शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

मीरा भाईंदर आयुक्तांच्या गोषवाऱ्यात आगरीभवनाचा उल्लेखच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:33 IST

भाईंदर पालिका : आजच्या महासभेच्या अटी ठरवण्याचा प्रस्ताव, भाड्याचा मुद्दाही ठरणार महत्त्वाचा

भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील सामाजिक वनीकरण आणि खेळाचे मैदान आरक्षणातील सहा हजार चौरस मीटर क्षेत्र सरकारने फेब्रुवारीमध्ये वगळून नव्याने सांस्कृतिक भवनासाठी ते आरक्षित केल्यानंतर आता उद्या होणाºया महासभेत आयुक्त बालाजी खतगावकर यांनी आरक्षण विकसित करण्यासाठी नियमानुसार अटी ठरवण्याचा प्रस्ताव दिला आहे. आगरीभवन असा थेट उल्लेख नसला, तरी याच आरक्षणात बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन सरकारने आधीच मंजूर केले आहे. शिवाय, मूळ आरक्षण विकसित न करता झालेली अतिक्रमणे, आगरी समाजभवनासाठी भाडे व निकष आदी मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.

मीरा-भाईंदरमधील भूमिपुत्र असलेल्या आगरी समाजाचे समाजभवन व्हावे, यासाठी २०११ मध्ये महासभेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी ठराव केला होता. भार्इंदर पूर्वेच्या आझादनगर येथील पालिकेच्या सामाजिक वनीकरण व खेळाचे मैदान या आरक्षणातील काही जागेत आगरीभवन बांधण्याचा ठराव होता. परंतु, २०१४ मध्ये राज्य सरकारने या जागेत आगरी समाजभवन बांधण्याचा प्रस्ताव फेटळला होता. त्यानंतर, २०१६ मध्ये भाजप व सेना युतीनेच आरक्षणाच्या १५ टक्के जागेत बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनाचा ठराव केला होता.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाईंदरच्या जेसलपार्क येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगरी समाजभवन मंजूर करू, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली आगरी समाज उन्नती मंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केली होती. पालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आल्यावर फेब्रुवारी २०१८ मध्ये आझादनगर येथील त्याच सामाजिक वनीकरण व खेळाचे मैदान आरक्षणातील सहा हजार चौरस मीटर क्षेत्र वगळून ती जागा आगरीभवनासाठी देण्याचा ठराव बहुमताने केला.

दरम्यान, नगरविकास विभागाने पालिकेच्या ताब्यात असलेल्या खेळाच्या मैदानातील मोकळ्या जागेवर बाळासाहेब ठाकरे कलादालन व सांस्कृतिक भवनाचे १५ टक्के बांधकाम करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आगरीभवनासाठी जागा मंजूर होण्याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. त्यावरून चर्चा होऊ लागल्या व आगरी समाज एकताच्या तरुण कार्यकर्त्यांनीही गावोगावी बैठका घेतल्याने वातावरण ढवळून निघाले. तर, डिसेंबरपर्यंत सरकारने प्रस्ताव मंजूर केला नाही, तर सेव्हन स्क्वेअर शाळेमागील आरक्षणात आगरीभवनाचा ठराव करा. सरकारकडून आम्ही मंजूर करून आणू, असे उघड आवाहन शिवसेनेने भाजपला दिले होते. यामुळे आगरी समाज उन्नती मंडळ व सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढलीच, शिवाय प्रतिष्ठेचा विषय बनला.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने २७ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगरी समाजभवनाचा प्रस्ताव फेटाळून लावतानाच आरक्षणातील सहा हजार चौरस मीटर जागा वगळून ती सांस्कृतिक भवन म्हणून आरक्षित करण्यास मंजुरी दिली होती.

आणखी एका सांस्कृतिक भवनाची चर्चामैदान व वनीकरणाचे मूळ आरक्षणच पालिकेने विकसित केले नसून यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण असतानाही पालिकेने टीडीआर बिल्डरांना दिला आहे. एमआरटीपी कायद्यात हरित क्षेत्र रद्द करता येत नाही. वनीकरण शहरातील एकमेव आरक्षण आहे, तर याच ठिकाणी बाळासाहेबांच्या नावे एक सांस्कृतिक भवन आधीच सरकारने मंजूर केले असताना तेथे आणखी एक सांस्कृतिक भवन चर्चेचा विषय आहे.