शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

...तर स्काडाने तारले असते

By admin | Updated: November 12, 2015 01:39 IST

भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे शहराला आजच्या घडीला पाणीकपातीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्याचे नियोजन हे पाणीकपातीमागचे एकमेव कारण असले तरी ती करताना गळती

ठाणे : भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे शहराला आजच्या घडीला पाणीकपातीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्याचे नियोजन हे पाणीकपातीमागचे एकमेव कारण असले तरी ती करताना गळती आणि चोरी या गोष्टीदेखील गांभीर्याने घेण्याची गरज ठाणेकरांनी व्यक्त केली आहे. शहरात आजघडीला गळतीचे प्रमाण हे ४५ टक्के असून २००८-०९ साली पाण्याचे मोजमाप करण्यासाठी आणलेली स्काडा ही प्रणाली तेव्हाच राबविली असती तर कपातीचे प्रमाणदेखील कमी असते. ही यंत्रणा पुन्हा राबवावी, अशी मागणी ‘जाग’ या संस्थेने केली आहे. ठाणे शहराला आजच्या घडीला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत असून पाणीगळतीचे प्रमाण हे ४५ टक्क्यांच्या आसपास आहे. पुरेसे पाणी असतानाही काही भागांना कपातीचा सामना करावा लागत असून योग्य नियोजन नसल्यानेही पाणी वितरण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. केवळ पाणीपुरवठ्यावर १८० कोटी रु पये वर्षाला खर्च केले जात आहेत. तर पाणीपट्टीतून सुमारे १०० कोटी तिजोरीत जमा होत आहे. ही तफावत ८० कोटींची असून केवळ सबसिडीने नागरिकांना मिळत असलेल्या पाण्यामुळे नाही तर भरमसाट होणाऱ्या गळतीमुळे निर्माण झाली आहे. २००८-०९ साली जेएनएनयूआरएम योजनेच्या माध्यमातून ठाणे महापालिकेला स्काडा यंत्रणा राबवण्यासाठी ८ ते ९ कोटी रु पयांचे अनुदान प्राप्त झाले होते. शहरातील कचरा आणि पाण्याची अद्ययावत पद्धतीने नियोजन करण्याची अट यामध्ये टाकली होती. ही संपूर्ण यंत्रणा ठेकेदाराच्या माध्यमातून राबविण्यात येणार होती. यासाठी एका कंट्रोल रूमचीदेखील निर्मिती केली होती. विविध स्रोेतांपासून येणारे पाणी आणि कोणत्या टाकीमध्ये ते किती आहे, या सर्व गोष्टींचे मोजमाप तिच्या माध्यमातून करण्यात येणार होते. मात्र, ही यंत्रणा पालिकेला राबवता आली नसल्याची माहिती संस्थेचे मिलिंद गायकवाड यांनी दिली.