शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

ठाण्यात दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:41 IST

ठाणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे आता लसींचादेखील तुटवडा जाणवू लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे ...

ठाणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे आता लसींचादेखील तुटवडा जाणवू लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेकडे केवळ दोन दिवसांचाच साठा शिल्लक असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. त्यामुळे शहरात गुरुवारी ५६पैकी केवळ ४४ लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यात आल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांची केंद्रांकडे धाव वाढू लागली आहे. त्यामुळे दोन दिवसांत लसीकरणाचा आवश्यक साठा उपलब्ध झाला नाही तर लसीकरण बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य विभागातील डॉक्टर्स कर्मचारी यांना देण्यास सुरुवात केली. त्यावेळी विविध संस्थांनी त्यांनी केलेल्या मागणीनुसार लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात येत होते. आता ४५ वर्षे वयोगटापुढील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. आपल्या हद्दीतील नागरिकांना लस मिळावी, या उद्देशाने ठाणे महापालिकेने ४५ ठिकाणी लसीकरण सुरू केले आहे. खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून ११ ठिकाणी लसीकरण सुरू झाले आहे. त्यानुसार शहरातील ५६ केंद्रांवर लसीकरण केले जात होते. परंतु, आता लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने ठाणे महापालिकेची केवळ ३३ केंद्र गुरुवारी सुरु होती. उर्वरित केंद्र बंद होती, तर काही केंद्रांवर यापूर्वीच एक दिवस किंवा दोन दिवसाआड लस दिली जात आहे. त्यानुसार सध्या महापालिकेचे ३३ आणि खासगी ११ अशा मिळून एकूण ४४ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. महापालिकेच्या माध्यमातून रोजच्या रोज पाच ते सात हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. परंतु, हा आकडादेखील खाली आल्याचे दिसून आले.

ठाणे महापालिकेकडे आतापर्यंत एक लाख ६२ हजार ५०० कोविशिल्डचा साठा प्राप्त झाला होता, तर कोव्हॅक्सिनचे ३९ हजार २२० डोस उपलब्ध झाले होते. त्यानुसार आतापर्यंत एक लाख ८५ हजार ६२९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दरम्यान, नागरिकांची रोजची वाढती संख्या लक्षात घेता, ठाण्यासाठी पाच ५ लाख लसींचा साठा मिळावा अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे. परंतु, तोदेखील उपलब्ध होऊ शकला नसल्याची माहिती महापालिकेने दिली. सध्या ठाणे महापालिकेकडे कोव्हॅक्सिनचा अवघा सात हजार ३२० लसीचा साठा उपलब्ध आहे, तर कोविशिल्डचा १९ हजार ३१० एवढा साठा शिल्लक आहे. हा साठा दोन दिवस पुरेल एवढा असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु, त्यानंतर साठा उपलब्ध झाला नाही तर मात्र लसीकरण केंद्र बंद करावी लागतील, अशी माहिती सुत्रांनी दिली.

लसीचा साठा अपुरा असल्याने आपल्याला लस मिळावी, यासाठी महापालिकेच्या विविध केंद्रांवर नागरिकांनी धाव घेतली होती. परंतु, लसीकरणाचे प्रमाणही महापालिकेने गुरुवारी कमी केल्याचे चित्र दिसत होते.

......

पुढील दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक आहे. जास्तीचा साठा मिळावा, यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु, अद्याप पुरेसा साठा उपलब्ध झालेला नाही.

(डॉ. राजू मुरुडकर - मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा)