शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

उत्तनच्या खोपरा गावचा रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव अखेर शासनाच्या कोर्टात 

By धीरज परब | Updated: May 23, 2023 14:37 IST

गेल्या काही वर्षात या भागात काही बडे राजकारणी, व्यावसायिक आदींनी रस्ता नसल्याने कवडीमोलाने जमिनी विकत घेतल्या आहेत.

मीरा रोड - भाईंदर पश्चिमेस डोंगरी - उत्तन भागातील खोपरा गावात जाण्याचा रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव अखेर फेरबदल करून महापालिकेने राज्य शासना कडे मंजुरी साठी पाठवला आहे.

डोंगरीच्या पोलीस चौकी कडून पुढे खोपरा गाव कडे जाणारा रस्ता हा विकास आराखड्यात असला तरी तो काही भागात डोंगरातून जातो. शिवाय येथे मोठी लोकवस्ती नाही. पालिके कडे निधीची कमतरता, मतदारांची नाममात्र संख्या, काही जमीन मालकांची, सीआरझेड आदी विविध  कारणांनी हा रस्ता विकसित झाला नाही. 

जेणे करून येथील रहिवासी कच्च्या रस्त्याचाच वापर नाईलाजाने करत आले आहेत. रस्ता कच्चा आणि वाईट अवस्थेत असल्याने पावसाळ्यात तर लोकांचे अतिशय हाल होतात.  कोणी आजारी पडल्यास रुग्णवाहिका जायला तयार होत नाही. मृत्यू झाल्यास देखील स्मशानभूमीत नेण्यासाठी शववाहिनी येत नाही. पावसाळ्यात तर चिखलातून ये जा करावी लागते. सुमारे तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर बस - रिक्षासाठी यावे लागते. विद्यार्थी, वृद्ध , महिला आदींना त्रास जास्त सहन करावा लागतो.

गेल्या काही वर्षात या भागात काही बडे राजकारणी, व्यावसायिक आदींनी रस्ता नसल्याने कवडीमोलाने जमिनी विकत घेतल्या आहेत. तर रस्ता व्हावा म्हणून स्थानिकांसह तत्कालीन नगरसेवक , राजकारणी आदी रस्त्याची मागणी करत आले आहेत. पक्का रस्ता नसल्याने सार्वजनिक दिवाबत्ती, पाणी पुरवठा आदी सुविधा देखील पालिका देत नाही. वास्तविक सुविधा उपलब्ध करून देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. मंजूर विकास आराखड्यातला रस्ता हा डोंगरातून जात असल्याने तो विकसित करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे  सद्या अस्तित्वात असलेला रस्ताच विकास आराखड्यात दाखवून तो विकसित करण्याचा निर्णय ठरावा द्वारे केला आहे.

तो ठराव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करून देखील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आमदार गीता जैन यांनी शासना कडे रस्ता मंजूर करून विकसित करण्यासाठी पाठपुरावा चालवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या  बैठकीत रस्त्याच्या फेरबदलासाठी जागामालकांची सुनावणी घेऊन तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव पुन्हा शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करावा, असे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते.

मात्र त्या कार्यवाहीस देखील विलंब होत असल्याने आ. जैन तसेच स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. आयुक्त दिलीप ढोले यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिल्या नंतर आता पालिकेने आवश्यक कार्यवाही पूर्ण केली आहे. पालिकेने शासनाला सुधारित प्रस्ताव सादर  केला असून आता शासनाच्या मंजुरीवर रस्त्याचे भवितव्य अवलंबून आहे.