शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

...तर अट्टहास बेतू शकतो जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

कल्याण : मुंबई, ठाण्यात दरड कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत दरडी कोसळून अनेकांचे जीव गेल्याची घटना ...

कल्याण : मुंबई, ठाण्यात दरड कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत दरडी कोसळून अनेकांचे जीव गेल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या एकामागोमाग घडणाऱ्या घटनांमुळे कल्याणमधील धोकादायक दरडींचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. येथील पत्रीपुलानजीकच्या नेतिवली व कचोरे, हनुमाननगर टेकडीवर माती खचून दरडी कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या जातात, परंतु ठोस कृतीअभावी त्या कागदोपत्रीच राहतात. दरम्यान, प्रशासनाची उदासीनता व रहिवाशांच्या घरे न सोडण्याच्या अट्टहासामुळे येथील धोका कायम आहे.

कधी काळी हिरव्यागार असलेल्या या टेकड्यांवरील अतिक्रमणांमुळे त्यांचे नैसर्गिक अस्तित्व संपुष्टात आले आहे. दरडी कोसळण्याच्या भीतीने दरवर्षी रहिवाशांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागते. या टेकड्यांवर आणि पायथ्याशी सुमारे ४५० ते ५०० कुटुंबे येथे राहत आहेत. नेतिवलीपेक्षा कचोरे टेकडीवर दरड कोसळण्याचा धोका सर्वाधिक आहे. या टेकडीवरील काही मोठे दगड खालच्या दिशेने सरकले आहेत, परंतु झाडांमुळे ते अडल्याने ते खालील घरांवर कोसळलेले नाहीत. येथील होणारे भूस्खलन पाहता ते दगड भविष्यात हानी पोहोचविण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात तरी टेकडीवरून सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून केल्या जातात. मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तेव्हाही टेकडीखाली येऊन राहण्यास सांगितले जाते. मात्र, या सूचनांकडे कानाडोळा केला जात आहे. गेली अनेक वर्षे येथे वास्तव्य असल्याने घर न सोडण्याच्या रहिवाशांच्या मानसिकतेमुळे धोका कायम आहे.

केडीएमसीने धोकादायक असलेल्या भागात लोखंडी बॅरिकेड्स लावल्या आहेत. परंतु, तो भाग मुरूमाचा असल्याने हा उपाय कितपत टिकेल हा संशोधनाचा विषय आहे. येथील स्थानिक माजी नगरसेविका रेखा चौधरी यांनी संरक्षक भिंत बांधण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला आहे, परंतु हे कामही अर्धवट आहे. प्रशासनाची उदासीनता कायम आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

----------

दरड कोसळण्याच्या घटना

- २००९ मध्ये दरड कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला होता. २४ जून २०१० ला दोन घरांवर दरड कोसळून तीन जण गंभीर जखमी झाले होते. तर २०११ च्या पावसाळ्यात तिघांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले होते.

- मार्च २०११ च्या घटनेत येथील जयभवानीनगरमध्ये दरड कोसळून सात जण जखमी झाले होते. २०१४ मध्ये महात्मा फुलेनगरमध्ये, तर १९ सप्टेंबर २०१६ ला कचोरे हनुमाननगरमध्ये दरड कोसळली होती. मात्र, सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

-----------

कचोरे टेकडीच्या परिसरातील १५० कुटुंबांना नोटिसा बजावल्या आहेत. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व एनडीआरएफच्या टीमने तेथे भेट देऊन तेथील रहिवाशांना आवाहन केले आहे. परंतु, रहिवासी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

- वसंत भोंगाडे ‘जे’ प्रभाग क्षेत्र अधिकारी, केडीएमसी

----------------------