शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

वसई-भाईंदर रो-रो फेरीबोट सेवेची औपचारीक शासकीय लोकापर्ण नाही, प्रायोगिक तत्वावरच सध्या राहणार सुरु

By अजित मांडके | Updated: February 21, 2024 18:27 IST

या फेरीबोट सेवेचा कोणताही औपचारीक शासकीय लोकार्पण सोहळा झालेला नसल्याची माहिती महाराष्ट्र सारगरी मंडळाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

ठाणे : भाईंदर पश्चिम ते वसई किल्ला अशा खाडी मार्गे रो-रो सेवेचा मंगळवारी मोठ्या धडाक्यात शुभारंभ झाला. यावेळी बाविआ सह भाजप आणि उध्दव ठाकरे गटाने यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शनही केले होते. परंतु त्यांचा हा आनंद आता काहीसा क्षणीकच ठरणार असल्याचे दिसत आहे. या फेरीबोट सेवेचा कोणताही औपचारीक शासकीय लोकार्पण सोहळा झालेला नसल्याची माहिती महाराष्ट्र सारगरी मंडळाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. तर ही सेवा सध्या प्रायोगिक तत्वावरच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या रो-रो सेवेमुळे भार्इंदर व वसई किनारपट्टी असा प्रवास वाहने घेऊन करता येणार आहे. मंगळवारी आमदार क्षितीज ठाकुर हे वाहनाने बोटीतून बाहेर पडले. त्यानंतर बोट पुन्हा वसईच्या दिशेने रवाना झाली. तर दुसऱ्या बोटीवर खासदार राजन विचारे यांच्या हस्ते रो रो सेवेचे फीत कापून व श्रीफळ वाढवून उदघाटन करण्यात आले. परंतु आता हे उदघाटन औपचारीक नसल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाने एका प्रसिध्दी पत्रकारद्वारे स्पष्ट केले आहे. या फेरीबोट सेवेचा कोणताही औपचारीक शासकीय लोकापर्ण सोहळा अद्याप झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

तूर्तास या फेरीबोटीचे जलमार्गातून होणारे नौकानयन तसेच बोटीतून प्रवासी व वाहनांची जेट्टीवर चढ उतार सुलभ व सुरक्षितपणे होत आहे किंवा कसे, या बाबींचा महाराष्ट्र सागरी मंडळाकडून अभ्यास करण्यात येत आहे. या सर्व बाबींची एकदा खात्री झाल्यानंतरच, फेरीबोट सेवेचा शासकीय लोकापर्ण सोहळा करण्यात येणारक आहे. त्यामुळे वसई, भार्इंदर या रो - रो फेरीबोट सेवेचा शासकीय लोकपर्ण सोहळा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी ते चुकीचे असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणे