शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया ठप्प?, शासनाचे रिमाईंडर लेटर

By सदानंद नाईक | Updated: November 29, 2023 16:31 IST

महापालिकेच्या अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.

उल्हासनगर : शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया ठप्प पडलेच्या आरोपावर शासनाच्या रिमाईंडर पत्राने शिक्कामोर्तब झाले आहे. अनधिकृत बांधकाम नियमित प्रक्रिये बाबतची माहिती प्राप्त झाले नसल्याचे शासनाचे पत्र व्हायरल झाल्याने, महापालिकेच्या अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.

उल्हासनगरातील अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर शासनाने शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश काढला. मात्र दंडात्मक रक्कम जास्त असल्याने, नागरिकांनी अध्यादेशाला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर शासनाने अध्यादेशांत काही बदल करून अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. काही महिन्यांपूर्वी महापालिका नगररचनाकार विभागाने सरसगट १ लाख ७८ हजार मालमत्ताना बांधकामे नियमित करण्याच्या नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया ठप्प पडल्याची टीका विविध पक्षाच्या नेत्यांनी केली. दरम्यान १६ ऑक्टोबर रोजीच्या शासनाच्या एका पत्रात अनधिकृत बांधकामे नियमित केलेल्या प्रक्रियेची माहिती प्राप्त झाले नाही. असे म्हटले आहे.

महापालिके प्रमाणे आमदार कुमार आयलानी यांनाही असे पत्र शासनाने पाठविले आहे. या पत्रामुळे महापालिकेची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया ठप्प असल्याचे बोलले जात आहे. तसेच विविध पक्षाच्या नेत्यांनीही अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया ठप्प असल्याचा आरोप केला. याबाबत महापालिका नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्याशी संपर्क केला असता, अनधिकृत बांधकामे करण्याच्या प्रक्रियेत काही अडचणी आल्याचे सांगून प्रक्रिया मात्र सुरू असल्याची माहिती दिली. तसेच शासनाला प्रक्रियेबाबत माहिती पाठविण्याचे संकेत त्यांनी दिले. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनीही अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया सुरू असून सहायक नगररचनाकार संचालक यांच्याकडून अधिक माहिती घेणार असल्याची माहिती दिली आहे. 

डी फार्म दिला, मात्र बांधकाम परवान्याचे काय?

महापालिकेने आजपर्यंत अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचे सव्वाशे प्रकरणे आहेत. त्या बांधकामांना डी फार्म दिले, मात्र त्यांना बांधकाम परवाने दिले नसल्याचाही आरोप होत आहे. एकूणच बांधकामे नियमित करण्यावर प्रश्नचिन्हे कायम

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर