शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मतदान वाढण्यासाठी सर्वच केंद्रे आदर्श करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 01:19 IST

मतदारांची नावे वगळल्याने नाराजी : विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता, बदलापूरमध्ये यंदाही याद्यांमध्ये दिसला घोळ

अंबरनाथ/बदलापूर : मतदार यादीतील दुबार नावे वगळल्याचा दावा निवडणूक आयोग करित असला, तरी निवडणुकीची टक्केवारी वाढताना दिसत नाही. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोग संकल्प पुढे करित आहेत. विधानसभा क्षेत्रात एखाद दुसरे आदर्श मतदान केंद्र सुरु केले जाते. सखींसाठी खास केंद्र उभारले जाते; मात्र मतदानाची आकडेवारी वाढविण्यासाठी सर्वच मतदान केंद्रे ही आदर्श मतदान केंद्र करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून अनेक नावे वगळल्याने मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले. यासंदर्भात मतदार याद्यांची पूर्ण तपासणी करुन वगळण्यात आलेली नावे पुन्हा यादीत समाविष्ट करण्यासाठी मोहिम हाती घेणे गरजेचे आहे. दुबार नावे वगळताना बीएलओकडून प्रभागात योग्य चाचपणी केली जात नाही. त्यामुळे दुबार नावाचे कारण पुढे करुन अनेकांची नावे वगळली गेली आहेत. यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते प्रदिप पाटील यांनी केली आहे. आदर्श मतदान केंद्र आणि सखी मतदान केंद्राची संकल्पना चांगली आहे. मात्र मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वच मतदान केंद्र हे आदर्श केली पाहिजे. एखाद दुसरे मतदान केंद्र आदर्श करुन त्याचा कोणताही फायदा होणार नाही. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सर्व सुविधा देणे बंधनकारक केले पाहिजे.

बदलापुरात नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही मतदारयाद्यांचा घोळ समोर आला आहे. निवडणूक आयोगाने अलीकडेच नवीन ओळखपत्र देऊनही नवतरु ण मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे अनेक जुन्या मतदारांची नावेही यादीतून वगळल्याने मतदारांत संतापाचे वातावरण आहे. या सर्व परिस्थितीला मतदार यादीमधील घोळाला जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषी असणाºयांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी केली आहे. मतदारांसाठी शासकीय चिठ्ठी वाटणे आवश्यक असताना अशा कोणत्याही चिठ्ठी वाटल्या न गेल्याने सकाळी बहुतेक मतदान केंद्रांबाहेर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत होते. नव्या मतदारांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्रे, चिठ्ठी वाटण्यात न आल्याचा आरोप करण्यात येत आहे. अगदी अलीकडे नवीन युवकांना मतदार ओळखपत्रे मिळाली असून, अशा नवीन मतदारांची नावेच मतदारयादीत नसल्यामुळे तरूण मतदार मतदान केंद्रावरून माघारी गेले. मतदार यादीमधून नावे वगळण्याबाबत कॅप्टन आशिष दामले यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. स्थलांतरित, मयत अथवा दुबार नावे असलेल्यांची नावे मतदार यादीमधून वगळण्यात येत असतात. मात्र स्थलांतरितांची नावे वगळताना बीएलओकडून कोणतीही शहानिशा केली जात नाही, जुजबी विचारणा करून कुठेही नोटिसा बजावण्यात येत असतात. अशा नोटिसा एखाद्या कचराकुंडीवर अथवा वीज वितरणाच्या ट्रान्स्फार्मरवर चिकटवला गेल्या आहेत. मग अशा नावांची व्यवस्थित चौकशी न करता थेट नावे वगळण्यात आली असल्याचे निदर्शनास आल्याचे कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक महिने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरु होते. ज्या मतदारांची नावे आहेत, मात्र अशा मतदारांची छायाचित्रे त्या यादीत नाहीत अशा मतदारांची छायाचित्रे गोळा करण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात आली आहे. मात्र छायाचित्रे गोळा केलेल्या सर्वांची छायाचित्रे जबाबदार अधिकाºयांकडे दिली गेली नसल्याने अनेकांची नावे यादीमधून वगळण्यात आल्याचा आरोपही दामले यांनी केला आहे.

आता बहुतेक कामे ही ऑनलाईन पद्धतीने योग्य पद्धतीने होत आहेत. मतदार याद्याही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आणि मतदारांची आधारकार्डद्वारे लिंक केल्यास दुबार, मयत, स्थलांतरित अशा सर्वांची शहानिशा होऊ शकते. त्यासाठी मानिसकता असणे, आवश्यक असल्याचे दामले यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात निवडणूक आयोगाला तक्रार आणि स्थानिक पातळीवर येणाºया अडणींवर काय तोडगा काढावा यासाठी सूचना करणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक