शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

...तर गैरवर्तणुकीचे प्रकार सुरूच राहतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:24 IST

कल्याण : वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यात रिक्षांचे प्रमाण लक्षणीय असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन कोंडीत ...

कल्याण : वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यात रिक्षांचे प्रमाण लक्षणीय असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन कोंडीत भर पडत आहे. रिक्षा परवाना घ्यायचा आणि दुसरा व्यवसाय करायचा, असेही महाभाग असल्याने अशांच्या रिक्षा चालविण्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यांच्याकडून मनमानी भाडे आकारणी, उद्धट व उर्मट वागणूक प्रवाशांना दिली जात आहे. कल्याणमध्ये शनिवारी रात्री घडलेल्या छेडछाडीच्या प्रकरणावरून आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी बोध घेत बेकायदा रिक्षा चालविणाऱ्या १५ ते १६ वर्षांच्या मुलांकडेही वेळीच लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा रिक्षाचालकांकडून टवाळखोरीचे, गैरवर्तवणुकीचे घडणारे प्रकार यापुढेही सुरूच राहतील, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

परवाना आणि बॅच असलेल्या व्यक्तीलाच रिक्षा चालवता येते. परंतु, काही रिक्षाचालक ज्याच्याकडे बॅच आणि परवाना नाही, अशांना रिक्षा चालवायला देत आहेत. यात १५ ते १६ वर्षांची अल्पवयीन मुले सर्रासपणे रिक्षा चालविताना दिसत आहेत. अशांकडे गणवेश नसतोच. त्याचबरोबर बर्मुडा, हाफ पॅन्ट अशा पेहरावात ते रिक्षा चालवतात. तसेच स्टॅण्ड सोडून इतर ठिकाणांहून ते भाडे घेतात. गुटखा, माव्याने तोंडाचा तोबरा भरलेला असतो. काही वेळा मद्यपान, चरस आणि गांजाचे व्यसनही त्यांनी केलेले असते. उद्धट, उर्मट वागणूक, त्याचबरोबर मनमानी भाडे आकारणी ते करत असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहावयास मिळत आहे. त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे सर्वसामान्य प्रामाणिक रिक्षाचालक भरडला जात असून, यात रिक्षा व्यवसायही एकप्रकारे बदनाम होत चालला आहे.

प्रवास बनलाय धोकादायक

अल्पवयीन मुलांच्या हातात रिक्षाचे स्टेअरिंग गेल्याने रिक्षाचा प्रवासही धोकादायक बनला आहे. अशा टवाळखोर रिक्षाचालकांकडून प्रवाशाचे अपहरण करणे, त्यांना लुबाडणे, पोलिसांशी हुज्जत घालणे, फरफटत नेणे आदी प्रकारही याआधीही घडले आहेत. अशा प्रवृत्तीला आळा घालण्याऐवजी त्याकडे आरटीओ आणि वाहतूक शाखेकडून पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

----------