शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

काशिमिऱ्यात १३ सडक्या वाहिन्या

By admin | Updated: April 19, 2016 02:09 IST

काशिमीरा येथील मुन्शी कम्पाउंड येथे दीड महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या सोमवारच्या ‘हॅलो ठाणे’मध्ये प्रसिद्ध झाले

मीरा रोड : काशिमीरा येथील मुन्शी कम्पाउंड येथे दीड महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या सोमवारच्या ‘हॅलो ठाणे’मध्ये प्रसिद्ध झाले. याची दखल घेत पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर काम करून १३ गळक्या वाहिन्या शोधल्या. दोन दिवसांत नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल, असा आशावाद अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.झोपडपट्टी परिसरात पालिकेने गटार खणून अर्धवट ठेवल्याने गटार तुंबले आहे, जेणेकरून गटारातून जाणाऱ्या जुन्या जलवाहिन्यांमध्ये गटाराचे पाणी जात होते. परिणामी, पाणी येताच रहिवाशांना दुर्गंधीयुक्त पाणी मिळते. या दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. ‘लोकमत’मधील वृत्तानंतर पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता उत्तम रणदिवे यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले. परिसरात पाच ठिकाणी खणून गटारातून जाणाऱ्या सुमारे १३ सडलेल्या जलवाहिन्या शोधल्या. त्यांची दुरु स्ती हाती घेतली आहे. पालिकेचा पाणीपुरवठा सुमारे ४५ तासांनी होत असल्याने मुख्य जलवाहिनी रिकामी राहते. परिणामी, त्यावर असणाऱ्या गळक्या वाहिन्यांमधून गटाराचे पाणी मुख्य जलवाहिनीत साचते, आणि लोकांना दूषित पाणी येते. (प्रतिनिधी)