शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

...तर कल्याण पूर्वेला वगळा, सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:00 IST

शहरातील पूर्व भागात सोयीसुविधांची वानवा आहे. याविषयी वारंवार आवाज उठवूनही त्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतलेली नाही. २७ गावे महापालिकेत आल्यापासून नागरी सुविधांवर ताण आला आहे.

कल्याण : शहरातील पूर्व भागात सोयीसुविधांची वानवा आहे. याविषयी वारंवार आवाज उठवूनही त्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतलेली नाही. २७ गावे महापालिकेत आल्यापासून नागरी सुविधांवर ताण आला आहे. ही गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याची मागणी होत आहे. त्याच धर्तीवर कल्याण पूर्वेच्या नागरिकांना सोयीसुविधाच मिळणार नसतील, तर या भागालाही महापालिकेतून वगळावे, अशी मागणी सत्ताधारी शिवसेना नगरसेवक निलेश शिंदे यांनी केली आहे.कल्याण पूर्वेत बेकायदा बांधकामे, कचरा आणि रस्ते विकासाचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रभागात पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीची कामे दरवर्षी केली जातात. महापालिका आर्थिककोंडीत सापडली असल्याने एकाही विकासकामांच्या फायलीला मंजुरी दिली जात नाही. केडीएमसीच्या गुरुवारच्या महासभेत महापालिकेच्या आर्थिक स्थितीविषयी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आली. महापालिकेवर ही वेळ का आली, असा प्रश्न शिंदे यांनी केला.प्रभागातील पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीची कामेच झालेली नाहीत. त्यामुळेच येथील पाणीपुरवठ्याची समस्या आहे. देखभालीअभावी हजारो लीटर पाणी वाया जात आहे. मात्र, प्रशासनाला त्याचे गांभीर्य नाही. प्रत्येक प्रभागात पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीची कामे करण्यावर किमान ३५ लाखांचा खर्च दरवर्षी होतो. यंदाच्या वर्षी आर्थिककोंडीमुळे खर्चाला कात्री लावली असावी, असे समजून किमान दोन लाख खर्चून देखभाल दुरुस्ती केली असली, तरीही कल्याण पूर्वेतील २५ प्रभागांत किमान अडीच कोटी रुपये इतकाच खर्च करावा लागला असता. हा खर्च करण्याची तयारीही प्रशासनाकडून दाखवली जात नाही, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.तत्कालीन महापौर कल्याण पाटील यांच्या काळात ‘यू’ टाइप कल्याण पूर्वेतील रस्ता विकसित करण्याचे काम कोणार्क कंपनीला दिले आहे. त्यावर किमान १२ कोटी खर्च होणार आहे. पाटील यांच्या महापौरपदाचा कालावधी संपला. त्यानंतर, दोन वर्षांपासून महापौरपदी राजेंद्र देवळेकर आहेत. साडेतीन वर्षे होऊनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. काटेमानिवली, गणपती मंदिर, तिसगावनाका हा ‘यू’ टाइप रस्ते व त्याशेजारी गटारे बांधण्यासाठी खोदला आहे. हे काम कधी होईल. रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात रिक्षाचालक बंद पुकारण्याच्या तयारीत आहेत.रस्त्यांची कामे रखडल्याने कंत्राटदाराविरोधात महापालिकेने काय कारवाई केली, त्याचा पत्ता नाही. खड्डे बुजवण्याचे कंत्राट जूनमध्ये काढण्यात काय मतलब आहे. पावसाळ्यात खड्डे बुजवू देणार नाही, असा पवित्रा आयुक्त पी. वेलारासू यांनी घेतला. खड्डे भरण्याचे कंत्राट हे मार्च किंवा एप्रिलमध्ये काढले पाहिजे. त्याच्या कामाला सुरुवात होऊन ते मे अखेरीस पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले पाहिजे. आपल्याकडे सगळ्याच बाबतीत उलटी गंगा वाहते. या सगळ्या प्रक्रियेत कल्याण पूर्वेतील साडेतीन लाखांची लोकसंख्या भरडली जात आहे. नागरी सुविधाच मिळणार नसतील, तर कल्याण पूर्व महापालिकेतून वेगळे करण्याची आग्रही मागणी नगरसेवक शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, यामुळे शिवसेनेला हा घरचाआहेर आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkalyanकल्याण