शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

भराव टाकून वरसावे तलावाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:08 IST

जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसात तक्रार; ग्रामस्थांत संताप; श्रमजीवीचीही कारवाईची मागणी

ठाणे : घोडबंदर रोडला लागून असलेल्या वरसावे गावातील सार्वजनिक तलावात अवैधरीत्या विकासकाकडून मातीचा भराव करून तो नष्ट करण्यात येत आहे. भूखंड हडप करण्याच्या उद्देशाने तो नष्ट केला जात असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी सार्वजनिक तलाव चोरीस गेल्याची लेखी तक्रारदेखील काशिमीरा पोलिसांत दाखल केली. याबाबत श्रमजीवी संघटनेनेही जिल्हाधिकाºयांना साकडे घालून या तलावाकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रित करून कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.वरसावे गावकºयांसाठी हा सार्वजनिक तलाव वर्षानुवर्षांपासून उपयुक्त ठरत आहे. गावकºयांचा हक्क असलेल्या या तलावाची जागा हडपण्यासाठी त्यात अवैधरीत्या मातीचा भराव घालून तो बुजवण्यात येत आहे. वरसावेकºयांचा हक्क असलेल्या या तलावाची नोंद सातबारा उताºयावरदेखील आहे. या सार्वजनिक तलावाचा हक्क वरसावे गावकºयांकडे असतानाही त्यात मातीचा भराव टाकून बुजवण्यात आला आहे, असे ज्येष्ठ नागरिक रवींद्र गायकर या गावकºयाने काशिमीरा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर श्रमजीवी संघटनेनेदेखील जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करून वरसावे गावकºयांचा सार्वजनिक तलाव नष्ट केल्याचे नमूद केले आहे. यासाठी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष अशोक सापटे, सरचिटणीस बाळाराम भोईर, उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर यांनी जिल्हाधिकाºयांना लेखी तक्रार देऊन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.कठोर कारवाई कराहा जुना सार्वजनिक तलाव नष्ट करणाºया विकासकाचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करावी. याशिवाय, अवैधरीत्या टाकलेला भराव पूर्णपणे काढून हा सार्वजनिक तलाव मोकळा करता यावा, त्याची लांबी-रुंदी-खोली वाढवण्यात यावी आदी मागण्यांसाठी श्रमजीवीने जिल्हाधिकाºयांना साकडे घालून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.तर, चोरीला गेलेल्या या तलावाचा शोध घेण्यासाठी पोलिसात लेखी तक्रार केली आहे. यानुसार, नैसर्गिक तलाव कायद्यानुसार बुजवणे गंभीर गुन्हा असतानाही जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा या तलावास नष्ट करणाºया विकासकावर काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून असल्याचे श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी लोकमतला सांगितले.तलावावर गावकºयांचा उदरनिर्वाह : वरसावे गावामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पारंपरिक पद्धतीने येथील आदिवासी समाज या तलावात परंपरेनुसार मासेमारी करून उदरनिर्वाह करतो. पिण्याच्या पाण्यासाठी त्यातील पाण्याचा वापर केला जातो. त्यावर शेतीचे उत्पादनदेखील घेतले जात आहे. त्याचा भूखंड हडप करण्यासाठी काही राजकारणी व बड्या नेत्यांच्या कृपाशीर्वादाखाली विकासकाकडून त्यात अवैध मातीचा भराव टाकल्याचा आरोप गावकºयांकडून केला जात आहे.