शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

रस्ता खचल्याने 25 दुकानांच्या भिंतींना गेले तडे!

By अजित मांडके | Updated: September 22, 2022 15:29 IST

या घटनेत तब्बल २५ दुकानांच्या भिंतीना तडे गेले आहेत.

ठाणे :  पारसिक डोंगरालगत असलेला रस्ता खचल्याची घटना कळवा वाघोबानगर येथे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेत तब्बल २५ दुकानांच्या भिंतीना तडे गेले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय त्या दुकानांना धोकापट्टी लावण्यात आली असून या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

कळवा, वाघोबा नगर, कळवा हिंदी हायस्कूल जवळ, रेल्वे फास्ट ट्रॅक जवळ, पारसिक बोगद्या बाजुला, रेल्वेच्या संरक्षण भिंतीचे नव्याने बांधकाम करण्यासाठी पारसिक डोंगरालगत खोदकाम करण्यात आले होते. त्या डोंगरालगत असलेला रस्ता खचल्याने जवळच असलेल्या २५ दुकानांच्या भिंतीना तडे गेल्याची माहिती माजी नगरसेवक महेश साळवी यांनी दिली. 

या माहितीच्या आधारे, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यालयीन अधीक्षक, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, रेल्वे प्रशासनाचे संबंधित वरिष्ठ अभियंता व ठेकेदारांना धाव घेत पाहणी केली असता तब्बल २५ दुकानांचे गाळे धोकादायक झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धोकापट्टी लावण्यात आलेली आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच रेल्वे प्रशासनामार्फत पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

टॅग्स :thaneठाणे