शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

...तर गैरवर्तणुकीचे प्रकार सुरूच राहतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:24 IST

कल्याण : वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यात रिक्षांचे प्रमाण लक्षणीय असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन कोंडीत ...

कल्याण : वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यात रिक्षांचे प्रमाण लक्षणीय असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन कोंडीत भर पडत आहे. रिक्षा परवाना घ्यायचा आणि दुसरा व्यवसाय करायचा, असेही महाभाग असल्याने अशांच्या रिक्षा चालविण्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यांच्याकडून मनमानी भाडे आकारणी, उद्धट व उर्मट वागणूक प्रवाशांना दिली जात आहे. कल्याणमध्ये शनिवारी रात्री घडलेल्या छेडछाडीच्या प्रकरणावरून आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी बोध घेत बेकायदा रिक्षा चालविणाऱ्या १५ ते १६ वर्षांच्या मुलांकडेही वेळीच लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा रिक्षाचालकांकडून टवाळखोरीचे, गैरवर्तवणुकीचे घडणारे प्रकार यापुढेही सुरूच राहतील, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

परवाना आणि बॅच असलेल्या व्यक्तीलाच रिक्षा चालवता येते. परंतु, काही रिक्षाचालक ज्याच्याकडे बॅच आणि परवाना नाही, अशांना रिक्षा चालवायला देत आहेत. यात १५ ते १६ वर्षांची अल्पवयीन मुले सर्रासपणे रिक्षा चालविताना दिसत आहेत. अशांकडे गणवेश नसतोच. त्याचबरोबर बर्मुडा, हाफ पॅन्ट अशा पेहरावात ते रिक्षा चालवतात. तसेच स्टॅण्ड सोडून इतर ठिकाणांहून ते भाडे घेतात. गुटखा, माव्याने तोंडाचा तोबरा भरलेला असतो. काही वेळा मद्यपान, चरस आणि गांजाचे व्यसनही त्यांनी केलेले असते. उद्धट, उर्मट वागणूक, त्याचबरोबर मनमानी भाडे आकारणी ते करत असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहावयास मिळत आहे. त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे सर्वसामान्य प्रामाणिक रिक्षाचालक भरडला जात असून, यात रिक्षा व्यवसायही एकप्रकारे बदनाम होत चालला आहे.

प्रवास बनलाय धोकादायक

अल्पवयीन मुलांच्या हातात रिक्षाचे स्टेअरिंग गेल्याने रिक्षाचा प्रवासही धोकादायक बनला आहे. अशा टवाळखोर रिक्षाचालकांकडून प्रवाशाचे अपहरण करणे, त्यांना लुबाडणे, पोलिसांशी हुज्जत घालणे, फरफटत नेणे आदी प्रकारही याआधीही घडले आहेत. अशा प्रवृत्तीला आळा घालण्याऐवजी त्याकडे आरटीओ आणि वाहतूक शाखेकडून पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

----------