शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
3
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
4
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
5
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
6
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
7
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
8
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
9
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
10
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
11
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
12
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
13
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
14
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
15
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
16
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
17
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
18
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
19
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
20
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात दोन लाख मतदारांची वाढ

By admin | Updated: January 10, 2017 06:24 IST

राज्यातील मतदारसंख्येतील वाढ लक्षात घेता ठाणे जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५६ लाख दोन हजार ६३९ मतदारसंख्येत

ठाणे : राज्यातील मतदारसंख्येतील वाढ लक्षात घेता ठाणे जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५६ लाख दोन हजार ६३९ मतदारसंख्येत दोन लाख १२ हजार ३० मतदारांची वाढ झाली आहे. यामुळे आता ठाणे जिल्ह्यात ५८ लाख १४ हजार ६६९ मतदार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मतदारसंख्येतील ३.७८ टक्के ही वाढ सर्वाधिक असल्याचे येथील उपजिल्हाधिकारी फारोग मुकादम यांनी सांगितले. यात निवडणूक होऊ घातलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात ७९ हजार १२९, तर उल्हासनगर महापालिका क्षेत्रात १३ हजार ६५२ मतदार वाढले आहेत.राज्यातील ही मतदारसंख्येतील वाढ वाखाणण्याजोगी आहे. मयत झालेले, पत्त्यावर नसलेले, स्थलांतर झालेले आदी पाच लाख ५२ हजार मतदार मागील दोन वर्षांच्या कालावधीत कमी करूनही ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीत ५८ लाख १४ हजार मतदार आहेत. यात ३१ लाख ८५ हजार ६२६ पुरुष तर २६ लाख २८ हजार ७८३ पहिला मतदार असून २६० इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी ठाणे शहरात पाच पूर्ण मतदारसंघ असून ओवळा-माजिवडा या मतदारसंघाचा काही भाग ठाणे महापालिका क्षेत्रात आहे. यामुळे या पाच मतदारसंघांत ७९ हजार १२९ मतदारसंख्या वाढलेली आहे. शहरीकरणामुळे या मतदारसंख्येत वाढ झालेली असून ओवळा-माजिवडा मतदारसंघात ७.२४ टक्के मतदारसंख्या वाढलेली आहे. कोपरी-पाचपाखाडीत ४.८९ टक्के, ठाणे ४.५१ टक्के, मुंब्रा कळवा ६.८० टक्के, ऐरोली ०.४१ आणि बेलापूर ०.८३ टक्के मतदार वाढले आहेत. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मात्र चार हजार ६९८ मतदार कमी झाले आहेत. सुमारे १.१७ टक्के मतदार या मतदारसंघाचे कमी झालेले असून त्यात सध्या तीन लाख ९८ हजार ३७२ मतदार आहेत. याउलट, भिवंडी ईस्टमध्ये १० टक्के मतदार वाढलेले असून भिवंडी वेस्टमध्येदेखील ८.४० टक्के मतदारसंख्येत सर्वाधिक वाढ झालेली आहे. याप्रमाणेच निवडणूक होऊ घातलेल्या उल्हासनगर मतदारसंघातदेखील ५.४८ टक्के मतदारसंख्या वाढलेली असून दोन लाख ६२ हजार ८३७ मतदार या महापालिका क्षेत्रात आहे. एक वर्षाच्या कालावधीत नवीन मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामुळे मतदार संख्येतील कमीअधिक फरक दिसून येत आहे. मतदारयादीतील नावे कमी करण्यापूर्वी संबंधित महापालिकेच्या स्थायी समितीमध्येदेखील ठराव घेतला जातो. ठिकठिकाणी जनजागृतीही केली जात असल्याचे मुकादम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)