शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

दोस्ती विहारच्या २४० कुटुंबांना पाणी नाही

By admin | Updated: January 10, 2017 06:22 IST

वर्तकनगर येथील दोस्ती विहार या वसाहतीत राहणाऱ्या सुमारे २४० कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांना

ठाणे : वर्तकनगर येथील दोस्ती विहार या वसाहतीत राहणाऱ्या सुमारे २४० कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांना नवीन जोडणी मंजूर झाली असली तरी त्याचे काम विकासकाकडून होत नसल्याच्या निषेधार्थ रहिवाशांनी क्लब हाउसलाच सोमवारी टाळे ठोकले होते. वर्तकनगर पोलिसांत धाव घेऊन याप्रकरणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी तक्र ारही त्यांनी दाखल केली आहे.वर्तकनगर भागातील या गृहसंकुलात २० आणि त्याहून जास्त मजल्यांच्या १७ इमारती आहेत. त्यापैकी वृष्टी ए, बी आणि सी या तीन इमारतींमध्ये २४० कुटुंबे वास्तव्याला आहेत. सुरुवातीपासूनच या तीन इमारतींमध्ये पाणीटंचाईची समस्या होती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून ही समस्या मांडली. या इमारतींना दररोज १ लाख १७ हजार लीटर्स पाण्याची गरज असताना केवळ ८० हजार लीटर्स पाणीपुरवठा होतो. त्यात, दरबुधवारी पाणी बंद असल्याने पुढील तीन दिवस टंचाईचा सामना करावा लागतोे. त्यामुळे रहिवाशांच्या मागणीनंतर ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर २०१६ येथे नवीन जोडणीसाठी मंजुरी दिली. त्यानंतर, विकासकाने तातडीने हे काम पूर्ण करून समस्या सोडवणे अपेक्षित होते. मात्र, त्या कामात दिरंगाई होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रविवारी विकासकासमवेत बैठक आयोजली होती. मात्र, विकासकाचा कोणताही जबाबदार प्रतिनिधी तिथे हजर नसल्याने रहिवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. विकासकाविरोधात घोषणाबाजी करून त्यांनी सोसायटीच्या क्लब हाउसलाच टाळे ठोकले. त्यानंतर, थेट वर्तकनगर पोलीस ठाण्यात पाण्याच्या प्रश्नावरून कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, अशी तक्र ारही दाखल केली. सोमवारीसुद्धा क्लब हाउस रहिवाशांनी बंदच केले होते. हे प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर पोलिसांनी पाइपलाइनचे काम दिलेल्या ठेकेदाराला बोलवून समज दिली. दोन दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन त्याने रहिवाशांना दिले आहे. मात्र, त्याची पूर्तता न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. यासंदर्भात विकासक राजेश शहा यांनी पाणीसमस्येची बाब मान्य केली आहे. ती सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच रहिवाशांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल, असेही स्पष्ट केले. (प्रतिनिधी)