शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

वाड्यातील शेकडो एकरावर लावणीच नाही

By admin | Updated: August 17, 2016 02:15 IST

तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जात असले तरी आता निसर्गाचा लहरीपणा, मजुरांची कमतरता, यांत्रिक उपकरणे आणि खतांचे वाढलेले दर या अनेक कारणांमुळे येथील शेतकऱ्यांनी शेकडो एक

वसंत भोईर ,  वाडातालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जात असले तरी आता निसर्गाचा लहरीपणा, मजुरांची कमतरता, यांत्रिक उपकरणे आणि खतांचे वाढलेले दर या अनेक कारणांमुळे येथील शेतकऱ्यांनी शेकडो एकर जमिनी ओस ठेवल्या आहेत. दरम्यान, ओस जमिनी बाबत कृषी विभागाने जाहीर केलेली आकडेवारी ही धादांत खोटी असून त्यांनी आमच्या शेतकऱ्यांसोबत सर्वेक्षण करावे असे खुले आव्हान प्रफुल्ल पाटील या शेतकऱ्याने कृषी विभागाला दिले आहे . वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत या वाणाला चांगली मागणी आहे. तालुक्यात १७६ गावे व २०० हून अधिक पाडे आहेत. १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रामध्ये भाताची लागवड केली जाते. येथील झिनी, सुरती, गुजरात ४, गुजरात ११, जया, रत्ना, सुवर्णा, कर्जत, मसुरी आदी भाताच्या वाणांची लागवड करून उत्पादन घेतात. तालुक्यात मोठयÞा प्रमाणात भातशेती केली जाते. या व्यवसायासाठी जास्त संख्येने मजुरांची आवश्यकता भासत असते. परंतु औद्योगिक करणामुळे येथील मजूर कारखान्यात व रेती व्यवसायावर कामाला जात असतात. भात लावणीसाठी यांत्रिक उपकरणे नसल्याने या तालुक्यात मजुरांचा प्रश्न सतावत आहे. भात शेतीत एकरी येणारा खर्च व त्यावर मिळालेले उत्पन्न यांची गोळा बेरीज केली असता उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याने वर्षानुवर्ष शेती ताट्यात चालली आहे. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष करून कारखान्यात नोकरी पत्करून आपला आहे. पूर्वी म्हणजेच २५ ते ३० वर्षापूर्वी या भागातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट होती. मात्र घरातील काही माणसे कारखान्यात कामाला जात असल्याने त्यांची आथिर्क परिस्थिती काही प्रमाणात सुधारल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत दरवर्षी तोट्यात चाललेला शेती व्यवसायाला कंटाळून आपली शेती ओस ठेवताना दिसून येत आहे. कृषी खात्याचे याकडे दुर्लक्ष आहे.मजुरी व्यतिरिक्त तीन वेळचे जेवणकाही जिल्ह्यात कृषी विद्यापीठाने तयार केलेली भातलावणी यंत्रे महागडी असल्याने ती शेतकऱ्यांना परवडू शकत नाही. भात लावणीसाठी सक्षम शेतकरी तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा व नाशिक येथून मजूर आणतात. या मजुरांना प्रतिदिन ३०० ते ३५० रूपये अधिक तीनवेळा जेवणाचा खर्च करावा लागतो. हा खर्च न परवडणारा आहे.