शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

भराव टाकून वरसावे तलावाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:08 IST

जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसात तक्रार; ग्रामस्थांत संताप; श्रमजीवीचीही कारवाईची मागणी

ठाणे : घोडबंदर रोडला लागून असलेल्या वरसावे गावातील सार्वजनिक तलावात अवैधरीत्या विकासकाकडून मातीचा भराव करून तो नष्ट करण्यात येत आहे. भूखंड हडप करण्याच्या उद्देशाने तो नष्ट केला जात असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी सार्वजनिक तलाव चोरीस गेल्याची लेखी तक्रारदेखील काशिमीरा पोलिसांत दाखल केली. याबाबत श्रमजीवी संघटनेनेही जिल्हाधिकाºयांना साकडे घालून या तलावाकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रित करून कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.वरसावे गावकºयांसाठी हा सार्वजनिक तलाव वर्षानुवर्षांपासून उपयुक्त ठरत आहे. गावकºयांचा हक्क असलेल्या या तलावाची जागा हडपण्यासाठी त्यात अवैधरीत्या मातीचा भराव घालून तो बुजवण्यात येत आहे. वरसावेकºयांचा हक्क असलेल्या या तलावाची नोंद सातबारा उताºयावरदेखील आहे. या सार्वजनिक तलावाचा हक्क वरसावे गावकºयांकडे असतानाही त्यात मातीचा भराव टाकून बुजवण्यात आला आहे, असे ज्येष्ठ नागरिक रवींद्र गायकर या गावकºयाने काशिमीरा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर श्रमजीवी संघटनेनेदेखील जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करून वरसावे गावकºयांचा सार्वजनिक तलाव नष्ट केल्याचे नमूद केले आहे. यासाठी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष अशोक सापटे, सरचिटणीस बाळाराम भोईर, उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर यांनी जिल्हाधिकाºयांना लेखी तक्रार देऊन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.कठोर कारवाई कराहा जुना सार्वजनिक तलाव नष्ट करणाºया विकासकाचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करावी. याशिवाय, अवैधरीत्या टाकलेला भराव पूर्णपणे काढून हा सार्वजनिक तलाव मोकळा करता यावा, त्याची लांबी-रुंदी-खोली वाढवण्यात यावी आदी मागण्यांसाठी श्रमजीवीने जिल्हाधिकाºयांना साकडे घालून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.तर, चोरीला गेलेल्या या तलावाचा शोध घेण्यासाठी पोलिसात लेखी तक्रार केली आहे. यानुसार, नैसर्गिक तलाव कायद्यानुसार बुजवणे गंभीर गुन्हा असतानाही जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा या तलावास नष्ट करणाºया विकासकावर काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून असल्याचे श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी लोकमतला सांगितले.तलावावर गावकºयांचा उदरनिर्वाह : वरसावे गावामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पारंपरिक पद्धतीने येथील आदिवासी समाज या तलावात परंपरेनुसार मासेमारी करून उदरनिर्वाह करतो. पिण्याच्या पाण्यासाठी त्यातील पाण्याचा वापर केला जातो. त्यावर शेतीचे उत्पादनदेखील घेतले जात आहे. त्याचा भूखंड हडप करण्यासाठी काही राजकारणी व बड्या नेत्यांच्या कृपाशीर्वादाखाली विकासकाकडून त्यात अवैध मातीचा भराव टाकल्याचा आरोप गावकºयांकडून केला जात आहे.