शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

ठाणे जिल्ह्यात दोन लाख मतदारांची वाढ

By admin | Updated: January 10, 2017 06:24 IST

राज्यातील मतदारसंख्येतील वाढ लक्षात घेता ठाणे जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५६ लाख दोन हजार ६३९ मतदारसंख्येत

ठाणे : राज्यातील मतदारसंख्येतील वाढ लक्षात घेता ठाणे जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५६ लाख दोन हजार ६३९ मतदारसंख्येत दोन लाख १२ हजार ३० मतदारांची वाढ झाली आहे. यामुळे आता ठाणे जिल्ह्यात ५८ लाख १४ हजार ६६९ मतदार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मतदारसंख्येतील ३.७८ टक्के ही वाढ सर्वाधिक असल्याचे येथील उपजिल्हाधिकारी फारोग मुकादम यांनी सांगितले. यात निवडणूक होऊ घातलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात ७९ हजार १२९, तर उल्हासनगर महापालिका क्षेत्रात १३ हजार ६५२ मतदार वाढले आहेत.राज्यातील ही मतदारसंख्येतील वाढ वाखाणण्याजोगी आहे. मयत झालेले, पत्त्यावर नसलेले, स्थलांतर झालेले आदी पाच लाख ५२ हजार मतदार मागील दोन वर्षांच्या कालावधीत कमी करूनही ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीत ५८ लाख १४ हजार मतदार आहेत. यात ३१ लाख ८५ हजार ६२६ पुरुष तर २६ लाख २८ हजार ७८३ पहिला मतदार असून २६० इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी ठाणे शहरात पाच पूर्ण मतदारसंघ असून ओवळा-माजिवडा या मतदारसंघाचा काही भाग ठाणे महापालिका क्षेत्रात आहे. यामुळे या पाच मतदारसंघांत ७९ हजार १२९ मतदारसंख्या वाढलेली आहे. शहरीकरणामुळे या मतदारसंख्येत वाढ झालेली असून ओवळा-माजिवडा मतदारसंघात ७.२४ टक्के मतदारसंख्या वाढलेली आहे. कोपरी-पाचपाखाडीत ४.८९ टक्के, ठाणे ४.५१ टक्के, मुंब्रा कळवा ६.८० टक्के, ऐरोली ०.४१ आणि बेलापूर ०.८३ टक्के मतदार वाढले आहेत. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मात्र चार हजार ६९८ मतदार कमी झाले आहेत. सुमारे १.१७ टक्के मतदार या मतदारसंघाचे कमी झालेले असून त्यात सध्या तीन लाख ९८ हजार ३७२ मतदार आहेत. याउलट, भिवंडी ईस्टमध्ये १० टक्के मतदार वाढलेले असून भिवंडी वेस्टमध्येदेखील ८.४० टक्के मतदारसंख्येत सर्वाधिक वाढ झालेली आहे. याप्रमाणेच निवडणूक होऊ घातलेल्या उल्हासनगर मतदारसंघातदेखील ५.४८ टक्के मतदारसंख्या वाढलेली असून दोन लाख ६२ हजार ८३७ मतदार या महापालिका क्षेत्रात आहे. एक वर्षाच्या कालावधीत नवीन मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामुळे मतदार संख्येतील कमीअधिक फरक दिसून येत आहे. मतदारयादीतील नावे कमी करण्यापूर्वी संबंधित महापालिकेच्या स्थायी समितीमध्येदेखील ठराव घेतला जातो. ठिकठिकाणी जनजागृतीही केली जात असल्याचे मुकादम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)