शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

...तर कल्याण पूर्वेला वगळा, सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:00 IST

शहरातील पूर्व भागात सोयीसुविधांची वानवा आहे. याविषयी वारंवार आवाज उठवूनही त्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतलेली नाही. २७ गावे महापालिकेत आल्यापासून नागरी सुविधांवर ताण आला आहे.

कल्याण : शहरातील पूर्व भागात सोयीसुविधांची वानवा आहे. याविषयी वारंवार आवाज उठवूनही त्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतलेली नाही. २७ गावे महापालिकेत आल्यापासून नागरी सुविधांवर ताण आला आहे. ही गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याची मागणी होत आहे. त्याच धर्तीवर कल्याण पूर्वेच्या नागरिकांना सोयीसुविधाच मिळणार नसतील, तर या भागालाही महापालिकेतून वगळावे, अशी मागणी सत्ताधारी शिवसेना नगरसेवक निलेश शिंदे यांनी केली आहे.कल्याण पूर्वेत बेकायदा बांधकामे, कचरा आणि रस्ते विकासाचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रभागात पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीची कामे दरवर्षी केली जातात. महापालिका आर्थिककोंडीत सापडली असल्याने एकाही विकासकामांच्या फायलीला मंजुरी दिली जात नाही. केडीएमसीच्या गुरुवारच्या महासभेत महापालिकेच्या आर्थिक स्थितीविषयी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आली. महापालिकेवर ही वेळ का आली, असा प्रश्न शिंदे यांनी केला.प्रभागातील पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीची कामेच झालेली नाहीत. त्यामुळेच येथील पाणीपुरवठ्याची समस्या आहे. देखभालीअभावी हजारो लीटर पाणी वाया जात आहे. मात्र, प्रशासनाला त्याचे गांभीर्य नाही. प्रत्येक प्रभागात पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीची कामे करण्यावर किमान ३५ लाखांचा खर्च दरवर्षी होतो. यंदाच्या वर्षी आर्थिककोंडीमुळे खर्चाला कात्री लावली असावी, असे समजून किमान दोन लाख खर्चून देखभाल दुरुस्ती केली असली, तरीही कल्याण पूर्वेतील २५ प्रभागांत किमान अडीच कोटी रुपये इतकाच खर्च करावा लागला असता. हा खर्च करण्याची तयारीही प्रशासनाकडून दाखवली जात नाही, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.तत्कालीन महापौर कल्याण पाटील यांच्या काळात ‘यू’ टाइप कल्याण पूर्वेतील रस्ता विकसित करण्याचे काम कोणार्क कंपनीला दिले आहे. त्यावर किमान १२ कोटी खर्च होणार आहे. पाटील यांच्या महापौरपदाचा कालावधी संपला. त्यानंतर, दोन वर्षांपासून महापौरपदी राजेंद्र देवळेकर आहेत. साडेतीन वर्षे होऊनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. काटेमानिवली, गणपती मंदिर, तिसगावनाका हा ‘यू’ टाइप रस्ते व त्याशेजारी गटारे बांधण्यासाठी खोदला आहे. हे काम कधी होईल. रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात रिक्षाचालक बंद पुकारण्याच्या तयारीत आहेत.रस्त्यांची कामे रखडल्याने कंत्राटदाराविरोधात महापालिकेने काय कारवाई केली, त्याचा पत्ता नाही. खड्डे बुजवण्याचे कंत्राट जूनमध्ये काढण्यात काय मतलब आहे. पावसाळ्यात खड्डे बुजवू देणार नाही, असा पवित्रा आयुक्त पी. वेलारासू यांनी घेतला. खड्डे भरण्याचे कंत्राट हे मार्च किंवा एप्रिलमध्ये काढले पाहिजे. त्याच्या कामाला सुरुवात होऊन ते मे अखेरीस पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले पाहिजे. आपल्याकडे सगळ्याच बाबतीत उलटी गंगा वाहते. या सगळ्या प्रक्रियेत कल्याण पूर्वेतील साडेतीन लाखांची लोकसंख्या भरडली जात आहे. नागरी सुविधाच मिळणार नसतील, तर कल्याण पूर्व महापालिकेतून वेगळे करण्याची आग्रही मागणी नगरसेवक शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, यामुळे शिवसेनेला हा घरचाआहेर आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkalyanकल्याण