शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

...तर स्काडाने तारले असते

By admin | Updated: November 12, 2015 01:39 IST

भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे शहराला आजच्या घडीला पाणीकपातीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्याचे नियोजन हे पाणीकपातीमागचे एकमेव कारण असले तरी ती करताना गळती

ठाणे : भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे शहराला आजच्या घडीला पाणीकपातीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्याचे नियोजन हे पाणीकपातीमागचे एकमेव कारण असले तरी ती करताना गळती आणि चोरी या गोष्टीदेखील गांभीर्याने घेण्याची गरज ठाणेकरांनी व्यक्त केली आहे. शहरात आजघडीला गळतीचे प्रमाण हे ४५ टक्के असून २००८-०९ साली पाण्याचे मोजमाप करण्यासाठी आणलेली स्काडा ही प्रणाली तेव्हाच राबविली असती तर कपातीचे प्रमाणदेखील कमी असते. ही यंत्रणा पुन्हा राबवावी, अशी मागणी ‘जाग’ या संस्थेने केली आहे. ठाणे शहराला आजच्या घडीला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत असून पाणीगळतीचे प्रमाण हे ४५ टक्क्यांच्या आसपास आहे. पुरेसे पाणी असतानाही काही भागांना कपातीचा सामना करावा लागत असून योग्य नियोजन नसल्यानेही पाणी वितरण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. केवळ पाणीपुरवठ्यावर १८० कोटी रु पये वर्षाला खर्च केले जात आहेत. तर पाणीपट्टीतून सुमारे १०० कोटी तिजोरीत जमा होत आहे. ही तफावत ८० कोटींची असून केवळ सबसिडीने नागरिकांना मिळत असलेल्या पाण्यामुळे नाही तर भरमसाट होणाऱ्या गळतीमुळे निर्माण झाली आहे. २००८-०९ साली जेएनएनयूआरएम योजनेच्या माध्यमातून ठाणे महापालिकेला स्काडा यंत्रणा राबवण्यासाठी ८ ते ९ कोटी रु पयांचे अनुदान प्राप्त झाले होते. शहरातील कचरा आणि पाण्याची अद्ययावत पद्धतीने नियोजन करण्याची अट यामध्ये टाकली होती. ही संपूर्ण यंत्रणा ठेकेदाराच्या माध्यमातून राबविण्यात येणार होती. यासाठी एका कंट्रोल रूमचीदेखील निर्मिती केली होती. विविध स्रोेतांपासून येणारे पाणी आणि कोणत्या टाकीमध्ये ते किती आहे, या सर्व गोष्टींचे मोजमाप तिच्या माध्यमातून करण्यात येणार होते. मात्र, ही यंत्रणा पालिकेला राबवता आली नसल्याची माहिती संस्थेचे मिलिंद गायकवाड यांनी दिली.