शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

...तर अट्टहास बेतू शकतो जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

कल्याण : मुंबई, ठाण्यात दरड कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत दरडी कोसळून अनेकांचे जीव गेल्याची घटना ...

कल्याण : मुंबई, ठाण्यात दरड कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत दरडी कोसळून अनेकांचे जीव गेल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या एकामागोमाग घडणाऱ्या घटनांमुळे कल्याणमधील धोकादायक दरडींचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. येथील पत्रीपुलानजीकच्या नेतिवली व कचोरे, हनुमाननगर टेकडीवर माती खचून दरडी कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या जातात, परंतु ठोस कृतीअभावी त्या कागदोपत्रीच राहतात. दरम्यान, प्रशासनाची उदासीनता व रहिवाशांच्या घरे न सोडण्याच्या अट्टहासामुळे येथील धोका कायम आहे.

कधी काळी हिरव्यागार असलेल्या या टेकड्यांवरील अतिक्रमणांमुळे त्यांचे नैसर्गिक अस्तित्व संपुष्टात आले आहे. दरडी कोसळण्याच्या भीतीने दरवर्षी रहिवाशांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागते. या टेकड्यांवर आणि पायथ्याशी सुमारे ४५० ते ५०० कुटुंबे येथे राहत आहेत. नेतिवलीपेक्षा कचोरे टेकडीवर दरड कोसळण्याचा धोका सर्वाधिक आहे. या टेकडीवरील काही मोठे दगड खालच्या दिशेने सरकले आहेत, परंतु झाडांमुळे ते अडल्याने ते खालील घरांवर कोसळलेले नाहीत. येथील होणारे भूस्खलन पाहता ते दगड भविष्यात हानी पोहोचविण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात तरी टेकडीवरून सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून केल्या जातात. मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तेव्हाही टेकडीखाली येऊन राहण्यास सांगितले जाते. मात्र, या सूचनांकडे कानाडोळा केला जात आहे. गेली अनेक वर्षे येथे वास्तव्य असल्याने घर न सोडण्याच्या रहिवाशांच्या मानसिकतेमुळे धोका कायम आहे.

केडीएमसीने धोकादायक असलेल्या भागात लोखंडी बॅरिकेड्स लावल्या आहेत. परंतु, तो भाग मुरूमाचा असल्याने हा उपाय कितपत टिकेल हा संशोधनाचा विषय आहे. येथील स्थानिक माजी नगरसेविका रेखा चौधरी यांनी संरक्षक भिंत बांधण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला आहे, परंतु हे कामही अर्धवट आहे. प्रशासनाची उदासीनता कायम आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

----------

दरड कोसळण्याच्या घटना

- २००९ मध्ये दरड कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला होता. २४ जून २०१० ला दोन घरांवर दरड कोसळून तीन जण गंभीर जखमी झाले होते. तर २०११ च्या पावसाळ्यात तिघांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले होते.

- मार्च २०११ च्या घटनेत येथील जयभवानीनगरमध्ये दरड कोसळून सात जण जखमी झाले होते. २०१४ मध्ये महात्मा फुलेनगरमध्ये, तर १९ सप्टेंबर २०१६ ला कचोरे हनुमाननगरमध्ये दरड कोसळली होती. मात्र, सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

-----------

कचोरे टेकडीच्या परिसरातील १५० कुटुंबांना नोटिसा बजावल्या आहेत. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व एनडीआरएफच्या टीमने तेथे भेट देऊन तेथील रहिवाशांना आवाहन केले आहे. परंतु, रहिवासी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

- वसंत भोंगाडे ‘जे’ प्रभाग क्षेत्र अधिकारी, केडीएमसी

----------------------