शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

शाळेच्या विद्यार्थ्यांनी माझा तलाव दिंडीतून पटवून दिले तलावाचे महत्त्व

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 21, 2024 16:14 IST

विद्यार्थ्यांनीच बनवलेले फलक घेऊन तलाव वाचवा, माझा तलाव... माझी जबाबदारी, गरज काळाची... बचत पाण्याची , हात हाती घेऊया... तलावांचे महत्व पटवूया, प्रत्येकाचा एकच नारा... पाण्याची काटकसर करा, गरज काळाची... जपणूक तलावांची अश्या घोषणा देण्यात आल्या.

ठाणे : जागतिक जल दिन २२ मार्च रोजी साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून गुरूवारी सकाळी ७:३० ते ९:०० या वेळेत तलावाचे महत्त्व तसेच पाण्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा तलाव दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. हि दिंडी ज्ञानप्रसारिणी शाळा ते साळवी तलाव या दरम्यान झाली. विद्यार्थ्यांनीच बनवलेले फलक घेऊन तलाव वाचवा, माझा तलाव... माझी जबाबदारी, गरज काळाची... बचत पाण्याची , हात हाती घेऊया... तलावांचे महत्व पटवूया, प्रत्येकाचा एकच नारा... पाण्याची काटकसर करा, गरज काळाची... जपणूक तलावांची अश्या घोषणा देण्यात आल्या.

ठाण्याला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. ठाणे शहरात पूर्वी ६० तलाव होते आणि आता केवळ ४२ शिल्लक आहेत. हे लक्षात घेता तलाव संवर्धन ही काळाची गरज आहे. पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट २०२३ पासून माझा तलाव या चळवळीची सुरुवात झाली. शाळेतील विद्यार्थ्यांना अग्रस्थानी ठेवून ही मोहीम राबवली जात आहे सप्टेंबर २०२३ पासुन ज्ञानप्रसारिणी शाळेने "साळवी तलाव" दत्तक घेतला आहे. शाळेतील इयत्ता ८ वी चे विद्यार्थी कळव्यातील पूर्वेला असणाऱ्या साळवी तलावावरती अभ्यास करत आहेत. यातूनच तलाव संवर्धनाची मोहीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा तसेच पर्यावरण दक्षता मंडळ प्रयत्नशील आहे. संस्थेने एक महिनाभर आधी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना फलक कसे बनवावे याबाबत सांगितले गेले व विद्यार्थ्यांकडून घोषणा फलक बनवून घेतले होते.

या घोषणा देत त्यासोबतच काही विदयार्थ्यांनी तलावाभोवती असलेल्या वस्तीतील लोकांना तलावात कचरा टाकू नका असे सांगून तलावाचे महत्त्व सांगितले. तलावाच्या आजूबाजूच्या वस्तीत असणाऱ्या सर्वसामान्यांनी विद्यार्थ्यांच्या मार्फत पर्यावरण दक्षता मंडळ राबवत असलेल्या माझा तलाव मोहिमेला पाठिंबा दिला. या दिंडीत शाळेचे मुख्याध्यापक सुतार, देसले, नेने, पर्यावरण दक्षता मंडळ समन्वयक आणि माझा तलावाचे स्वयंसेवक असे एकूण ११५ सभासद सहभागी झाले होते.