शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

...तर स्काडाने तारले असते

By admin | Updated: November 12, 2015 01:39 IST

भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे शहराला आजच्या घडीला पाणीकपातीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्याचे नियोजन हे पाणीकपातीमागचे एकमेव कारण असले तरी ती करताना गळती

ठाणे : भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे शहराला आजच्या घडीला पाणीकपातीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्याचे नियोजन हे पाणीकपातीमागचे एकमेव कारण असले तरी ती करताना गळती आणि चोरी या गोष्टीदेखील गांभीर्याने घेण्याची गरज ठाणेकरांनी व्यक्त केली आहे. शहरात आजघडीला गळतीचे प्रमाण हे ४५ टक्के असून २००८-०९ साली पाण्याचे मोजमाप करण्यासाठी आणलेली स्काडा ही प्रणाली तेव्हाच राबविली असती तर कपातीचे प्रमाणदेखील कमी असते. ही यंत्रणा पुन्हा राबवावी, अशी मागणी ‘जाग’ या संस्थेने केली आहे. ठाणे शहराला आजच्या घडीला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत असून पाणीगळतीचे प्रमाण हे ४५ टक्क्यांच्या आसपास आहे. पुरेसे पाणी असतानाही काही भागांना कपातीचा सामना करावा लागत असून योग्य नियोजन नसल्यानेही पाणी वितरण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. केवळ पाणीपुरवठ्यावर १८० कोटी रु पये वर्षाला खर्च केले जात आहेत. तर पाणीपट्टीतून सुमारे १०० कोटी तिजोरीत जमा होत आहे. ही तफावत ८० कोटींची असून केवळ सबसिडीने नागरिकांना मिळत असलेल्या पाण्यामुळे नाही तर भरमसाट होणाऱ्या गळतीमुळे निर्माण झाली आहे. २००८-०९ साली जेएनएनयूआरएम योजनेच्या माध्यमातून ठाणे महापालिकेला स्काडा यंत्रणा राबवण्यासाठी ८ ते ९ कोटी रु पयांचे अनुदान प्राप्त झाले होते. शहरातील कचरा आणि पाण्याची अद्ययावत पद्धतीने नियोजन करण्याची अट यामध्ये टाकली होती. ही संपूर्ण यंत्रणा ठेकेदाराच्या माध्यमातून राबविण्यात येणार होती. यासाठी एका कंट्रोल रूमचीदेखील निर्मिती केली होती. विविध स्रोेतांपासून येणारे पाणी आणि कोणत्या टाकीमध्ये ते किती आहे, या सर्व गोष्टींचे मोजमाप तिच्या माध्यमातून करण्यात येणार होते. मात्र, ही यंत्रणा पालिकेला राबवता आली नसल्याची माहिती संस्थेचे मिलिंद गायकवाड यांनी दिली.