शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

...तर अट्टहास बेतू शकतो जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

कल्याण : मुंबई, ठाण्यात दरड कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत दरडी कोसळून अनेकांचे जीव गेल्याची घटना ...

कल्याण : मुंबई, ठाण्यात दरड कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत दरडी कोसळून अनेकांचे जीव गेल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या एकामागोमाग घडणाऱ्या घटनांमुळे कल्याणमधील धोकादायक दरडींचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. येथील पत्रीपुलानजीकच्या नेतिवली व कचोरे, हनुमाननगर टेकडीवर माती खचून दरडी कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या जातात, परंतु ठोस कृतीअभावी त्या कागदोपत्रीच राहतात. दरम्यान, प्रशासनाची उदासीनता व रहिवाशांच्या घरे न सोडण्याच्या अट्टहासामुळे येथील धोका कायम आहे.

कधी काळी हिरव्यागार असलेल्या या टेकड्यांवरील अतिक्रमणांमुळे त्यांचे नैसर्गिक अस्तित्व संपुष्टात आले आहे. दरडी कोसळण्याच्या भीतीने दरवर्षी रहिवाशांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागते. या टेकड्यांवर आणि पायथ्याशी सुमारे ४५० ते ५०० कुटुंबे येथे राहत आहेत. नेतिवलीपेक्षा कचोरे टेकडीवर दरड कोसळण्याचा धोका सर्वाधिक आहे. या टेकडीवरील काही मोठे दगड खालच्या दिशेने सरकले आहेत, परंतु झाडांमुळे ते अडल्याने ते खालील घरांवर कोसळलेले नाहीत. येथील होणारे भूस्खलन पाहता ते दगड भविष्यात हानी पोहोचविण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात तरी टेकडीवरून सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून केल्या जातात. मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तेव्हाही टेकडीखाली येऊन राहण्यास सांगितले जाते. मात्र, या सूचनांकडे कानाडोळा केला जात आहे. गेली अनेक वर्षे येथे वास्तव्य असल्याने घर न सोडण्याच्या रहिवाशांच्या मानसिकतेमुळे धोका कायम आहे.

केडीएमसीने धोकादायक असलेल्या भागात लोखंडी बॅरिकेड्स लावल्या आहेत. परंतु, तो भाग मुरूमाचा असल्याने हा उपाय कितपत टिकेल हा संशोधनाचा विषय आहे. येथील स्थानिक माजी नगरसेविका रेखा चौधरी यांनी संरक्षक भिंत बांधण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला आहे, परंतु हे कामही अर्धवट आहे. प्रशासनाची उदासीनता कायम आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

----------

दरड कोसळण्याच्या घटना

- २००९ मध्ये दरड कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला होता. २४ जून २०१० ला दोन घरांवर दरड कोसळून तीन जण गंभीर जखमी झाले होते. तर २०११ च्या पावसाळ्यात तिघांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले होते.

- मार्च २०११ च्या घटनेत येथील जयभवानीनगरमध्ये दरड कोसळून सात जण जखमी झाले होते. २०१४ मध्ये महात्मा फुलेनगरमध्ये, तर १९ सप्टेंबर २०१६ ला कचोरे हनुमाननगरमध्ये दरड कोसळली होती. मात्र, सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

-----------

कचोरे टेकडीच्या परिसरातील १५० कुटुंबांना नोटिसा बजावल्या आहेत. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व एनडीआरएफच्या टीमने तेथे भेट देऊन तेथील रहिवाशांना आवाहन केले आहे. परंतु, रहिवासी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

- वसंत भोंगाडे ‘जे’ प्रभाग क्षेत्र अधिकारी, केडीएमसी

----------------------