शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

"वंचितांचा रंगमंच हे समाजाचे व कलाविश्वाचे वैभव " - ज्येष्ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 16:37 IST

ठाण्यात वंचितांचे रंगमंचचे सहावे पर्व पार पडले. 

ठळक मुद्दे"वंचितांचा रंगमंच हे समाजाचे व कलाविश्वाचे वैभव " - जयंत सावरकरवंचितांचे रंगमंचचे सहावे पर्व समता विचार प्रसारक संस्था, व बालनाट्य पुरस्कृत वंचितांचा रंगमंच

ठाणे : वंचित समुहांना आपल्या भावना, समस्या व समज, आपल्या भाषेत व शैलीत व्यक्त करण्याची संधी देणारा वंचितांचा रंगमंच हे आपल्या समाजाचे व कला विश्वाचे वैभव आहे. असे मत ज्येष्ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर यांनी व्यक्त केले.  समता विचार प्रसारक संस्था, व बालनाट्य पुरस्कृत वंचितांचा रंगमंचच्या माध्यमातून आयोजित " युवा नाट्यजल्लोष "च्या सहाव्या पर्वात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.

       त्या अभिव्यक्तीचा लाभ सर्वसामान्य जनतेस मुक्त हस्ते व मोफत उपलब्ध करून देणारी समता विचार प्रसारक व बालनाट्य संस्था फार मोलाचे कार्य करीत असून, त्यात सर्वांनी सामील व्हायला हवे.असे नमुद करत ते पुढे म्हणाले, माझेही यंदा इथे येणे हे पहिले असले तरी शेवटचे असणार नाही.यावेळी युवा नाट्य जल्लोष मध्ये पाच नाटिका सादर करण्यात आल्या : मैट्रो आणि वृक्षकत्तल या विषयावर आधारित 'गोष्ट जीवाची ' (किशननगर गट), 'दृष्टीकोन' (सावरकर नगर गट), 'एचआयव्ही- एड्स' (ठाणे शहर गट), महिला सक्षमता आणि निर्भयता या विषयांवर 'निर्भय मी- सक्षम मी' (मानपाडा गट), 'हम सब' (माजिवडा गट). या नाटिकांबद्दल बोलतांना ज्येष्ठ कवि अरूण म्हात्रे म्हणाले, वंचितांचा रंगमंच हा साधा सहज आणि सर्वाना सामावून घेणारा मंच आहे. "अनेक वर्षे निरपेक्ष पणे संतांच्या लोकवस्तीत शैक्षणिक- सांस्कृतिक कार्य करणारा वंचितांचा रंगमंच हे ठाण्याचे भुषण आहे. ठाणे महापालिका या चळवळीला भरघोस सहकार्य करेल. असे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के या प्रसंगी बोलतांना म्हणाले. शहरभर दिवसभर अनेक कार्यक्रमांची रेलचेल असतांनाही मा. महापौर या वेळी आवर्जून उपस्थित राहिले होते. लघुपट निर्माते प्रा. संतोष पाठारे म्हणाले, " वंचिताचा रंगमंच हा केवळ ठाण्यातील वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या कलागुणांना वाव देणार व्यासपीठ न राहता समाजापर्यंत आपले विचार पोहचवणारी चळवळ झाला आहे.रत्नाकर मतकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या वंचितांच्या रंगमंचावर गेली सहा वर्षे मुलांच्या नाटिका बघण्याच्या निमित्ताने समविचारी माणसं एकत्र येतात, विचार मंथन होते हे खूप महत्त्वाचे आहे. या वेळी वैदेही भिडे (मनो विकास संस्था - IPH) माधुरी वारियत (जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय) यानी ही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या संयोजिका हर्षदा बोरकर यांनी सूत्र संचालन केले. दिपक वाडेकरने पाहुण्यांची ओळख करून दिली. सह संयोजक अनुजा लोहारने आभार प्रदर्शन केले. या वेळी कार्यक्रमात डॉ. निर्मोही फडके, नीलिमा सबनीस, शैलेश भिडे, हर्षल सुतार, शिवाजी पवार, जगदीश खैरालिया, उमाकांत पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणे आर्ट गिल्ड चे योगेश खांडेकर आणि सुनिता फडके व समता विचार प्रसारक संस्थेचे लतिका सु. मो., हर्षलता कदम, मनिषा जोशी, सुनील दिवेकर, कल्पना भांडारकर, विश्वनाथ चांदोरकर, प्रवीण खैरालिया, हेमाली शिंदे, निखिल दंत, आतेश शिंदे, इनाॅक कोलियार, ओंकार जंगम, दर्शन पडवळ, गौतमी सिन्गारे, स्नेहा राठोड, पल्लवी कदम आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.  

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक