शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालय आवारात पिचकारी मारणाऱ्या कर्मचाऱ्याला आयुक्तांनी रंगेहाथ पकडले

By अजित मांडके | Updated: October 21, 2022 15:59 IST

ठाणे महापालिका आयुक्त बांगर यांनी महापालिकेची धुरा हाती घेतल्यानंतर शहर सौंदर्यीकरण, आणि साफसफाईला विशेष महत्व दिले आहे.

ठाणे  : ठाणे  शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्वच विभागांना कामाला लावले आहे. त्यातही अस्वच्छता करणाऱ्यांच्या विरोधात दंडाची कारवाई करण्यासही सुरवात केली आहे. मात्र पालिका कर्मचाऱ्यांकडून जर चूक झाली तर काय करायचे असा सवाल निर्माण झाला आहे. महापालिका मुख्यालयात महापौर दालनाच्या बाहेर असलेल्या ग्रीनरीवर पिचकारी मारणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्याला पालिका आयुक्तांनी गुरुवारी सांयकाळच्या सुमारास रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याच्याकडून नियमानुसार १५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. एकूणच या निमित्ताने, महापालिका आयुक्तांनी आपल्याच कर्मचाऱ्यावर कारवाई करुन एक वेगळा आर्दश घालण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आहे.

ठाणे  महापालिका आयुक्त बांगर यांनी महापालिकेची धुरा हाती घेतल्यानंतर शहर सौंदर्यीकरण, आणि साफसफाईला विशेष महत्व दिले आहे. त्यानुसार प्रभाग समिती निहाय ९० हून अधिक स्पॉट त्यांनी कचरामुक्त केले असून यापुढेही केले जाणार आहेत. तसेच रस्ते सफाई, कोणीही सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही, यासाठी पथके तयार करुन जे थुंकतील त्यांच्या विरोधात दंडाची कारवाई सुरु केली आहे. परंतु गुरुवारी सांयकाळी महापालिका आयुक्त मुख्यालयातून जात असतांना महापौर दालनाबाहेर असलेल्या ग्रीनरीवर एका कर्मचा:याने पिचकारी मारली. त्याचवेळेस आयुक्तांनी त्याला रंगेहात पकडले. एकीकडे आपण ठाणोकरांना स्वच्छतेबाबत शिस्त लावत असतांना आपल्याच कर्मचा:याकडून अशा चुका होत असतील तर ते कितपत योग्य असा सवाल या निमित्ताने उपस्थित करीत. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांनी या रिक्षा चालक कर्मचाऱ्याला असेच सोडले नाही तर त्याला १५० रुपयांचा दंड देखील आकारला. तसेच त्याची पावती देखील त्याला दिली.

एकूणच अशा पध्दतीने त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला शिस्त लावून त्यांच्याकडून यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घेतली आहे. आपल्या पासूनच त्यांनी याला सुरवात केल्याचे या निमित्ताने दिसून आले. ठाणोकर नागरीकांना शिस्त लावतांना पालिका कर्मचाऱ्यांना देखील स्वत:ला शिस्त लावून घेतली तर त्याचा फायदा निश्चितच ठाणे शहराला होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.