शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

मीरा भाईंदर आयुक्तांच्या गोषवाऱ्यात आगरीभवनाचा उल्लेखच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:33 IST

भाईंदर पालिका : आजच्या महासभेच्या अटी ठरवण्याचा प्रस्ताव, भाड्याचा मुद्दाही ठरणार महत्त्वाचा

भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील सामाजिक वनीकरण आणि खेळाचे मैदान आरक्षणातील सहा हजार चौरस मीटर क्षेत्र सरकारने फेब्रुवारीमध्ये वगळून नव्याने सांस्कृतिक भवनासाठी ते आरक्षित केल्यानंतर आता उद्या होणाºया महासभेत आयुक्त बालाजी खतगावकर यांनी आरक्षण विकसित करण्यासाठी नियमानुसार अटी ठरवण्याचा प्रस्ताव दिला आहे. आगरीभवन असा थेट उल्लेख नसला, तरी याच आरक्षणात बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन सरकारने आधीच मंजूर केले आहे. शिवाय, मूळ आरक्षण विकसित न करता झालेली अतिक्रमणे, आगरी समाजभवनासाठी भाडे व निकष आदी मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.

मीरा-भाईंदरमधील भूमिपुत्र असलेल्या आगरी समाजाचे समाजभवन व्हावे, यासाठी २०११ मध्ये महासभेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी ठराव केला होता. भार्इंदर पूर्वेच्या आझादनगर येथील पालिकेच्या सामाजिक वनीकरण व खेळाचे मैदान या आरक्षणातील काही जागेत आगरीभवन बांधण्याचा ठराव होता. परंतु, २०१४ मध्ये राज्य सरकारने या जागेत आगरी समाजभवन बांधण्याचा प्रस्ताव फेटळला होता. त्यानंतर, २०१६ मध्ये भाजप व सेना युतीनेच आरक्षणाच्या १५ टक्के जागेत बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनाचा ठराव केला होता.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाईंदरच्या जेसलपार्क येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगरी समाजभवन मंजूर करू, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली आगरी समाज उन्नती मंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केली होती. पालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आल्यावर फेब्रुवारी २०१८ मध्ये आझादनगर येथील त्याच सामाजिक वनीकरण व खेळाचे मैदान आरक्षणातील सहा हजार चौरस मीटर क्षेत्र वगळून ती जागा आगरीभवनासाठी देण्याचा ठराव बहुमताने केला.

दरम्यान, नगरविकास विभागाने पालिकेच्या ताब्यात असलेल्या खेळाच्या मैदानातील मोकळ्या जागेवर बाळासाहेब ठाकरे कलादालन व सांस्कृतिक भवनाचे १५ टक्के बांधकाम करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आगरीभवनासाठी जागा मंजूर होण्याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. त्यावरून चर्चा होऊ लागल्या व आगरी समाज एकताच्या तरुण कार्यकर्त्यांनीही गावोगावी बैठका घेतल्याने वातावरण ढवळून निघाले. तर, डिसेंबरपर्यंत सरकारने प्रस्ताव मंजूर केला नाही, तर सेव्हन स्क्वेअर शाळेमागील आरक्षणात आगरीभवनाचा ठराव करा. सरकारकडून आम्ही मंजूर करून आणू, असे उघड आवाहन शिवसेनेने भाजपला दिले होते. यामुळे आगरी समाज उन्नती मंडळ व सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढलीच, शिवाय प्रतिष्ठेचा विषय बनला.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने २७ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगरी समाजभवनाचा प्रस्ताव फेटाळून लावतानाच आरक्षणातील सहा हजार चौरस मीटर जागा वगळून ती सांस्कृतिक भवन म्हणून आरक्षित करण्यास मंजुरी दिली होती.

आणखी एका सांस्कृतिक भवनाची चर्चामैदान व वनीकरणाचे मूळ आरक्षणच पालिकेने विकसित केले नसून यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण असतानाही पालिकेने टीडीआर बिल्डरांना दिला आहे. एमआरटीपी कायद्यात हरित क्षेत्र रद्द करता येत नाही. वनीकरण शहरातील एकमेव आरक्षण आहे, तर याच ठिकाणी बाळासाहेबांच्या नावे एक सांस्कृतिक भवन आधीच सरकारने मंजूर केले असताना तेथे आणखी एक सांस्कृतिक भवन चर्चेचा विषय आहे.