शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

भराव टाकून वरसावे तलावाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:08 IST

जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसात तक्रार; ग्रामस्थांत संताप; श्रमजीवीचीही कारवाईची मागणी

ठाणे : घोडबंदर रोडला लागून असलेल्या वरसावे गावातील सार्वजनिक तलावात अवैधरीत्या विकासकाकडून मातीचा भराव करून तो नष्ट करण्यात येत आहे. भूखंड हडप करण्याच्या उद्देशाने तो नष्ट केला जात असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी सार्वजनिक तलाव चोरीस गेल्याची लेखी तक्रारदेखील काशिमीरा पोलिसांत दाखल केली. याबाबत श्रमजीवी संघटनेनेही जिल्हाधिकाºयांना साकडे घालून या तलावाकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रित करून कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.वरसावे गावकºयांसाठी हा सार्वजनिक तलाव वर्षानुवर्षांपासून उपयुक्त ठरत आहे. गावकºयांचा हक्क असलेल्या या तलावाची जागा हडपण्यासाठी त्यात अवैधरीत्या मातीचा भराव घालून तो बुजवण्यात येत आहे. वरसावेकºयांचा हक्क असलेल्या या तलावाची नोंद सातबारा उताºयावरदेखील आहे. या सार्वजनिक तलावाचा हक्क वरसावे गावकºयांकडे असतानाही त्यात मातीचा भराव टाकून बुजवण्यात आला आहे, असे ज्येष्ठ नागरिक रवींद्र गायकर या गावकºयाने काशिमीरा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर श्रमजीवी संघटनेनेदेखील जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करून वरसावे गावकºयांचा सार्वजनिक तलाव नष्ट केल्याचे नमूद केले आहे. यासाठी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष अशोक सापटे, सरचिटणीस बाळाराम भोईर, उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर यांनी जिल्हाधिकाºयांना लेखी तक्रार देऊन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.कठोर कारवाई कराहा जुना सार्वजनिक तलाव नष्ट करणाºया विकासकाचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करावी. याशिवाय, अवैधरीत्या टाकलेला भराव पूर्णपणे काढून हा सार्वजनिक तलाव मोकळा करता यावा, त्याची लांबी-रुंदी-खोली वाढवण्यात यावी आदी मागण्यांसाठी श्रमजीवीने जिल्हाधिकाºयांना साकडे घालून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.तर, चोरीला गेलेल्या या तलावाचा शोध घेण्यासाठी पोलिसात लेखी तक्रार केली आहे. यानुसार, नैसर्गिक तलाव कायद्यानुसार बुजवणे गंभीर गुन्हा असतानाही जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा या तलावास नष्ट करणाºया विकासकावर काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून असल्याचे श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी लोकमतला सांगितले.तलावावर गावकºयांचा उदरनिर्वाह : वरसावे गावामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पारंपरिक पद्धतीने येथील आदिवासी समाज या तलावात परंपरेनुसार मासेमारी करून उदरनिर्वाह करतो. पिण्याच्या पाण्यासाठी त्यातील पाण्याचा वापर केला जातो. त्यावर शेतीचे उत्पादनदेखील घेतले जात आहे. त्याचा भूखंड हडप करण्यासाठी काही राजकारणी व बड्या नेत्यांच्या कृपाशीर्वादाखाली विकासकाकडून त्यात अवैध मातीचा भराव टाकल्याचा आरोप गावकºयांकडून केला जात आहे.