शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दोस्ती विहारच्या २४० कुटुंबांना पाणी नाही

By admin | Updated: January 10, 2017 06:22 IST

वर्तकनगर येथील दोस्ती विहार या वसाहतीत राहणाऱ्या सुमारे २४० कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांना

ठाणे : वर्तकनगर येथील दोस्ती विहार या वसाहतीत राहणाऱ्या सुमारे २४० कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांना नवीन जोडणी मंजूर झाली असली तरी त्याचे काम विकासकाकडून होत नसल्याच्या निषेधार्थ रहिवाशांनी क्लब हाउसलाच सोमवारी टाळे ठोकले होते. वर्तकनगर पोलिसांत धाव घेऊन याप्रकरणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी तक्र ारही त्यांनी दाखल केली आहे.वर्तकनगर भागातील या गृहसंकुलात २० आणि त्याहून जास्त मजल्यांच्या १७ इमारती आहेत. त्यापैकी वृष्टी ए, बी आणि सी या तीन इमारतींमध्ये २४० कुटुंबे वास्तव्याला आहेत. सुरुवातीपासूनच या तीन इमारतींमध्ये पाणीटंचाईची समस्या होती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून ही समस्या मांडली. या इमारतींना दररोज १ लाख १७ हजार लीटर्स पाण्याची गरज असताना केवळ ८० हजार लीटर्स पाणीपुरवठा होतो. त्यात, दरबुधवारी पाणी बंद असल्याने पुढील तीन दिवस टंचाईचा सामना करावा लागतोे. त्यामुळे रहिवाशांच्या मागणीनंतर ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर २०१६ येथे नवीन जोडणीसाठी मंजुरी दिली. त्यानंतर, विकासकाने तातडीने हे काम पूर्ण करून समस्या सोडवणे अपेक्षित होते. मात्र, त्या कामात दिरंगाई होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रविवारी विकासकासमवेत बैठक आयोजली होती. मात्र, विकासकाचा कोणताही जबाबदार प्रतिनिधी तिथे हजर नसल्याने रहिवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. विकासकाविरोधात घोषणाबाजी करून त्यांनी सोसायटीच्या क्लब हाउसलाच टाळे ठोकले. त्यानंतर, थेट वर्तकनगर पोलीस ठाण्यात पाण्याच्या प्रश्नावरून कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, अशी तक्र ारही दाखल केली. सोमवारीसुद्धा क्लब हाउस रहिवाशांनी बंदच केले होते. हे प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर पोलिसांनी पाइपलाइनचे काम दिलेल्या ठेकेदाराला बोलवून समज दिली. दोन दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन त्याने रहिवाशांना दिले आहे. मात्र, त्याची पूर्तता न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. यासंदर्भात विकासक राजेश शहा यांनी पाणीसमस्येची बाब मान्य केली आहे. ती सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच रहिवाशांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल, असेही स्पष्ट केले. (प्रतिनिधी)