शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

त्यांची धूळवड पाण्याविना, तुमची?

By admin | Updated: March 22, 2016 02:20 IST

ठाणे जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची भीषण झळ पोहोचली आहे. सुरुवातील ३० टक्के असलेली पाणीटंचाई नंतर ४५ टक्के होताहोता आता ६० टक्क्यांंपर्यंत गेली आहे

ठाणे जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची भीषण झळ पोहोचली आहे. सुरुवातील ३० टक्के असलेली पाणीटंचाई नंतर ४५ टक्के होताहोता आता ६० टक्क्यांंपर्यंत गेली आहे. मे महिन्याच्या मध्यावर अनेक धरणांतील पाणीसाठा पुरेल की नाही, अशी भीती होती. मात्र, शहरांच्या-उद्योगांच्या पाण्यात कपात करत पाणी कसेबसे पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपणाऱ्या ‘लोकमत’ने पाण्याची नासाडी न करता धूळवड साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत काही सोसायट्यांनी पहिले पाऊल उचलले आहे. आपल्यासह अनेक सुजाण वाचकांनी त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन आम्ही करत आहोत...> केवळ एक टिळा चंदनाचाप्रज्ञा म्हात्रे ल्ल ठाणेमाजिवडा येथील लोढा लक्झरियस कॉम्प्लेक्सने यंदा भीषण पाणीटंचाई असल्याने धूळवड न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे आबालवृद्धांचे यावर एकमत आहे. एकमेकांच्या कपाळाला चंदनाचा टिळा लावून आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून धूळवड साजरी करणार आहेत. गेल्या महिनाभरात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. संपूर्ण जिल्ह्याला हा प्रश्न भेडसावू लागला आहे. होळीच्या दिवशी पाण्याचा बेसुमार वापर केला जातो. यंदाची भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन पर्यावरण संस्थादेखील होळी न खेळण्याचे आवाहन करीत आहे. शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये यंदा होळी खेळावी किंवा कसे, यावर खल सुरू झाला आहे. त्याच वेळी ‘लोढा लक्झरियस’ने गेल्या एक आठवड्यात रंग न खेळण्याचा निर्णय घेऊन रहिवाशांमध्ये जनजागृती केली. कॉम्प्लेक्समधील कारंजे, स्विमिंगपूलदेखील बंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या कॉम्प्लेक्समधील लहान मुलांनीही समस्येचे गांभीर्य ओळखून स्वत:हूनच होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कोरडी होळी जरी खेळली तरी ते रंग धुण्यासाठी पाणी लागतेच, त्यापेक्षा चंदनाचा टिळा लावूनच होळी साजरी करणे, हाच योग्य मार्ग असण्यावर कॉम्प्लेक्सच्या बैठकीत एकमत झाले. याचा अर्थ होळी व धूळवडीचा आनंद आम्ही साजरा करणार नाही, असे नाही. त्याला पर्याय म्हणून गुरुवारी सर्व रहिवासी एकत्र येऊन खेळ, नृत्य, अ‍ॅरोबिक्स, जिम्नॅस्टिक्स, अ‍ॅथलेटिक्स व वेगवेगळ्या प्रांतांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम साजरे करणार आहोत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.विशेष म्हणजे जलसंवर्धनाचा संदेश देणारे ३५ मुलांचा सहभाग असलेले ११ मिनिटांचे पथनाट्य बसवण्यात आले आहे. तसेच, कॉम्प्लेक्समधील दोन सोसायट्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले असून त्याद्वारे धूळवड साजरी न करण्याचा मेसेज फिरवला जात आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे कार्यक्रम होणार असून त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे. अर्थात, सर्व संकटांचा नाश व्हावा, याकरिता बुधवारी होळीचे आयोजन केले जाणार आहे, असे रहिवासी व पर्यावरणवादी उल्हास कार्ले यांनी सांगितले. > लोढा लक्झरियस कॉम्प्लेक्समध्ये ८४० फ्लॅट्स असून सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांनीही होळी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. होळी न खेळण्याची कारणे लहान मुलांना सहजपणे पटवून देता आली आणि त्यांनी स्वत:हूनच यासाठी पुढाकार घेतला. होळी साजरी करणार, पण ती सांस्कृतिक कार्यक्रमांनी. तसेच, प्रत्येक रहिवासी या वेळी शिस्त पाळणार आहे.- उल्हास कार्ले, रहिवासी व पर्यावरणवादी, लोढा लक्झरियस> या वेळी रंग आणि पाण्याचा वापर होळीच्या दिवशी करायचा नाही, असा निर्णय एकमताने घेतला आहे. लहान मुलांबरोबर महिलांनीही याला पाठिंबा दर्शवला आहे. यंदा कोरडी होळी खेळायलादेखील आमचा विरोध आहे. कारण, त्यासाठीदेखील पाणी लागते. - आभा टालेकर, सांस्कृतिक कमिटी सदस्य, लोढा लक्झरियस