आली.

एसटी महामंडळाने ‘गाव तिथे एसटी’ अशी सेवा सुरू केली होती; मात्र, कोरोनामुळे शहरातच एसटी धावत असल्याचे चित्र दिसून आले आहे. ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटी बंदच ठेवली होती. पहिल्या लाटेपाठोपाठ दुसऱ्या लाटेतही ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटी बंदच होती. त्यामुळे येथील नागरिकांना तारेवरची कसरत करून डुगडुगी, टमटम, रिक्षाची मदत घेऊन इच्छित स्थळ गाठावे लागत होते. आता कुठे मागील आठडय़ापासून ग्रामीण भागात एसटी सोडल्या जाऊ लागल्या आहेत. परंतु, यातही अत्यावश्यक सेवेसाठीच त्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे. १०० टक्के बस नाहीत. परंतु, ज्या लोकांना जाण्यासाठी सोय नाही, अशा कुठल्याही बस आता बंद नसल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार मुरबाड, शहापूर, वाडा आदी ग्रामीण भागात बस सुरू केलेल्या आहेत. परंतु, या मार्गावर काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. यातील प्रत्येक मार्गावर दिवसाला प्रत्येकी १५ बस धावत आहेत.

आगारातील एकूण बसेस - ५५०

कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या - १०० टक्के फेऱ्या होत होत्या

सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - ५० टक्के

खेडेगावात जाण्यासाठी ‘टमटम’चा आधार

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटी आता कुठे सुरू झाली असली, तरी त्याला १०० टक्के प्रतिसाद मिळत नाही. किंबहुना काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. या बस मुरबाड, वाडा आणि शहापूर या मार्गांवर धावत आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत या भागातील बस बंद होत्या. त्यामुळे येथील नागरिकांना टमटम किंवा डुगडुगीचा आधार घ्यावा लागल्याचे दिसून आले आहे.

४१ हजार कि.मी.चा प्रवास, पण फक्त शहरांचाच!

दुसरी लाट ओसरल्यानंतर ठाणे आगारातून ३५० च्या आसपास बस रस्त्यावर उतरविल्या आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी, राज्याअंतर्गत, रातराणी बसेस सुरू आहेत. परंतु त्यांचा प्रवास हा रोजच्या रोज सुमारे ४१ हजार किमीचाच होत आहे. त्यातही याला प्रतिसाद मात्र आजही ५१ टक्क्याच्या आसपास असून, उत्पन्नदेखील ३० ते ३५ लाखांच्याच घरात आहे.

.....

कोरोनामुळे आम्हाला कुठे जाणे शक्य होत नाही. परंतु, कोरोनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेत आम्हाला डुगडुगी किंवा टमटमचाच आधार होता. एसटी बंद असल्याने कुठे जायचे झाल्यास याच खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.

(संजय पाटील, मुरबाड)

....

आता बस सुरू झाल्या असल्या, तरी त्याचे नियोजन अद्यापही दिसून येत नाही. बसचे प्रमाण ग्रामीण भागात कमी आहे. त्यामुळे टमटम किंवा रिक्षानेच इच्छित स्थळ गाठावे लागत आहे. (किरण राऊत-खडवली)

....

शहरी भागासह ग्रामीण भागातही आता बस सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि वाडा या मार्गावर बस सुरू झाल्या आहेत. परंतु, त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नाही. शाळादेखील बंद असल्याने त्यांना प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

(विनोदकुमार भालेराव - विभागीय नियंत्रक, ठाणे)