शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

अंबरनाथमध्ये प्रशासकीय इमारतीबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये एकवाक्यता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 00:45 IST

आधीच नव्या इमारतीच्या बांधकामास विलंब होत असल्याने पुन्हा दोन मजले वाढविण्याचे काम केल्यास पालिकेचा कार्यकाळ संपण्याआधी ते काम पूर्ण होणार नाही, हे लक्षात आल्यावर आता सत्ताधाºयांनीही आहे ते काम उरकण्याची घाई सुरूकेली आहे.

पंकज पाटील, अंबरनाथअंबरनाथ नगरपालिकेने जुन्या प्रशासकीय इमारतीच्या मागच्या मैदानावर नव्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू केले आहे. मात्र, या इमारतीचे जे बांधकाम सुरू आहे, त्यात निम्मेच कार्यालय स्थलांतरित होणार आहे. संपूर्ण पालिकेचे प्रशासन या इमारतीत स्थलांतरित करण्यासाठी आणखी एक किंवा दोन मजल्यांच्या इमारतीची गरज भासणार आहे. मात्र, या इमारतीचे दोन मजले वाढविण्याबाबत सत्ताधाऱ्यांमध्येच एकवाक्यता दिसत नाही. त्यातच या इमारतीच्या वाढीव मजल्याबाबतही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे आहे ती इमारत पूर्ण करून त्यात काही कार्यालये आणि सभागृह सुरू करण्याचा विचार पालिकेने पक्का केला आहे. त्यामुळे आता पालिकेची प्रशासकीय इमारत दोन टप्प्यांत पूर्ण होणार, हे आता निश्चित झाले आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम हे संथगतीने सुरू आहे. त्यातच या इमारतीवर आणखी दोन मजले वाढविण्याबाबत पालिका प्रशासन विचार करत आहे. पालिकेला सरकारमार्फत मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून आणि पालिकेच्या अतिरिक्त निधीतून याच प्रशासकीय इमारतीवर आणखी दोन मजले वाढविण्याचा प्रस्ताव याआधीच मांडला होता. सध्या सुरू असलेल्या तीन मजली इमारतीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून काम सुरू असताना उर्वरित दोन मजले वाढविणे शक्य होते. त्या अनुषंगाने पालिकेने प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाबाबत पाच महिन्यांपूर्वी झालेल्या पालिकेच्या सभेत याच विषयावर चर्चाही झाली. मात्र, दोन मजले वाढविण्यासाठी पुन्हा नवीन निविदा प्रक्रिया करावी, अशी मागणी शिवसेनेच्या एका गटामार्फत करण्यात आली. त्यामुळे हा विषय लांबणीवर पडला. सध्या सुरू असलेल्या कामाचाच एक भाग म्हणून त्याच कंत्राटदाराकडून जुन्याच दराने आणखी दोन मजले वाढविण्याबाबत सत्ताधारी शिवसेनेचा एक गट तयार होता. तो निर्णय झाला असता तर एकाच कंत्राटदाराकडून कमी दरात वाढीव बांधकाम करणे शक्य होते. मात्र, त्यास विरोध झाल्याने आता प्रशासकीय इमारतीच्या वाढीव दोन मजल्यांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

आधीच नव्या इमारतीच्या बांधकामास विलंब होत असल्याने पुन्हा दोन मजले वाढविण्याचे काम केल्यास पालिकेचा कार्यकाळ संपण्याआधी ते काम पूर्ण होणार नाही, हे लक्षात आल्यावर आता सत्ताधाºयांनीही आहे ते काम उरकण्याची घाई सुरूकेली आहे. पालिकेचा कार्यकाळ संपण्याआधी इमारतीचे बांधकाम पूर्ण करून त्याचे उद्घाटन करण्याची घाई सुरू आहे.

प्रशासकीय इमारत उभारताना तेथे किती कार्यालये आणि सभागृह कशा पद्धतीने निर्माण होणार, याची कल्पना असतानाही हे कार्यालय कमी पडणार, हे लक्षात येण्यास विलंब लागला. इमारतीचा मूळ आराखडाच चार किंवा पाच मजली करणे गरजेचे होते. आता मात्र निम्मे कार्यालय नव्या आणि निम्मे कार्यालय जुन्या इमारतीत ठेवण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.

नवी प्रशासकीय इमारत उभारताना या इमारतीसमोर मोकळी जागा ठेवण्यात येणार होती. मात्र, कार्यालयाचे नियोजन पाहता जुनी इमारत आणखी दोन वर्षे तरी तोडता येणार नाही, हे निश्चित आहे. नव्या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीनंतर सर्व कार्यालय तेथे स्थलांतरित होऊन जुनी इमारत तोडली जाईल, ही धारणा होती. नव्या इमारतीत सभागृह, काही विभागांचे कार्यालय आणि सभापतींचे कार्यालय स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. मूळ प्रस्तावानुसार सर्व कार्यालये या तीन मजली इमारतीत स्थलांतरित होणार होती. मात्र, सध्या कार्यालय विस्तारीकरण करून दोन मजले वाढविण्याची वाट पाहणे सुरू आहे.