शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

ठाणे जिल्ह्यात दोन लाख मतदारांची वाढ

By admin | Updated: January 10, 2017 06:24 IST

राज्यातील मतदारसंख्येतील वाढ लक्षात घेता ठाणे जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५६ लाख दोन हजार ६३९ मतदारसंख्येत

ठाणे : राज्यातील मतदारसंख्येतील वाढ लक्षात घेता ठाणे जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५६ लाख दोन हजार ६३९ मतदारसंख्येत दोन लाख १२ हजार ३० मतदारांची वाढ झाली आहे. यामुळे आता ठाणे जिल्ह्यात ५८ लाख १४ हजार ६६९ मतदार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मतदारसंख्येतील ३.७८ टक्के ही वाढ सर्वाधिक असल्याचे येथील उपजिल्हाधिकारी फारोग मुकादम यांनी सांगितले. यात निवडणूक होऊ घातलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात ७९ हजार १२९, तर उल्हासनगर महापालिका क्षेत्रात १३ हजार ६५२ मतदार वाढले आहेत.राज्यातील ही मतदारसंख्येतील वाढ वाखाणण्याजोगी आहे. मयत झालेले, पत्त्यावर नसलेले, स्थलांतर झालेले आदी पाच लाख ५२ हजार मतदार मागील दोन वर्षांच्या कालावधीत कमी करूनही ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीत ५८ लाख १४ हजार मतदार आहेत. यात ३१ लाख ८५ हजार ६२६ पुरुष तर २६ लाख २८ हजार ७८३ पहिला मतदार असून २६० इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी ठाणे शहरात पाच पूर्ण मतदारसंघ असून ओवळा-माजिवडा या मतदारसंघाचा काही भाग ठाणे महापालिका क्षेत्रात आहे. यामुळे या पाच मतदारसंघांत ७९ हजार १२९ मतदारसंख्या वाढलेली आहे. शहरीकरणामुळे या मतदारसंख्येत वाढ झालेली असून ओवळा-माजिवडा मतदारसंघात ७.२४ टक्के मतदारसंख्या वाढलेली आहे. कोपरी-पाचपाखाडीत ४.८९ टक्के, ठाणे ४.५१ टक्के, मुंब्रा कळवा ६.८० टक्के, ऐरोली ०.४१ आणि बेलापूर ०.८३ टक्के मतदार वाढले आहेत. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मात्र चार हजार ६९८ मतदार कमी झाले आहेत. सुमारे १.१७ टक्के मतदार या मतदारसंघाचे कमी झालेले असून त्यात सध्या तीन लाख ९८ हजार ३७२ मतदार आहेत. याउलट, भिवंडी ईस्टमध्ये १० टक्के मतदार वाढलेले असून भिवंडी वेस्टमध्येदेखील ८.४० टक्के मतदारसंख्येत सर्वाधिक वाढ झालेली आहे. याप्रमाणेच निवडणूक होऊ घातलेल्या उल्हासनगर मतदारसंघातदेखील ५.४८ टक्के मतदारसंख्या वाढलेली असून दोन लाख ६२ हजार ८३७ मतदार या महापालिका क्षेत्रात आहे. एक वर्षाच्या कालावधीत नवीन मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामुळे मतदार संख्येतील कमीअधिक फरक दिसून येत आहे. मतदारयादीतील नावे कमी करण्यापूर्वी संबंधित महापालिकेच्या स्थायी समितीमध्येदेखील ठराव घेतला जातो. ठिकठिकाणी जनजागृतीही केली जात असल्याचे मुकादम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)