शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यातील शेकडो एकरावर लावणीच नाही

By admin | Updated: August 17, 2016 02:15 IST

तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जात असले तरी आता निसर्गाचा लहरीपणा, मजुरांची कमतरता, यांत्रिक उपकरणे आणि खतांचे वाढलेले दर या अनेक कारणांमुळे येथील शेतकऱ्यांनी शेकडो एक

वसंत भोईर ,  वाडातालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जात असले तरी आता निसर्गाचा लहरीपणा, मजुरांची कमतरता, यांत्रिक उपकरणे आणि खतांचे वाढलेले दर या अनेक कारणांमुळे येथील शेतकऱ्यांनी शेकडो एकर जमिनी ओस ठेवल्या आहेत. दरम्यान, ओस जमिनी बाबत कृषी विभागाने जाहीर केलेली आकडेवारी ही धादांत खोटी असून त्यांनी आमच्या शेतकऱ्यांसोबत सर्वेक्षण करावे असे खुले आव्हान प्रफुल्ल पाटील या शेतकऱ्याने कृषी विभागाला दिले आहे . वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत या वाणाला चांगली मागणी आहे. तालुक्यात १७६ गावे व २०० हून अधिक पाडे आहेत. १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रामध्ये भाताची लागवड केली जाते. येथील झिनी, सुरती, गुजरात ४, गुजरात ११, जया, रत्ना, सुवर्णा, कर्जत, मसुरी आदी भाताच्या वाणांची लागवड करून उत्पादन घेतात. तालुक्यात मोठयÞा प्रमाणात भातशेती केली जाते. या व्यवसायासाठी जास्त संख्येने मजुरांची आवश्यकता भासत असते. परंतु औद्योगिक करणामुळे येथील मजूर कारखान्यात व रेती व्यवसायावर कामाला जात असतात. भात लावणीसाठी यांत्रिक उपकरणे नसल्याने या तालुक्यात मजुरांचा प्रश्न सतावत आहे. भात शेतीत एकरी येणारा खर्च व त्यावर मिळालेले उत्पन्न यांची गोळा बेरीज केली असता उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याने वर्षानुवर्ष शेती ताट्यात चालली आहे. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष करून कारखान्यात नोकरी पत्करून आपला आहे. पूर्वी म्हणजेच २५ ते ३० वर्षापूर्वी या भागातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट होती. मात्र घरातील काही माणसे कारखान्यात कामाला जात असल्याने त्यांची आथिर्क परिस्थिती काही प्रमाणात सुधारल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत दरवर्षी तोट्यात चाललेला शेती व्यवसायाला कंटाळून आपली शेती ओस ठेवताना दिसून येत आहे. कृषी खात्याचे याकडे दुर्लक्ष आहे.मजुरी व्यतिरिक्त तीन वेळचे जेवणकाही जिल्ह्यात कृषी विद्यापीठाने तयार केलेली भातलावणी यंत्रे महागडी असल्याने ती शेतकऱ्यांना परवडू शकत नाही. भात लावणीसाठी सक्षम शेतकरी तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा व नाशिक येथून मजूर आणतात. या मजुरांना प्रतिदिन ३०० ते ३५० रूपये अधिक तीनवेळा जेवणाचा खर्च करावा लागतो. हा खर्च न परवडणारा आहे.