शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या विद्यार्थ्यांनी माझा तलाव दिंडीतून पटवून दिले तलावाचे महत्त्व

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 21, 2024 16:14 IST

विद्यार्थ्यांनीच बनवलेले फलक घेऊन तलाव वाचवा, माझा तलाव... माझी जबाबदारी, गरज काळाची... बचत पाण्याची , हात हाती घेऊया... तलावांचे महत्व पटवूया, प्रत्येकाचा एकच नारा... पाण्याची काटकसर करा, गरज काळाची... जपणूक तलावांची अश्या घोषणा देण्यात आल्या.

ठाणे : जागतिक जल दिन २२ मार्च रोजी साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून गुरूवारी सकाळी ७:३० ते ९:०० या वेळेत तलावाचे महत्त्व तसेच पाण्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा तलाव दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. हि दिंडी ज्ञानप्रसारिणी शाळा ते साळवी तलाव या दरम्यान झाली. विद्यार्थ्यांनीच बनवलेले फलक घेऊन तलाव वाचवा, माझा तलाव... माझी जबाबदारी, गरज काळाची... बचत पाण्याची , हात हाती घेऊया... तलावांचे महत्व पटवूया, प्रत्येकाचा एकच नारा... पाण्याची काटकसर करा, गरज काळाची... जपणूक तलावांची अश्या घोषणा देण्यात आल्या.

ठाण्याला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. ठाणे शहरात पूर्वी ६० तलाव होते आणि आता केवळ ४२ शिल्लक आहेत. हे लक्षात घेता तलाव संवर्धन ही काळाची गरज आहे. पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट २०२३ पासून माझा तलाव या चळवळीची सुरुवात झाली. शाळेतील विद्यार्थ्यांना अग्रस्थानी ठेवून ही मोहीम राबवली जात आहे सप्टेंबर २०२३ पासुन ज्ञानप्रसारिणी शाळेने "साळवी तलाव" दत्तक घेतला आहे. शाळेतील इयत्ता ८ वी चे विद्यार्थी कळव्यातील पूर्वेला असणाऱ्या साळवी तलावावरती अभ्यास करत आहेत. यातूनच तलाव संवर्धनाची मोहीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा तसेच पर्यावरण दक्षता मंडळ प्रयत्नशील आहे. संस्थेने एक महिनाभर आधी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना फलक कसे बनवावे याबाबत सांगितले गेले व विद्यार्थ्यांकडून घोषणा फलक बनवून घेतले होते.

या घोषणा देत त्यासोबतच काही विदयार्थ्यांनी तलावाभोवती असलेल्या वस्तीतील लोकांना तलावात कचरा टाकू नका असे सांगून तलावाचे महत्त्व सांगितले. तलावाच्या आजूबाजूच्या वस्तीत असणाऱ्या सर्वसामान्यांनी विद्यार्थ्यांच्या मार्फत पर्यावरण दक्षता मंडळ राबवत असलेल्या माझा तलाव मोहिमेला पाठिंबा दिला. या दिंडीत शाळेचे मुख्याध्यापक सुतार, देसले, नेने, पर्यावरण दक्षता मंडळ समन्वयक आणि माझा तलावाचे स्वयंसेवक असे एकूण ११५ सभासद सहभागी झाले होते.